शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

गोव्यात ‘एरो डिफेन्स एक्स्पो’ प्रकल्पाला विरोध

By admin | Updated: August 10, 2015 00:41 IST

नियोजित मोपा विमानतळाला होणारा तीव्र विरोध, तेरेखोलच्या गोल्फ कोर्सविरोधात सुरू असलेले आंदोलन, अल्प जमीन क्षेत्राचा मुद्दा पुढे काढून कुंकळ्ळी येथे येणाऱ्या

सुशांत कुंकळयेकर, मडगाव नियोजित मोपा विमानतळाला होणारा तीव्र विरोध, तेरेखोलच्या गोल्फ कोर्सविरोधात सुरू असलेले आंदोलन, अल्प जमीन क्षेत्राचा मुद्दा पुढे काढून कुंकळ्ळी येथे येणाऱ्या महत्त्वाकांक्षी आयआयटीच्या विरोधात स्थानिकांचा रोेष एवढे कमी म्हणून की काय आता केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावित ‘एरो डिफेन्स एक्स्पो’ प्रकल्पही होईल की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पणजीपासून ५0 किलोमीटरवरील दक्षिण गोव्यातील नाकेरी-बेतूल गावातील प्रस्तावित प्रकल्पाविरोधात स्थानिक एकवटले आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वायुदलाचे द्विवार्षिक ‘एरो डिफेन्स एक्स्पो’ कायमस्वरुपी गोव्यात आयोजित करण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. नाकेरी-बेतूल पठारावर १५0 एकर जागेत प्रकल्प साकारण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने तयारी केली आहे. गोवा सरकारनेही त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. ‘एरो डिफेन्स एक्स्पो’मुळे गोव्यात पर्यटनाला आणखी चालना मिळेल, अशी सरकारची अपेक्षा आहे. मात्र, गोव्यातील बरीचशी जमीन यापूर्वीच भारतीय सैन्याने काबीज केलेली आहे. आता आणखी जमीन सैन्याला देऊ नका, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. सर्वात आधी राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी प्रकल्पास आक्षेप घेतला होता. मनोहर पर्रीकर विरोधी पक्षनेते असताना सैन्याच्या ताब्यातील जमिनी पुन्हा स्थानिकांना देण्याची मागणी करत होते. मात्र, संरक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांची भूमिका बदलली.माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनीही प्रकल्पाविरोधात आवाज उठवला असून गोव्यात ‘एरो डिफेन्स एक्स्पो’ भरवण्यापेक्षा या जागेचा वापर रोजगारनिर्मिती होईल, असा प्रकल्प आणण्यासाठी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.खुद्द नाकेरी गावात लोक संघटीत झाले आहेत. प्रकल्पाबद्दल पंचायतीलाही अंधारात ठेवण्यात आले. नाकेरी-बेतूल पंचायत क्षेत्रात हा प्रकल्प येतो, हे आम्हाला वृत्तपत्रांतून समजले. या प्रकल्पाबद्दल आम्हाला गोवा सरकारनेही काही सांगितले नाही व केंद्र सरकारनेही. याचीही आम्हाला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सरपंच कृष्णा देसाई यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.वास्तविक नाकेरी-बेतूल पठारावरील ही जमीन याआधी गोवा औद्योगिक विकास महामंडळाने फूडपार्कसाठी आरक्षित केली होती. मात्र, नंतर प्रकल्प बारगळला. कुंकळ्ळी गावात यापूर्वी केंद्र सरकारने आयआयटी आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जमीन नसल्याने स्थानिकांनी त्यास विरोध केल्याने प्रस्ताव गुंडाळण्याची वेळ आली होती.