शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा आदेश चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2017 01:22 IST

एखाद्या अपवादात्मक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचे आदेश दिले आहेत. हा आदेश सर्व प्रकरणांमध्ये लागू होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने

- अ‍ॅड. वर्षा देशपांडेएखाद्या अपवादात्मक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताचे आदेश दिले आहेत. हा आदेश सर्व प्रकरणांमध्ये लागू होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशाने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या आदेशामुळे भविष्यात गर्भलिंगनिदान होण्याचे प्रमाण वाढू शकते, अशी भीती आहे. गरोदरपणात साधारणत: १२ किंवा १८व्या आठवड्यात गर्भाची अवस्था कळते, त्यातून त्याचे शारीरिक स्वास्थ्य कसे असते, याविषयी निदान होते. केवळ काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये गर्भाला व्यंग असल्याचे उशिराने समजते. मात्र, अशा अपवादात्मक प्रकरणांसाठी आता मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली पाहिजेत. जेणेकरून, ही प्रक्रिया गुंतागुंतीची न राहता जलदगतीने होईल. २०व्या आठवड्यात महिलेचा गर्भ परिपक्व होण्याच्या मार्गावर असतो. अशा स्थितीत गर्भपात करणे हे हत्या करण्यासाखेच आहे. भविष्यात अशा प्रकरणांसाठी विशेष न्यायालयीन समितीची नेमणूक करणे आवश्यक आहे. गर्भपाताची परवानगी मागणाऱ्या प्रकरणांमधील बारकावे तपासण्यासाठी त्याचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी ही समिती सक्षम असली पाहिजे. जेणेकरून, त्या महिलेला न्यायालयीन प्रक्रियेच्या दिरंगाईचा फटका बसणार नाही, याची दक्षता घेता येईल. विशेष समितीत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश कटाक्षाने टाळला पाहिजे. कारण गेल्या काही वर्षांतील वैद्यकीय तज्ज्ञांमधील पारदर्शीपणा कमी होत चालल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या विशेष समितीत वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश केल्यास, त्या माध्यमातून गर्भलिंगनिदान चाचण्या करून स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (लेखिका या ‘लेक लाडकी’ अभियानाच्या प्रमुख आहेत)