शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अन्यथा परवाने कायमचे रद्द

By admin | Updated: October 30, 2015 01:04 IST

राज्यातील १ लाख ४0 हजार आॅटोरिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळाल्याने, परिवहन विभागाकडून आता कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यातील १ लाख ४0 हजार आॅटोरिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणाला थंड प्रतिसाद मिळाल्याने, परिवहन विभागाकडून आता कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरणाची मुदत असून, या मुदतीत नूतनीकरण न करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. ज्या आॅटोरिक्षा परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत उलटली आहे, अशा परवानाधारकांना नव्याने परवाने प्राप्त करण्यासाठी काढण्यासाठी येणाऱ्या लॉटरी ड्रॉमध्ये अपात्र ठरविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. नूतनीकरण न करता, धावणाऱ्या आॅटोरिक्षांविरोधात ३0 आॅक्टोबरपासून राज्यभर विशेष मोहीमही हाती घेतली जाणार आहे. राज्यातील रद्द व नूतनीकरण न झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे, काही अटींवर ३१ आॅक्टोबरपर्यंत नूतनीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. अशा १ लाख ४0 हजार आॅटोरिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण झाले नसल्याचे निदर्शनास आले होते. मात्र, परवान्यांचे नूतनीकरणाची मुदत देऊनही त्याला थंड प्रतिसाद मिळाला आणि त्याचा २८ आॅक्टोबर रोजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यात बऱ्याच आॅटोरिक्षा चालकांनी परवान्यांचे नूतनीकरण न केल्याचे निदर्शनास आल्याने १६ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली. आता या अखेरच्या मुदतीतही आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण न केल्यास, कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नूतनीकरण न करणाऱ्यांचे परवाने कायमचे रद्द केले जाणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. या तपासणीत दोषी आढळणाऱ्या रिक्षांची नोंदणी मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार निलंबित किंवा कायमची रद्द करून त्या रिक्षा तांत्रिकदृष्ट्या पुनर्वापरासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहेत.