शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

माळढोकच्या संवर्धनासाठी सेंद्रिय शेतीवर भर

By admin | Updated: June 19, 2014 00:56 IST

जगातील अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा माळढोक पक्षी वरोरा तालुक्यात मागील दहा वर्षांपासून वास्तव्यास आहे. माळढोक पक्षाच्या संख्येत वाढ होत आहे. माळढोक पक्षी शेतातील किडे फस्त करीत असल्यामुळे

वनविभागाचा प्रयत्न : चार गावांतील शेतकरी देणार प्रतिसादप्रविण खिरटकर - वरोराजगातील अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा माळढोक पक्षी वरोरा तालुक्यात मागील दहा वर्षांपासून वास्तव्यास आहे. माळढोक पक्षाच्या संख्येत वाढ होत आहे. माळढोक पक्षी शेतातील किडे फस्त करीत असल्यामुळे शेतात रासायनिक खत व किटकनाशकाचा उपयोग केल्यास माळढोक पक्षावर विपरित परिणाम होऊन ते नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात होती.त्यामुळे वनविभाग व वरोरा तालुक्यातील चार गावांतील शेतकऱ्यांनी माळढोक पक्षाच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकीत माळढोक पक्षाचा वावर असणाऱ्या शेतात सेंद्रीय खताचा वापर करून पिके घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माळढोक पक्षाला पोषक वातावरण तयार होणार असल्याचे मानले जात आहे.शेतकऱ्यांचे मित्र समजले जाणारे माळढोक पक्षी सन २००४ मध्ये वरोरा तालुक्यात चारच्या संख्येने आढळून आले होते. जगात अत्यंत दुर्मिळ झालेल्या माळढोक पक्षाने महाराष्ट्रातील सोलापूरनजिकच्या नानज गावाच्या क्षेत्रात सर्वाधिक असल्याची नोंद आहे. परंतु नानज परिसरात माळढोक पक्ष्यांची संख्या रोडावली असल्याचे समजते. माळढोक पक्षाच्या संख्येत वरोरा तालुक्यात दिवसागणीक वाढ होत आहे. सध्या वरोरा तालुक्यात सात माळढोक पक्षी आहेत. त्यामध्ये पाच मादी व दोन नरांचा समावेश आहे. या वर्षीच्या प्रगणनेत ते आढळून आले होते. माळढोक पक्षी उन्हाळ्यामध्ये दिसत नाही. त्याचे बाराही महिने लोकेशन मिळावे, याकरिता डेहराडून येथील संस्थेने एका माळढोक पक्षाला प्रायोगिक तत्वावर रेडीयो कॉलर चिप लावण्यात आली. माळढोक पक्ष्याचे संवर्धन व्हावे. माळढोक पक्ष्याचा वावर असलेल्या शेतशिवारातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, याकरिता वनविभाग शेतकऱ्यांना नेहमी मार्गदर्शन व प्रोत्साहित करीत असतात. माळढोक पक्षाचे अंडे शेतात आढळल्यास अशा शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून अंड्याचे जतन करण्याकरिता प्रोत्साहन भत्ता दिला जातो. सध्या शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा व किटकनाशक औषधांचा वापर केला जात आहे. माळढोक पक्षी शेतात वावरत असतो व पिकातील किटक खात असतो. त्यामुळे त्याच्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वन विभागाने वरोरा तालुक्यातील तुलाना, मार्डा, कळमजा, वनोजा या चार गावांतील शेतकऱ्यांसोबत सेंद्रीय खताने शेती करण्याकरिता चर्चा केली. या चर्चेत शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद आल्याने सेंद्रीय खतासाठी शेतकऱ्यांना सामूहिकरित्या अनुदान देण्यात आले आहे. गावालगत गांढुळ खताची निर्मिती करण्यात येणार आहे. गांढुळ खत व शेणखत शेतात घालून पिके घेतली जाणार आहे. सेंद्रिय खताने पिके घेतल्याने माळढोक पक्ष्यास कुठलाही धोका पोहोचणार नसून त्यांचे आयुष्यमान वाढणार असल्याचे मानले जात आहे.सेंद्रीय खताचा वापर करण्याकरिता अधिकाअधिक शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सर्व शेतकरी सहभागी होतील, असा मानस वनपरिमंडळ अधिकारी बी.टी. लालसरे यांनी व्यक्त केला.