शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
3
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
4
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
5
pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
6
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
7
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
8
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
9
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
10
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
11
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
12
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
13
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."
14
'परवानगी मिळाली नाही, १९६२ च्या युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता तर...", चीनवर CDS यांचे मोठे विधान
15
Crime: स्मशानभूमीत महिलांच्या मृतदेहांसोबत...; तरुणाचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पाहून नागरिक हादरले!
16
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
17
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
18
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
19
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
20
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय

नवीन कर्जाचा आदेश म्हणजे हवेतला ‘बुडबुडा’ ठरू नये - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 07:42 IST

आता तरी राज्य सरकारने जिल्हा बँकांचा ‘श्वास’ मोकळा करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - जिल्हा बँकांची आर्थिक नाकाबंदीही करायची आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याचा आदेशही द्यायचा. हा विस्तवाशी खेळ आहे. श्वास जिल्हा बँकांचा कोंडला तरी जीव गुदमरतोय शेतकऱ्यांचा. आता तरी राज्य सरकारने जिल्हा बँकांचा ‘श्वास’ मोकळा करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. या बँकांकडे नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या जुन्या नोटा परत घेण्याचे शहाणपण रिझर्व्ह बँकेने दाखवावे. नवीन कर्जाचा आदेश म्हणजे हवेतला ‘बुडबुडा’ ठरू नये आणि शेतकरी खासगी सावकाराच्या दावणीला बांधला जाऊ नये, असे जर सरकारला खरोखर वाटत असेल तर हे शहाणपण दाखवावेच लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
राज्यातील अल्पभूधारक शेतक-यांना नवीन कर्ज ‘तत्काळ’ देण्याची तुतारी राज्य सरकारने फुंकली आहे, पण प्रत्यक्षात या तुतारीची अवस्था ‘नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ अशी झाली आहे. कारण ज्या जिल्हा बँकांमार्फत हे कर्जवाटप व्हायचे त्या जिल्हा सहकारी बँकांनीच ‘आपल्याकडे शेतक-यांना कर्जपुरवठा करण्यासाठी पुरेसा पैसाच नाही’ असे सांगून टाकले आहे. त्यामुळे सरकारची नव्या कर्जाची घोषणाही ‘तत्त्वतः’ ठरते की काय अशी शंका शेतक-यांना वाटू लागली आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
राज्यातील 16 जिल्हा सहकारी बँकांनी नवे कर्ज देण्यास असमर्थता दर्शवली आहे. अर्थात इतर जिल्हा बँकांचीही अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. तेव्हा नवीन कर्जपुरवठय़ाची घोषणा सरकारने मोठय़ा थाटात केली असली तरी शेतकऱयांच्या ताटात मात्र अद्याप एक छदामही पडलेला नाही. राज्याच्या सहकार मंत्र्यांनीही खरीप हंगामासाठी शेतकऱयांना दहा हजार रुपयांचे कर्ज तत्काळ देणारच असे ‘च’वर जोर देऊन सांगितले आहे. मात्र त्यांच्या या जोरबैठकांचाही अद्याप उपयोग झालेला नाही. परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहिली तर सामान्य शेतकऱयांना खासगी सावकाराचे उंबरठे झिजविण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी भीती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. 
 
नोटाबंदीनंतर जिल्हा सहकारी बँकांबद्दल जे पूर्वग्रहदूषित आणि अन्याय्य धोरण केंद्र सरकारने अवलंबले आहे त्यामुळेच आज महाराष्ट्रातील जिल्हा बँकांची आर्थिक दुरवस्था झाली आहे. नोटाबंदीचा तडाखा तर या बँकांना बसलाच, पण त्यानंतर त्यांच्याकडे जमा झालेला पैसा हा ‘काळाच पैसा’ आहे असा ग्रह केंद्रातील सत्ताधाऱयांनी करून घेतला. महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँका, सहकारी पतपेढय़ा या सर्वांना ‘गुन्हेगार’ आणि ‘भ्रष्ट’ ठरवून जुन्या नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँकेनेदेखील त्यांच्यावर अन्यायकारक निर्बंध लादले. या बँकांकडे जमा झालेल्या ‘रद्द नोटा’ अद्याप बदलून देण्यात आलेल्या नाहीत. ‘आले सरकारच्या मना तेथे जिल्हा बँकांचे काही चालेना’ अशी एकंदर स्थिती आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
अशा बिकट आर्थिक स्थितीत या बँका शेतकऱयांना नवीन कर्जाचे वाटप कशा करू शकणार आहेत? राज्य सरकार नवीन कर्ज देण्याची घोषणा करून मोकळे झाले, पण जिल्हा बँकांनी हा पैसा आणायचा कुठून? त्याचा विचार कोणी करायचा? जिल्हा बँकांचे हजारो कोटी रुपये नोटाबंदीमुळे अडकून पडले आहेत. शिक्षकांसह विविध खात्यांच्या कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठीही या बँकांकडे पैसे नाहीत. अशा वेळी सरकारच्या आदेशानुसार शेतकऱयांना त्या नवीन कर्ज देणार कुठून? नोटाबंदीच्या नाकाबंदीतून सुटकाही करायची नाही आणि नवीन कर्ज देण्याचाही आदेश द्यायचा. या पद्धतीने जिल्हा बँकांना परस्पर आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्याचा सरकारचा इरादा असेल तर तो अत्यंत घातक आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
सहकारी बँकिंगवर चालणारा राज्यकर्त्यांचा वरवंटा सामान्य शेतकऱयावर फिरत आहे. सहकारावर भ्रष्टाचाराचे डाग जरूर आहेत, पण ते कोणत्या क्षेत्रावर नाहीत? सध्याचे सत्ताधारी ज्या उद्योग जगताच्या गळय़ात गळे घालतात ते क्षेत्र काळय़ा पैशापासून, भ्रष्टाचारापासून मुक्त आहे का? त्यांचे ‘उद्योग’ फक्त आणि फक्त पांढऱया पैशांवरच भरभराटीला आले आहेत असे म्हणायचे का? सहकारी संस्था, बँका यांच्यातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार निपटून काढण्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण त्याचे हत्यार बनवून ही व्यवस्थाच मोडीत काढू नका. सहकारी बँका मोडीत काढून येथील गावखेडय़ात परदेशी बँकांना घुसवण्याचा डाव आहे काय, अशी शंका जनतेला येऊ लागली आहे. जिल्हा बँका हा शेतकरी आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. तो मोडला तर शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडेल असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.