शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कर्जाचा आदेश म्हणजे हवेतला ‘बुडबुडा’ ठरू नये - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 07:42 IST

आता तरी राज्य सरकारने जिल्हा बँकांचा ‘श्वास’ मोकळा करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - जिल्हा बँकांची आर्थिक नाकाबंदीही करायची आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याचा आदेशही द्यायचा. हा विस्तवाशी खेळ आहे. श्वास जिल्हा बँकांचा कोंडला तरी जीव गुदमरतोय शेतकऱ्यांचा. आता तरी राज्य सरकारने जिल्हा बँकांचा ‘श्वास’ मोकळा करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून केली आहे. या बँकांकडे नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या जुन्या नोटा परत घेण्याचे शहाणपण रिझर्व्ह बँकेने दाखवावे. नवीन कर्जाचा आदेश म्हणजे हवेतला ‘बुडबुडा’ ठरू नये आणि शेतकरी खासगी सावकाराच्या दावणीला बांधला जाऊ नये, असे जर सरकारला खरोखर वाटत असेल तर हे शहाणपण दाखवावेच लागेल असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
राज्यातील अल्पभूधारक शेतक-यांना नवीन कर्ज ‘तत्काळ’ देण्याची तुतारी राज्य सरकारने फुंकली आहे, पण प्रत्यक्षात या तुतारीची अवस्था ‘नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ अशी झाली आहे. कारण ज्या जिल्हा बँकांमार्फत हे कर्जवाटप व्हायचे त्या जिल्हा सहकारी बँकांनीच ‘आपल्याकडे शेतक-यांना कर्जपुरवठा करण्यासाठी पुरेसा पैसाच नाही’ असे सांगून टाकले आहे. त्यामुळे सरकारची नव्या कर्जाची घोषणाही ‘तत्त्वतः’ ठरते की काय अशी शंका शेतक-यांना वाटू लागली आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
राज्यातील 16 जिल्हा सहकारी बँकांनी नवे कर्ज देण्यास असमर्थता दर्शवली आहे. अर्थात इतर जिल्हा बँकांचीही अवस्था त्यापेक्षा वेगळी नाही. तेव्हा नवीन कर्जपुरवठय़ाची घोषणा सरकारने मोठय़ा थाटात केली असली तरी शेतकऱयांच्या ताटात मात्र अद्याप एक छदामही पडलेला नाही. राज्याच्या सहकार मंत्र्यांनीही खरीप हंगामासाठी शेतकऱयांना दहा हजार रुपयांचे कर्ज तत्काळ देणारच असे ‘च’वर जोर देऊन सांगितले आहे. मात्र त्यांच्या या जोरबैठकांचाही अद्याप उपयोग झालेला नाही. परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहिली तर सामान्य शेतकऱयांना खासगी सावकाराचे उंबरठे झिजविण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी भीती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. 
 
नोटाबंदीनंतर जिल्हा सहकारी बँकांबद्दल जे पूर्वग्रहदूषित आणि अन्याय्य धोरण केंद्र सरकारने अवलंबले आहे त्यामुळेच आज महाराष्ट्रातील जिल्हा बँकांची आर्थिक दुरवस्था झाली आहे. नोटाबंदीचा तडाखा तर या बँकांना बसलाच, पण त्यानंतर त्यांच्याकडे जमा झालेला पैसा हा ‘काळाच पैसा’ आहे असा ग्रह केंद्रातील सत्ताधाऱयांनी करून घेतला. महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँका, सहकारी पतपेढय़ा या सर्वांना ‘गुन्हेगार’ आणि ‘भ्रष्ट’ ठरवून जुन्या नोटांसंदर्भात रिझर्व्ह बँकेनेदेखील त्यांच्यावर अन्यायकारक निर्बंध लादले. या बँकांकडे जमा झालेल्या ‘रद्द नोटा’ अद्याप बदलून देण्यात आलेल्या नाहीत. ‘आले सरकारच्या मना तेथे जिल्हा बँकांचे काही चालेना’ अशी एकंदर स्थिती आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
अशा बिकट आर्थिक स्थितीत या बँका शेतकऱयांना नवीन कर्जाचे वाटप कशा करू शकणार आहेत? राज्य सरकार नवीन कर्ज देण्याची घोषणा करून मोकळे झाले, पण जिल्हा बँकांनी हा पैसा आणायचा कुठून? त्याचा विचार कोणी करायचा? जिल्हा बँकांचे हजारो कोटी रुपये नोटाबंदीमुळे अडकून पडले आहेत. शिक्षकांसह विविध खात्यांच्या कर्मचाऱयांचे वेतन देण्यासाठीही या बँकांकडे पैसे नाहीत. अशा वेळी सरकारच्या आदेशानुसार शेतकऱयांना त्या नवीन कर्ज देणार कुठून? नोटाबंदीच्या नाकाबंदीतून सुटकाही करायची नाही आणि नवीन कर्ज देण्याचाही आदेश द्यायचा. या पद्धतीने जिल्हा बँकांना परस्पर आरोपीच्या पिंजऱयात उभे करण्याचा सरकारचा इरादा असेल तर तो अत्यंत घातक आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
सहकारी बँकिंगवर चालणारा राज्यकर्त्यांचा वरवंटा सामान्य शेतकऱयावर फिरत आहे. सहकारावर भ्रष्टाचाराचे डाग जरूर आहेत, पण ते कोणत्या क्षेत्रावर नाहीत? सध्याचे सत्ताधारी ज्या उद्योग जगताच्या गळय़ात गळे घालतात ते क्षेत्र काळय़ा पैशापासून, भ्रष्टाचारापासून मुक्त आहे का? त्यांचे ‘उद्योग’ फक्त आणि फक्त पांढऱया पैशांवरच भरभराटीला आले आहेत असे म्हणायचे का? सहकारी संस्था, बँका यांच्यातील भ्रष्टाचार, गैरव्यवहार निपटून काढण्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण त्याचे हत्यार बनवून ही व्यवस्थाच मोडीत काढू नका. सहकारी बँका मोडीत काढून येथील गावखेडय़ात परदेशी बँकांना घुसवण्याचा डाव आहे काय, अशी शंका जनतेला येऊ लागली आहे. जिल्हा बँका हा शेतकरी आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. तो मोडला तर शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडेल असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.