शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
5
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
6
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
7
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
8
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
9
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
10
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
11
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
12
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
13
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
14
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
15
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
16
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
17
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
18
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
19
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
20
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  

राज्यातील १३६५ विशेष शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याचा खंडपीठाचा आदेश

By admin | Updated: August 25, 2016 19:58 IST

राज्यभरातील १३६५ शिक्षक आणि परिचर यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या.एस.एस. शिंदे आणि न्या. पी.आर. बोरा यांनी आज शासनाला दिला

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 25 - शिक्षण संचालकांनी सेवा समाप्त केलेले अपंग, मुकबधीर आणि अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळांमधील राज्यभरातील १३६५ शिक्षक आणि परिचर यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.एस.एस. शिंदे आणि न्या. पी.आर. बोरा यांनी आज (२५ आॅगस्ट ) रोजी शासनाला दिला. याचिकाकर्त्यांना थकीत वेतन व इतर आर्थिक लाभ दोन महिन्यात द्यावेत, असेही आदेशात म्हटले आहे.

याचिकाकर्त्यांची सेवा समाप्त करणारा शिक्षण संचालकांचा २९ डिसेंबर २०१५ चा आदेश खंडपीठाने रद्द केला. याचिकाकर्ते ज्या संस्थेत कार्यरत होते, तेथेच ते कार्यरत राहतील असेही खंडपीठाने स्पष्ट केले. शेख नसीम शेख अहेमद व इतर ६० शिक्षकांच्या याचिकांवरील एकत्रित सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

राज्यात अपंग, मुकबधीर आणि अस्थिव्यंग असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये पाच विद्यार्थ्यांमागे एक केंद्र कार्यरत होते. त्यावर संस्थेने ह्यविशेष शिक्षकांह्णच्या नियुत्या केल्या होत्या. शिक्षण संचालक, पुणे यांनी १९ आॅक्टोबर २०१५ रोजी कारणेदर्शक नोटीस काढुन वरील शिक्षकांच्या पदांना पायाभूत पद म्हणुन शासनाकडून मंजुरी देण्यात आली नाही. शासनाच्या पूर्व मान्यतेशिवाय कोणत्याही पदावर भरती करु नये, असे शासनाचे आदेश असताना वरील शिक्षकांच्या नियुत्या केल्या त्या रद्द का करु नये, अशी नोटीस काढली. संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांमार्फत काही शिक्षकांना नोटीसा बजावल्या तर काही शिक्षकांना नोटीसा बजावल्या नाहीत.

याचिकाकर्त्यासह इतर शिक्षकांनी वरील नोटीसला ५ नोव्हेंबर २०१५ रोजी उत्तर दिले. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, मागील पाच-सहा वर्षात त्यांच्या नियुक्त्या या योग्य त्या प्रक्रियेचा अवलंब करुनच केल्या आहेत. त्यांच्या नियुक्त्यांना शिक्षण उपसंचालकांनी मान्यता दिली आहे. तसेच त्यांना सेवेत कायम करुन त्यांचे वेतन निश्चित केले आहे. केंद्र शासनाच्या ह्यअपंग समावेशीत शिक्षक (माध्यमीक स्तर) या विशेष योजनेअंतर्गत त्यांच्या नियुत्या केल्या असुन राज्य शासन वरील योजना राबवीत आहे.

मात्र शिक्षण संचालकांनी त्यांच्या उत्तराचा विचार न करता २९ डिसेंबर २०१५ च्या आदेशान्वये याचिकाकर्त्यांची सेवा समाप्त केली होती. याचिकाकर्त्यांनी शिक्षण संचालकांच्या या आदेशास औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. कोणतेही कारण न देता सेवा समाप्त करणे चुकीचे असल्याचे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला. या प्रकरणात याचिकाकर्त्यांतर्फेअ‍ॅड.एस.एस.काझी,धनाजी कुडले, हमजा पठाण,काझी सबाहत, देशमुख, पवार यांनी तर मंजुषा देशपांडे यांनी शासनातर्फे काम पाहिले.