शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा..कल्याण पश्चिमेतील राष्ट्रवादीचे आव्हान संपुष्टात!

By admin | Updated: October 10, 2014 01:03 IST

आघाडीत बिघाडी झाली अन् काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची तयारी नसतानाही मारून-मुटकून उमेदवार उभे करून त्यांना बाहुल्यावर चढवण्यात आले आहे

कल्याण : आघाडीत बिघाडी झाली अन् काँग्रेस-राष्ट्रवादी वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांची तयारी नसतानाही मारून-मुटकून उमेदवार उभे करून त्यांना बाहुल्यावर चढवण्यात आले आहे. त्यातच पक्षांतर्गत बंडखोरीच्या राजकारणामुळे संबंधित उमेदवारांना जिंकण्याचाही आत्मविश्वास नसल्याचे एकंदरीतच दिसून येत आहे. अशीच काहीशी स्थिती कल्याण पश्चिम मतदारसंघातील विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. त्या तुलनेने काँग्रेससाठीही वेगळे लढण्याची पहिलीच निवडणूक असली तरीही त्यांनी प्रचारात जम बसविल्याचे दिसून येत आहे.येथे राष्ट्रवादीला बंडाळीचे ग्रहण लागले असून ‘मला नाही तर तुलाही नाही’ अशा विचित्र कचाट्यातून अधिकृत उमेदवाराला जावे लागत आहे. बंडाळीमुळेच कार्यकर्तेही संभ्रमात असून जाये तो जाये किधर, अशी स्थिती होण्यापेक्षा पक्षाचेच अधिकृत आणि बंड पुकारलेले उमेदवार समोर आले की, ‘देखल्या देवा दंडवत’ घालण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांच्या प्रचार फेऱ्यांच्या धबडग्यात हे स्पष्टपणे दिसून आले.शहरातील पश्चिमेकडील भागात सर्वच पक्ष रॅली-फेऱ्यांमधून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत असताना या पक्षाच्या उमेदवाराचीही रॅली निघाली, पण त्यात कार्यकर्त्यांचा अभाव होता. जी फेरी निघाली होती, त्यामध्ये मरगळ होती. सुरुवातीपासून रॅली संपुष्टात येईस्तोवर मात्र शेकड्यांच्या घरात ही संख्या कशीबशी गेल्याचे दिसून आले.याबाबत, समर्थकांशी चर्चा केल्यावर ऐनवेळी ही निवडणूक लढवण्यात आल्याने नियोजन कमी पडत असून समन्वयाचा प्रचंड अभाव असल्याचे सांगण्यात आले. उमेदवार कॅपेबल आहे की नाही, हे निवडणूक निकालात ठरेल़ परंतु, पक्ष म्हणून जेवढा प्रभाव दिसायला हवा, तेवढा कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेसचा दिसून येत नाही. आघाडीच्या वेळी कल्याणातील दोन्ही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले होते. मात्र, या वेळेस अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत वेगळे लढावे लागणार, याची सुतराम शक्यता नव्हती. तुलनेने काँग्रेसमध्ये मात्र लढायचेच असल्याने नियोजनासह विविध प्रकारची तयारी जास्त असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीची निवडणूक कार्यालयेदेखील शोधावी लागत आहेत, अशी स्थिती आहे, तर काँग्रेसने मात्र मोक्याच्या जागा आधीच काबीज केल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पाचावर धारण बसली आहे.