शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘भूसंपादन सुधारणा अध्यादेशाला विरोध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 04:14 IST

शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय जमिनी ताब्यात घेण्यासाठीच सरकारने भूसंपादन सुधारणा अध्यादेश जारी केला आहे. राज्यातील प्रस्तावित महामार्गांसाठी शेतकºयांच्या जमिनी सहमतीशिवाय घेता

मुंबई : शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय जमिनी ताब्यात घेण्यासाठीच सरकारने भूसंपादन सुधारणा अध्यादेश जारी केला आहे. राज्यातील प्रस्तावित महामार्गांसाठी शेतकºयांच्या जमिनी सहमतीशिवाय घेता याव्यात, यासाठी सरकारचा खटाटोप सुरू आहे. मात्र, शेतकºयांच्या सहमतीशिवाय त्यांच्या एक इंचही जमिनीचे संपादन करू देणार नाही. सरकारने काढलेल्या अध्यादेशाला विधिमंडळात विरोध करू, कोणत्याही परिस्थितीत हा कायदा बनू देणार नसल्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी स्पष्ट केले.राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, पनवेल-बडोदा महामार्ग, तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडोरला मोठ्या प्रमाणावर राजकीय विरोध होत आहे. शिवाय, काही ठिकाणी शेतकरीही प्रकल्पांना विरोध करत असल्याचे चित्र आहे. प्रकल्प मार्गी लागावेत, भूसंपादन रखडू नये, यासाठी भूसंपादनाच्या तरतुदींमध्ये सुधारणा करणारे अध्यादेश काढण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या सुधारणा अध्यादेशाला विरोधकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. प्राण गेले तरी बेहत्तर; पण सरकारला बळजबरीने जमिनी घेऊ देणार नाही. सुधारणा अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊ देणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. या अध्यादेशाच्या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा तीव्र आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.२०१३ च्या कायद्यानुसार महामार्ग किंवा कोणत्याही प्रकल्पाला खासगी जमीन आवश्यक असल्यास जमीनमालक किंवा शेतकºयांची संमती आवश्यक होती. मात्र, काही ठिकाणी विरोधामुळे जमिनी संपादित करण्यात अडचणी येत. आता या कायद्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक अध्यादेश काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.