शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांच्या शास्त्रशुद्ध भूमिकेला सत्ताधाऱ्यांचा विरोध

By admin | Updated: May 10, 2017 02:29 IST

गाय ही उपयुक्त पशू आहे. तिची उपयुक्तता नसेल तर तिला दारात बांधून कुटुंब चालवणे अशक्य असल्याने गरज लक्षात घेऊन

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘गाय ही उपयुक्त पशू आहे. तिची उपयुक्तता नसेल तर तिला दारात बांधून कुटुंब चालवणे अशक्य असल्याने गरज लक्षात घेऊन उदरनिर्वाहासाठी माणसाने गायीचे मांसही खाल्ले आहे, अशी भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडली होती. सावरकरांचे नाव घेऊन सत्तेत बसणाऱ्यांना त्यांची शास्त्रशुद्ध भूमिका मान्य नाही,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली. भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव, डॉ. विनायक पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांना ‘फुले-आंबेडकर साहित्य’ पुरस्कार देण्यात आला. विष्णू वाघ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिजाताई राठोड यांना ‘फुले-आंबेडकर युवा साहित्य’ पुरस्कार देण्यात आला. अजित भिलारे, अरुण ननावरे, लक्ष्मण ढोणे यांनाही गौरविण्यात आले. संसदीय कार्याची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल पवार यांचाही सत्कार करण्यात आला.शरद पवार म्हणाले, ‘मांस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धावून जाणारे तथाकथित गोरक्षक आणि त्यांना पाठीशी घालून संरक्षण देणारे राज्य सत्तेतील काही घटक अशी विचित्र परिस्थिती आज देशात पाहायला मिळत आहे. वाहनातून नेण्यात येणारे मांस हे गायीचेच आहे, असा आरोप करून वाहनचालकांना वेठीस धरले जाते. मात्र, विचारांवर उभी राहिलेली सामूहिक शक्ती अशा प्रकारांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. सर्व लहान व अल्पसंख्याक घटकांना बरोबर घेऊन आम्ही पुढे जाण्यासाठी सज्ज आहोत. यातून देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.’

‘आरएसएसचा अजेंडा मान्य नसल्याचे मोदींनी स्पष्ट करावे’-‘सध्याच्या घडीला गायीचे महत्त्व वाढून माणसांची किंमत कमी होऊ लागली आहे. धर्माधिष्ठित राष्ट्रवाद करण्याचा प्रयत्न निषेध करण्यायोग्यच आहे. ‘सबका साथ सबका विकास...,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, मात्र त्यांच्या बोलण्यावर अल्पसंख्याकांचा विश्वास राहिलेला नाही. सरकारच्या धोरणांमध्ये आरएसएसचा अजेंडा डोकावत असून तो मान्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा स्पष्ट करावे,’ अशी मागणी भाई वैद्य यांनी या वेळी केली.