शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांच्या शास्त्रशुद्ध भूमिकेला सत्ताधाऱ्यांचा विरोध

By admin | Updated: May 10, 2017 02:29 IST

गाय ही उपयुक्त पशू आहे. तिची उपयुक्तता नसेल तर तिला दारात बांधून कुटुंब चालवणे अशक्य असल्याने गरज लक्षात घेऊन

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘गाय ही उपयुक्त पशू आहे. तिची उपयुक्तता नसेल तर तिला दारात बांधून कुटुंब चालवणे अशक्य असल्याने गरज लक्षात घेऊन उदरनिर्वाहासाठी माणसाने गायीचे मांसही खाल्ले आहे, अशी भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडली होती. सावरकरांचे नाव घेऊन सत्तेत बसणाऱ्यांना त्यांची शास्त्रशुद्ध भूमिका मान्य नाही,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली. भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव, डॉ. विनायक पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांना ‘फुले-आंबेडकर साहित्य’ पुरस्कार देण्यात आला. विष्णू वाघ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिजाताई राठोड यांना ‘फुले-आंबेडकर युवा साहित्य’ पुरस्कार देण्यात आला. अजित भिलारे, अरुण ननावरे, लक्ष्मण ढोणे यांनाही गौरविण्यात आले. संसदीय कार्याची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल पवार यांचाही सत्कार करण्यात आला.शरद पवार म्हणाले, ‘मांस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धावून जाणारे तथाकथित गोरक्षक आणि त्यांना पाठीशी घालून संरक्षण देणारे राज्य सत्तेतील काही घटक अशी विचित्र परिस्थिती आज देशात पाहायला मिळत आहे. वाहनातून नेण्यात येणारे मांस हे गायीचेच आहे, असा आरोप करून वाहनचालकांना वेठीस धरले जाते. मात्र, विचारांवर उभी राहिलेली सामूहिक शक्ती अशा प्रकारांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. सर्व लहान व अल्पसंख्याक घटकांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाण्यासाठी सज्ज आहोत. यातून देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.’

‘आरएसएसचा अजेंडा मान्य नसल्याचे मोदींनी स्पष्ट करावे’-‘सध्याच्या घडीला गायीचे महत्त्व वाढून माणसांची किंमत कमी होऊ लागली आहे. धर्माधिष्ठित राष्ट्रवाद करण्याचा प्रयत्न निषेध करण्यायोग्यच आहे. ‘सबका साथ सबका विकास...,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, मात्र त्यांच्या बोलण्यावर अल्पसंख्याकांचा विश्वास राहिलेला नाही. सरकारच्या धोरणांमध्ये आरएसएसचा अजेंडा डोकावत असून तो मान्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा स्पष्ट करावे,’ अशी मागणी भाई वैद्य यांनी या वेळी केली.