शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

विरोधकांची धडपड प्रसिद्धीसाठी

By admin | Updated: August 6, 2016 03:26 IST

सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला

मुंबई : सवंग लोकप्रियतेच्या मागे लागलेल्या विरोधकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याचा विसर पडला, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर पत्रपरिषदेत केली. आमदारांकडून चांगले काम अपेक्षित असेल तर त्यांना पुरेसे मानधन हे दिलेच पाहिजे, या शब्दांत त्यांनी आमदारांच्या वेतनवाढीचे समर्थन केले. आमच्या सरकारमध्ये १९ मंत्री कलंकित असल्याची आवई उठविणाऱ्या विरोधकांनी बिनबुडाचे आरोप केले. त्याऐवजी शेती, सिंचन आदी जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली असती तर बरे झाले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी सहकार्य केले नसले तरी सरकारने ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा वाढविणे, मुंबईसारखे शहर वायफाय सिटी करणे, सहकारातील भ्रष्टाचार निपटून काढणारे विधेयक तसेच शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट विकण्याची परवानगी देणारे पणन विधेयकही मंजूर केले, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>हे सरकार म्हणजे खोटे बोला रेटून बोलादेवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सरकार हे, ‘खोटे बोला पण रेटून बोला’ या न्यायाने चालले असून आम्ही मंत्र्यांवर केलेल्या एकाही आरोपाचे त्यांनी थेट उत्तर दिलेले नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रपरिषदेत केला.महाडसारख्या दुर्घटनेबद्दलही सरकार गंभीर दिसले नाही. भाजपाने जाहीरनाम्यात दिलेले एकही आश्वासन २० महिन्यांत पूर्ण केलेले नाही. कोपर्डीच्या घटनेवरून सरकारची असंवेदनशीलता दिसून आली. स्वतंत्र विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांनी संदिग्ध भूमिका घेतली. पूर्ण अधिवेशनात सरकार बॅकफुटवर होते, असे ते म्हणाले.