शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांच्या शास्त्रशुद्ध भूमिकेला सत्ताधाऱ्यांचा विरोध

By admin | Updated: May 10, 2017 02:29 IST

गाय ही उपयुक्त पशू आहे. तिची उपयुक्तता नसेल तर तिला दारात बांधून कुटुंब चालवणे अशक्य असल्याने गरज लक्षात घेऊन

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘गाय ही उपयुक्त पशू आहे. तिची उपयुक्तता नसेल तर तिला दारात बांधून कुटुंब चालवणे अशक्य असल्याने गरज लक्षात घेऊन उदरनिर्वाहासाठी माणसाने गायीचे मांसही खाल्ले आहे, अशी भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडली होती. सावरकरांचे नाव घेऊन सत्तेत बसणाऱ्यांना त्यांची शास्त्रशुद्ध भूमिका मान्य नाही,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली. भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव, डॉ. विनायक पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांना ‘फुले-आंबेडकर साहित्य’ पुरस्कार देण्यात आला. विष्णू वाघ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिजाताई राठोड यांना ‘फुले-आंबेडकर युवा साहित्य’ पुरस्कार देण्यात आला. अजित भिलारे, अरुण ननावरे, लक्ष्मण ढोणे यांनाही गौरविण्यात आले. संसदीय कार्याची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल पवार यांचाही सत्कार करण्यात आला.शरद पवार म्हणाले, ‘मांस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धावून जाणारे तथाकथित गोरक्षक आणि त्यांना पाठीशी घालून संरक्षण देणारे राज्य सत्तेतील काही घटक अशी विचित्र परिस्थिती आज देशात पाहायला मिळत आहे. वाहनातून नेण्यात येणारे मांस हे गायीचेच आहे, असा आरोप करून वाहनचालकांना वेठीस धरले जाते. मात्र, विचारांवर उभी राहिलेली सामूहिक शक्ती अशा प्रकारांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. सर्व लहान व अल्पसंख्याक घटकांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाण्यासाठी सज्ज आहोत. यातून देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.’

‘आरएसएसचा अजेंडा मान्य नसल्याचे मोदींनी स्पष्ट करावे’-‘सध्याच्या घडीला गायीचे महत्त्व वाढून माणसांची किंमत कमी होऊ लागली आहे. धर्माधिष्ठित राष्ट्रवाद करण्याचा प्रयत्न निषेध करण्यायोग्यच आहे. ‘सबका साथ सबका विकास...,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, मात्र त्यांच्या बोलण्यावर अल्पसंख्याकांचा विश्वास राहिलेला नाही. सरकारच्या धोरणांमध्ये आरएसएसचा अजेंडा डोकावत असून तो मान्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा स्पष्ट करावे,’ अशी मागणी भाई वैद्य यांनी या वेळी केली.