शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भेदाभेदाचा आक्षेप घेत द्वादशीवार यांना विरोध; मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 06:04 IST

अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांनी द्वादशीवार यांच्या उमेदवारीस विरोध करणारे पत्रक जारी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बहुतांश ललित साहित्यिक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते, असे वक्तव्य केल्याने लेखक व ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा अखिल भारतीय साहित्य परिषदेने निषेध केला आहे. द्वेषमूलक भाषणे करणाऱ्या आणि मते असणाऱ्या साहित्यिकांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले जाऊ नये, असे अखिल भारतीय साहित्य परिषदेने पत्रात म्हटले आहे. 

वर्धा येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ संपादक, साहित्यिक सुरेश द्वादशीवार, लेखक अच्युत गोडबोले आणि ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे यांची नावे सुचविलेली आहेत. गोवा, फोंडा येथे  शनिवारी (१५ ऑक्टोबर) होणाऱ्या बैठकीत एकमताने अध्यक्षपदाची निवड होणार आहे. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या द्वादशीवार यांच्या वक्तव्याबाबत साहित्य परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्यातील जात, धर्म यांचे भेदाभेद मिटवून आपण एकत्र आले पाहिजे, असा लोकांना उपदेश करणाऱ्या द्वादशीवार यांनी दक्षिणायनच्या नागपूर येथील कार्यक्रमातील भाषणात मात्र भेदभावाला खतपाणीच घातले आहे. मराठीतील बहुतांश ललित लेखक हे ब्राह्मण होते, ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते आणि त्यांनी महात्मा गांधींना न्याय दिला नाही, हे त्यांचे वक्तव्य वर्णभेद निर्माण करणारे, भावना भडकावून दुही माजवणारे, असे परिषदेचे म्हणणे आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांनी द्वादशीवार यांच्या उमेदवारीस विरोध करणारे पत्रक जारी केले आहे.

साहित्य समाजाला जोडण्यासाठी      आपल्या भाषणात द्वादशीवार यांनी खांडेकर ते प्र. के. अत्रे यांच्यापर्यंत अनेकांची निंदा करीत न्यायालयांवरही टीका केल्याचे परिषदेने म्हटले आहे.    समाजातील भेदांना उत्तेजन देणाऱ्यांचा निषेध करत आहे, असे पाठक म्हणाले. साहित्याचा उद्देश समाज तोडणे नसून समाज जोडणे आहे, हे विसरून चालणार नाही.      साहित्य संमेलनाचा अध्यक्षच जर भेदाला उत्तेजन देणारा असेल तर ते साहित्य संमेलन समाजाला कोणती दिशा दाखवणारे असेल, असा सवाल पाठक यांनी परिषदेच्या वतीने केला आहे.