शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भाजपचे मुसळे, रेड्डींच्या उमेदवारीवर आक्षेप

By admin | Updated: September 30, 2014 00:40 IST

भारतीय जनता पक्षाचे सावनेर मतदारसंघाचे उमेदवार सोनबा मुसळे आणि रामटेकचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे शासकीय कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेत त्यांनी दाखल केलेले

आज निकाल : शासकीय कंत्राटदार असल्याचा विरोधकांचा दावा सावनेर/रामटेक : भारतीय जनता पक्षाचे सावनेर मतदारसंघाचे उमेदवार सोनबा मुसळे आणि रामटेकचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे शासकीय कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेत त्यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत उद्या, मंगळवारपर्यंत निर्णय राखून ठेवला. भाजपचे सावनेरचे उमेदवार सोनबा मुसळे हे मुसळे कन्स्ट्रक्शनचे भागीदार असून, त्याद्वारे शासकीय कामाचे कंत्राट घेतले असल्याचा आरोप मनीष मोहोड (रा. माळेगाव) यांनी करीत लेखी तक्रार नोंदविली. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी विनोद हरकंडे मुसळे यांना सायंकाळी ५ पर्यंत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याची सूचना केली. ५ वाजता दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर उद्या सकाळपर्यंत निर्णय राखून ठेवला. यावेळी दोन्ही गटाकडील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सावनेरमध्येच एका प्रकरणात अपक्ष उमेदवार उज्ज्वलकुमार बागडे यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील केदार यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. अपूर्ण माहिती तसेच माहिती दडवून खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने उमेदवारी रद्द करण्याची लेखी तक्रार पुराव्यासह केली. मात्र उमेदवारी अर्ज छाननीची वेळ निघून गेल्यानंतर हा आक्षेप घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केदार यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला. रामटेकमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर शिवसेनचे उमेदवार अ‍ॅड. आशिष जयस्वाल आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या उमेदवार राणी राजश्रीदेवी बुलंदशहा यांनी आक्षेप नोंदविला. शासनाकडून लाभ घेत असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढता येत नाही, या कारणासाठी त्यांनी रेड्डी यांच्याविरुद्ध आक्षेप नोंदविला. याबाबत रेड्डी यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. सदर प्रकरणाबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला असून, उद्या, मंगळवारी दुपारी ३ वाजता घोषित करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. रेड्डी यांना यासंबंधात विचारले असता काही दिवसांपूर्वीच त्यांनी फर्म आरबीसीमधून सेवानिवृत्ती घेतलेली आहे. तसे प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे. परंतु ते अर्जासोबत जोडले नव्हते, असे त्यांनी सांगितले. आक्षेप घेतल्यानंतर मात्र ते प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी)