शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"आजची वानवा असलेल्या शेतकऱ्याला २०४७ च्या गोष्टी..."; आर्थिक सर्वेक्षणावरुन दानवे आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 10:22 IST

Ambadas Danve : अर्थसंकल्पापूर्वी देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली.

Economic Survey 2024 : मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प जाहीर होण्याआधी सरकारने आर्थिक सर्वेक्षण सादर केला. या अर्थसंकल्पातून कृषी क्षेत्राचा विकास दर घरसल्याचे समोर आलं आहे. देशातील कृषी क्षेत्राचा विकास दर २०२३-२४ मध्ये १.४ टक्क्यांपेक्षा कमी होण्याचा अंदाज अर्थसंकल्पपूर्व देशाच्या आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला. भारतीय कृषी क्षेत्र सुमारे ४२.३ टक्के लोकसंख्येला उपजीविका पुरवते आणि जीडीपीत याचा १८.२ टक्के वाटा आहे. दुसरीकडे, आर्थिक सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती ही कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी ही गंभीर बाब समजली जात आहे. यावरुनच विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे.

अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झाला. यामध्ये  कृषी क्षेत्राचा विकास दर खूपच कमी झाल्याचे म्हटले आहे. कृषी क्षेत्राचा विकास दर २०२३-२४ या वर्षात १.५ टक्क्यांपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे, जो मागील वर्षाच्या आणि गेल्या ५ वर्षांच्या सरासरी विकास दराच्या एक तृतीयांशपेक्षा कमी असेल. याबाबत अंबादास दानवे यांनी भाजपने २०४७ वगैरेचा भंपकपणा आता बंद करावा, असं म्हटलं आहे. 

"देशातील आर्थिक पाहणी अहवालातून काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत.  देशातील ४३.३ टक्के लोकांना उपजीविका देणाऱ्या, जीडीपीत १२.८ वाटा असणाऱ्या कृषी क्षेत्राचा विकास दर हा अवघा १.४ टक्के इतका खाली आला आहे. केवळ किसान सन्मान योजनेचा फार्स दाखवून आता चालणार नाही. निवडणूक संपल्या आहेत, त्यामुळे २०४७ वगैरेचा भंपकपणा भाजपने आता बंद करावा. आजच्या दिवशीची वानवा असलेल्या शेतकऱ्याला २०४७ च्या गोष्टी सांगणे हे त्यासाठी निव्वळ मृगजळ आहे," असे अंबादास दानवे यांनी म्हटलं.

दरम्यान, कृषी क्षेत्राने गेल्या ५ वर्षांत स्थिर किंमतींवर सरासरी वार्षिक ४.१८ टक्के वाढ मिळवली. मात्र आर्थिक सर्वेक्षणात, २०२३-२४ या वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर केवळ १.४ टक्के असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही टक्केवारी २०२२ च्या ४.७ टक्के वाढीच्या एक तृतीयांशपेक्षा कमी आहे. तसेच, गेल्या पाच वर्षांच्या सरासरी विकासदराच्या हे प्रमाण केवळ एक तृतीयांश आहे.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेBudgetअर्थसंकल्प 2024Farmerशेतकरी