शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

थंडी वाजू नये म्हणून विठ्ठलास रजई, मफलर तर रुक्मिणीमातेस शाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:38 IST

पंढरपूर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचा निर्णय; वसंत पंचमीपर्यंत देवाच्या पोषाखात बदल

ठळक मुद्देदेवाला थंडी वाजू नये म्हणून काकडा आरती झाल्यावर रजई आणि कानपट्टी बांधली जाते रुक्मिणीमातेला उबदार शाल पांघरली जाते, जेणेकरून थंडी वाजू नये अशी भावना आहे देवाला पारंपरिक दागिनेदेखील परिधान केले जातात. पुढे उन्हाळ्यात देवाला पांढरे वस्त्र परिधान केले जाते

पंढरपूर :  हिवाळा सुरू झाला आहे़ थंडीमुळे सावळा विठुराया आणि रुक्मिणीमातेला थंडी वाजू नये म्हणून रजई, शाल आणि मफलर असा पोषाख सुरू करण्यात आला आहे. कार्तिकी वारी झाल्यावर प्रक्षाळपूजेच्या दुसºया दिवसापासून श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला हा पोषाख केला जातो. हा पोषाख वसंत पंचमी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत ठेवला जातो, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. 

राज्यात यंदा पावसाने मुक्काम वाढवला. त्यामुळे थंडीही उशिराने पडण्यास सुरूवात झाली आहे. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरा जोपासणाºया वारकरी संप्रदायाचे आद्यस्थान असलेल्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या पोषाखात बदल केला आहे. 

देवाला थंडी वाजू नये म्हणून काकडा आरती झाल्यावर रजई आणि कानपट्टी बांधली जाते तर रुक्मिणीमातेला उबदार शाल पांघरली जाते. जेणेकरून थंडी वाजू नये अशी भावना आहे. याबरोबर देवाला पारंपरिक दागिनेदेखील परिधान केले जातात. पुढे उन्हाळ्यात देवाला पांढरे वस्त्र परिधान केले जाते. असे असले तरी सध्या रजई, मफलर आणि शाल केलेल्या पोषाखात सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर