शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

अवयवदान होणार आॅनलाइन

By admin | Updated: August 31, 2016 05:55 IST

गरजू रुग्णांची संख्या आणि अवयवदानात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. गरजू रुग्णांच्या तुलनेत १ टक्क्याहून कमी प्रमाणात अवयवदान होते

मुंबई : गरजू रुग्णांची संख्या आणि अवयवदानात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. गरजू रुग्णांच्या तुलनेत १ टक्क्याहून कमी प्रमाणात अवयवदान होते. अवयवांची कमतरता असल्यामुळे ‘किडनी रॅकेट’सारखे प्रकार घडतात. याला आळा घालण्यासाठी आणि अवयवदानाची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.अवयवदानाचा टक्का वाढावा म्हणून राज्यभरात तीन दिवस ‘अवयवदान महाअभियाना’चे आयोजन वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या महाअभियानाचा शुभारंभ ३० आॅगस्टला नरिमन पॉइंट येथून ‘अवयवदान महारॅली’ने झाला. या महारॅलीचा शुभारंभ मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी झेंडा दाखवून केला. एअर इंडिया इमारतीपासून निघालेली रॅली जीएमसी जिमखान्यापर्यंत गेली. या महारॅलीत १० हजार मुंबईकर सहभागी झाले होते. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने हे मुंबईतील अभियानाचे संयोजक आहेत. अवयवदान करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, विलंब होऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. अवयवदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार आहे. आपल्या संस्कृतीत दानाला महत्त्व आहे. अन्नदान, रक्तदान अशा विविध दानांविषयी सांगितले आहे. आता आपल्याला अवयवदान आणि देहदानाचा विचार पुढे न्यायला हवा. संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. जिवंत असताना आपल्याला शरीराचा मोह असतो. पण मेल्यावरही शरीराचा मोह असणे म्हणजे हा स्वार्थ आहे. मरणानंतरही आपण दुसऱ्यांच्या उपयोगी येणे यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट नाही. हा विचार मनात रुजवून अवयवदान केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (प्रतिनिधी)अवयवदान काळाची गरज मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. पण त्या प्रमाणात मूत्रपिंडाचे दान होत नाही. १२ हजार रुग्णांना अवयवांची गरज आहे. त्यापैकी ११ हजार रुग्ण हे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. पण वर्षाला जास्तीत जास्त १०० मूत्रपिंडांचे दान होते. यावरून स्पष्ट होते की अन्य रुग्णांना मूत्रपिंड मिळत नाही. अवयवदान ही काळाची गरज आहे. तीन दिवसीय महाअभियानानंतरही हे जनजागृतीचे कार्य अविरत सुरू राहिले पाहिजे. रोज अवयवदानाचे फॉर्म भरले जाणे आवश्यक आहे.- गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्रीपशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, उपमहापौर अलका केरकर, आमदार मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पोलीस महासंचालक सतीश माथूर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, भाजपा नेत्या शायना एन.सी., सार्वजनिक आरोग्य सेवा संचालक डॉ. मोहन जाधव, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांची या वेळी उपस्थिती होती.अवयवदानाच्या जनजागृतीसाठी तीन दिवसीय महाअभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ‘आधी केले आणि मग सांगितले’ या उक्तीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवयवदानाचा फॉर्म भरला. मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस, वैद्यकीय आरोग्यमंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीदेखील आज अवयवदानाची शपथ घेतली. एक खिडकी योजना हवी अवयवदान करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रक्रिया अधिक सुलभ केली जाणार आहे. व्यक्तीचा मेंदू मृतावस्थेत गेल्यावर ते जाहीर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर अवयवदानात अडथळे येऊ नयेत म्हणून एक खिडकी योजना आखणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत. अवयवदानाच्या फॉर्मची प्रक्रिया काही तासांत पूर्ण होईल यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. एक किडनी रॅकेट वैद्यकीय पेशाला बदनाम करू शकत नाही. भविष्यात येणाऱ्या डॉक्टरांनी एकनिष्ठपणे काम करायला हवे. - डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्रीतरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग अवयवदानाच्या महारॅलीत तब्बल १० हजार मुंबईकर सहभागी झाले होते. यात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. अवयवदान चळवळीला पुढे नेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसह अन्य वयोगटातील मुंबईकर या रॅलीत सहभागी झाले होते. त्याचबरोबर या रॅलीत अंध विद्यार्थीही सहभागी होते. ‘द्या, द्या... अवयव द्या’, ‘मरावे परि अवयवरूपी उरावे...’, ‘अवयवदान श्रेष्ठ दान’ अशा घोषणांनी मरिन ड्राइव्ह परिसर सकाळी दुमदुमून गेला होता. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर्सही या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.