शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

मध्यावधी निवडणुकीचा पर्याय

By admin | Updated: January 29, 2017 00:45 IST

भाजपा-शिवसेना युती तुटल्यामुळे राज्यापुढे मध्यावधी निवडणुकीचा पर्याय असू शकतो, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

कोल्हापूर : भाजपा-शिवसेना युती तुटल्यामुळे राज्यापुढे मध्यावधी निवडणुकीचा पर्याय असू शकतो, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. युती तुटल्यामुळे शिवसेना आता सरकारमध्ये राहील असे वाटत नाही आणि राहिलीच तर मात्र सत्तेसाठी हा पक्ष काहीही करतो असा समज जाईल, असाही चिमटा पवार यांनी घेतला. दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना युती तुटल्यानंतर राज्यातील सरकार अस्थिर आहे असे आपणास वाटते का, असे विचारल्यावर ते म्हणाले की, सरकार चालविण्याचा भाजपा नक्कीच प्रयत्न करील; पण आम्ही एकत्रित बसून चर्चा करून निर्णय घेऊ. शांतपणे पक्षाच्या शिस्तीत बसेल अशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल. यासाठी समविचारी पक्षांशीही आम्ही चर्चा करु.भाजपाला राष्ट्रवादी पाठिंबा देणार का, अशी विचारणा केल्यावर ते म्हणाले, आमचा भाजपाला कधीही पाठिंबा राहणार नाही. दोन वर्षांपूर्वी राज्यातील निवडणुका झाल्यानंतर युती होत नसेल तर आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी ठेवली होती. प्रत्यक्षात पाठिंबा दिलेला नव्हता. राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी, ही काही देशाची किंवा राज्याची निवडणूक नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पक्षाने दिल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राष्ट्रपतीपदाबाबतअपेक्षा गैर...शरद पवार राष्ट्रपती होणार अशी चर्चा नेहमी सुरू असते. याबाबत छेडले असता पवार यांनी चर्चेत तारतम्य बाळगण्याची आवश्यकता बोलून दाखविली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारा खासदार आहेत. पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे भलतीच अपेक्षा करणे अयोग्य आहे. आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. अशाप्रकारची अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.