शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पत्नीची मुलेही नोकरीस पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 06:14 IST

सुप्रीम कोर्टाचा निकाल : अनुकंपा तत्त्वाबाबत रेल्वेचे परिपत्रक ठरविले बेकायदा

मुंबई : सेवेत असताना मृत्यू पावलेल्या सरकारी कर्मचाºयाने पहिली पत्नी हयात असताना दुसार विवाह केला असेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या दुसºया पत्नीची मुलेही अनुकंपा नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने हा निकाल देताना दुसºया विवाहातून जन्मलेली अपत्ये अनुकंपा नोकरीसाठी अपात्र ठरविणारे रेल्वे बोर्डाचे परिपत्रकही बेकायदा ठरवून रद्द केले. विशेष म्हणजे याआधीचे १९९१ मधील असेच परिपत्रक कोलकाता उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतरही बोर्डाने हे नवे परिपत्रक काढले होते.

न्यायालयाने म्हटले की, पहिली पत्नी हयात असताना केलेला दुसरा विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार मुळातच अवैध ठरून रद्द बातल मानला जात असला तरी त्याच कायद्याने अशा दुसºया विवाहातून झालेल्या मुलांना अनौरस नव्हे तर औरस संततीचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे दुसरी पत्नी कायदेशीरपणे पत्नी ठरत नसल्याने ती अनुकंपा नोकरीस पात्र ठरणार नाही. पण तिची मुले अनौरस नसल्याने त्यांना हा प्रतिबंध लागू होत नाही.

न्यायालायने म्हटले की, अनुकंपा नोकरी हा हक्क नाही व दिवंगत पालकानंतर वारसाहक्काने मिळणाºया संपत्तीप्रमाणे ती संपत्तीही नाही. तसेच बहुपत्नीत्वासारख्या कुप्रथेला आळा घालण्यासाठी निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे, हे मान्य केले तरी एकदा कायद्याने जी संसती औरस ठरविली गेली आहे तिच्या बाबतीत सरकारला भेदभाव करता येणार नाही. कोणाच्या पोटी जन्माला यायचे हे मुले ठरवू शकत नाहीत.काय होते हे प्रकरण?

  • पंचमुखी मारुती, कल्याण (प.) येथे राहणारे रामलखन त्रिपाठी मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपमध्ये कुशल तंत्रज्ञ म्हणून नोकरीस होते.
  • पहिली पत्नी हयात असताना त्यानी १९८७ मध्ये दुसरा विवाह केला.
  • सेवेत असताना नोव्हेंबर २००९ मध्ये रामलखन यांचे निधन झाले.
  • त्यांच्या दुसºया पत्नीचा मुलगा व्ही. आर. त्रिपाठी याने अनुकंपा नोकरीसाठी रेल्वेकडे अर्ज केला.
  • रेल्वेने सन २०१२ मध्ये त्यास अपात्र ठरविले.
  • आधी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) व नंतर उच्च न्यायालयाने रेल्वेचा निर्णय चुकीचा ठरविला.
  • याविरुद्ध रेल्वेने केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने वरील निकाल देऊन फेटाळले.
टॅग्स :Courtन्यायालयIndian Railwayभारतीय रेल्वे