शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

नागपुरात ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ परिसंवादाचे आयोजन

By admin | Updated: April 26, 2017 13:00 IST

 ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 26 - ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘लोकमत’ आणि कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने ‘एक ...

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 26 - ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘लोकमत’ आणि कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाने ‘एक जीवन स्वस्थ जीवन’ हा दहा दिवसांचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यभरात विविध कार्यक्रमांद्वारे कर्करोगाबाबत जागृती करण्यात येत आहे. 
 
यानिमित्तानं  नागपुरातील वर्धा रोडवरील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे बुधवारी सकाळी तज्ज्ञ डॉक्टरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्ष टीना अंबानी, प्रसिद्ध सिने अभिनेता इमरान हाश्मी व लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. या कार्यक्रमाला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेचे सहकार्य मिळाले आहे.
 
या उपक्रमाद्वारे पथनाट्य, परिसंवाद, डॉक्टरांना विशेष प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात नाशिक येथून झाली असून, नागपुरात त्याची सांगता होणार आहे.
(प्रभावी उपचारपध्दतीने कॅन्सर होईल कॅन्सल : परिसंवाद)
 
‘लोकमत’ आणि कोकिळाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग व त्यावरील उपचारांबाबत जनजागृती करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
(पथनाट्यातून दिला ‘कॅन्सरला कॅन्सल करा’चा संदेश)
 
‘कॅन्सरला कॅन्सल करा’ 
या माध्यमातून पथनाट्य, सखी मंचचे कार्यक्रम, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि डॉक्टरांना प्रशिक्षण, अशा विविध कार्यक्रमांद्वारे राज्यभरात कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी ९३२२१४४४४४ या क्रमांकावर मिस कॉल द्या किंवा लॉग आॅन करा ‘डब्ल्यूडब्ल्यू डॉट एकजीवनस्वस्थजीवन डॉट ईन’वर.
देशात कर्करोग हा सर्वात घातक आजार ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी भारतात सुमारे १० लाख लोकांना कर्करोगाचे निदान होते. २०३५ पर्यंत ही आकडेवारी १७ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. तरीही या आजाराबाबत लोकांमध्ये अजूनही भरपूर अज्ञान आहे. त्यामुळे बहुतेकदा तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यावर येईपर्यंत कर्करोगाचे निदान होत नाही आणि या टप्प्यावर त्यावर उपचार करणे अतिशय कठीण होऊन जाते. वस्तुत: लवकर निदान झाल्यास, हा आजार बरा होण्याची शक्यता अधिक असते आणि त्यासाठी या रोगाबद्दल जागरूकता असणे महत्त्वाचे ठरते.
 
-परिसंवादात सहभागी तज्ज्ञ डॉक्टर्स
: नागपूर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल
: कोकिळाबेन रुग्णालयाचे कन्सलटंट ब्रेस्ट अ‍ॅण्ड कोलोरॅक्टल आॅन्कॉलॉजी विशेषज्ञ डॉ. मंदार नाडकर्णी
: कोकिळाबेन रुग्णालयाच्या आॅन्कॉलॉजीचे संचालक डॉ. राजेश मिस्त्री.
: कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा
: आयएमए नागपूरच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत
: स्नेहांचल पॅलिअ‍ॅटीव्ह केअर सेंटरच्या अध्यक्ष डॉ. रोहिणी पाटील
: सायको आॅन्कॉलॉजिस्ट एचसीजी एनसीएचआरआय कॅन्सर सेंटरच्या डॉ. सुचित्रा मेहता
: राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मा
 

https://www.dailymotion.com/video/x844w62