कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांनी 29 भारतीय मच्छीमारांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. हे मच्छीमार कच्छातिवू परिसरात मासेमारी करत असताना श्रीलंकेच्या नौदलाने त्यांना पकडले होते. त्यांना मन्नारच्या न्यायदंडाधिका:यांनी 16 जूनर्पयत कोठडी सुनावली होती.
हे मच्छीमार रामेश्वरम येथून 727 बोटीद्वारे मासेमारीसाठी केलेल्या मच्छीमारांच्या एका समूहाचा भाग होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला राजपाक्षे उपस्थित होते. तेव्हा सद्भाव दर्शवत त्यांनी अटकेतील सर्व भारतीय मच्छीमारांच्या सुटकेचे आदेश दिले होते. राजपाक्षे मायदेशी परतल्यानंतर लगेचच पुन्हा भारतीय मच्छीमारांना अटकेची घटना घडली होती. राजपाक्षे यांनी या मच्छीमारांच्याही सुटकेचे आदेश दिले आहेत. (वृत्तसंस्था)