शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

विरोधकांची धडपड प्रसिद्धीसाठी

By admin | Updated: August 6, 2016 03:26 IST

सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला

मुंबई : सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर पत्रपरिषदेत केली. आमदारांकडून चांगले काम अपेक्षित असेल तर त्यांना पुरेसे मानधन हे दिलेच पाहिजे, या शब्दांत त्यांनी आमदारांच्या वेतनवाढीचे समर्थन केले. आमच्या सरकारमध्ये १९ मंत्री कलंकित असल्याची आवई उठविणाऱ्या विरोधकांनी बिनबुडाचे आरोप केले. त्याऐवजी शेती, सिंचन आदी जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली असती तर बरे झाले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी सहकार्य केले नसले तरी सरकारने ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा वाढविणे, मुंबईसारखे शहर वायफाय सिटी करणे, सहकारातील भ्रष्टाचार निपटून काढणारे विधेयक तसेच शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट विकण्याची परवानगी देणारे पणन विधेयकही मंजूर केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>हे सरकार म्हणजे खोटे बोला रेटून बोलादेवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सरकार हे, ‘खोटे बोला पण रेटून बोला’ या न्यायाने चालले असून आम्ही मंत्र्यांवर केलेल्या एकाही आरोपाचे त्यांनी थेट उत्तर दिलेले नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत केला.महाडसारख्या दुर्घटनेबद्दलही सरकार गंभीर दिसले नाही. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेले एकही आश्वासन २० महिन्यांत पूर्ण केलेले नाही. कोपर्डीच्या घटनेवरून सरकारची असंवेदनशीलता दिसून आली. स्वतंत्र विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांनी संदिग्ध भूमिका घेतली. पूर्ण अधिवेशनात सरकार बॅकफुटवर होते, असे ते म्हणाले.