शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

राज्यातील १३६५ विशेष शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याचा खंडपीठाचा आदेश

By admin | Updated: August 25, 2016 19:58 IST

राज्यभरातील १३६५ शिक्षक आणि परिचर यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या.एस.एस. शिंदे आणि न्या. पी.आर. बोरा यांनी आज शासनाला दिला

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 25 - शिक्षण संचालकांनी सेवा समाप्त केलेले अपंग, मुकबधीर आणि अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळांमधील राज्यभरातील १३६५ शिक्षक आणि परिचर यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.एस.एस. शिंदे आणि न्या. पी.आर. बोरा यांनी आज (२५ आॅगस्ट ) रोजी शासनाला दिला. याचिकाकर्त्यांना थकीत वेतन व इतर आर्थिक लाभ दोन महिन्यात द्यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.

याचिकाकर्त्यांची सेवा समाप्त करणारा शिक्षण संचालकांचा २९ डिसेंबर २०१५ चा आदेश खंडपीठाने रद्द केला. याचिकाकर्ते ज्या संस्थेत कार्यरत होते, तेथेच ते कार्यरत राहतील असेही खंडपीठाने स्पष्ट केले. शेख नसीम शेख अहेमद व इतर ६० शिक्षकांच्या याचिकांवरील एकत्रित सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

राज्यात अपंग, मुकबधीर आणि अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये पाच विद्यार्थ्यांमागे एक केंद्र कार्यरत होते. त्यावर संस्थेने ह्यविशेष शिक्षकांह्णच्या नियुत्या केल्या होत्या. शिक्षण संचालक, पुणे यांनी १९ आॅक्टोबर २०१५ रोजी कारणेदर्शक नोटीस काढुन वरील शिक्षकांच्या पदांना पायाभूत पद म्हणुन शासनाकडून मंजुरी देण्यात आली नाही. शासनाच्या पूर्व मान्यतेशिवाय कोणत्याही पदावर भरती करु नये, असे शासनाचे आदेश असताना वरील शिक्षकांच्या नियुत्या केल्या त्या रद्द का करु नये, अशी नोटीस काढली. संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत काही शिक्षकांना नोटीसा बजावल्या तर काही शिक्षकांना नोटीसा बजावल्या नाहीत.

याचिकाकर्त्यासह इतर शिक्षकांनी वरील नोटीसला ५ नोव्हेंबर २०१५ रोजी उत्तर दिले. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, मागील पाच-सहा वर्षात त्यांच्या नियुक्त्या या योग्य त्या प्रक्रियेचा अवलंब करुनच केल्या आहेत. त्यांच्या नियुक्त्यांना शिक्षण उपसंचालकांनी मान्यता दिली आहे. तसेच त्यांना सेवेत कायम करुन त्यांचे वेतन निश्चित केले आहे. केंद्र शासनाच्या ह्यअपंग समावेशीत शिक्षक (माध्यमीक स्तर) या विशेष योजनेअंतर्गत त्यांच्या नियुत्या केल्या असुन राज्य शासन वरील योजना राबवीत आहे.

मात्र शिक्षण संचालकांनी त्यांच्या उत्तराचा विचार न करता २९ डिसेंबर २०१५ च्या आदेशान्वये याचिकाकर्त्यांची सेवा समाप्त केली होती. याचिकाकर्त्यांनी शिक्षण संचालकांच्या या आदेशास औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. कोणतेही कारण न देता सेवा समाप्त करणे चुकीचे असल्याचे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फेअ‍ॅड.एस.एस.काझी,धनाजी कुडले, हमजा पठाण,काझी सबाहत, देशमुख, पवार यांनी तर मंजुषा देशपांडे यांनी शासनातर्फे काम पाहिले.