शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचे हात दाखवून अवलक्षण!

By admin | Updated: April 16, 2015 01:55 IST

दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात विरोधकांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतले.

श्रीनिवास नागे - सांगलीदिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात विरोधकांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतले. आबांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत विरोधक भुईसपाट झाले. निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा भाजपातील एका गटाचा डाव त्यांच्याच अंगाशी आला आणि मतदारांनी त्यांना जबर चपराक दिली.आबांच्या निधनानंतर होणाऱ्या या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनतार्इंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. सुमनतार्इंचे नाव पुढे येत असताना काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकाप, रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्षांनी येथून उमेदवार न देण्याचा निर्णय जाहीर केला. सुमनतार्इंचे नाव जाहीर होताच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही उमेदवार देणार नसल्याचे घोषित केले. मात्र या दरम्यान आबांचे कट्टर विरोधक, भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे अस्वस्थ होते. त्यांच्या गटातून घोरपडेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न झाला, पण तो फोल ठरल्याने घोरपडेंनी स्वप्नील पाटील या नवख्या उमेदवाराचे नाव पुढे केले. स्वप्नील पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामागे घोरपडेंचा गट असल्याचे लपून राहिले नाही. प्रत्यक्ष प्रचारात आणि मतदानादिवशी तर घोरपडे गटाची रसद बंडखोरामागे असल्याचे साऱ्यांनाच दिसून आले.सहानुभूतीची लाट असतानाही कोणताही धोका न पत्करता राष्ट्रवादीने दिग्गज नेत्यांची फळी प्रचारात उतरवली. घोरपडे गट विरोधात असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी त्वेषाने प्रचार केला. पाणी योजना पूर्ण करण्याचे आर. आर. आबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुमनतार्इंना निवडून देण्याचा मुद्दा राष्ट्रवादीने पुढे केला आणि आबांनी स्वत:च्या मतदारसंघात केलेल्या कामांची पोहोचपावती मतदारांनी सुमनतार्इंना मतांच्या रूपाने दिली. त्यांना तब्बल लाखाचे मताधिक्य देताना मतदारांनी विरोधकांचा पार कचरा करून टाकला. विरोधकांनी प्रचारात आणलेला घराणेशाहीच्या विरोधाचा मुद्दाही आपसूक खोडून टाकला गेला.एकंदरीत स्वत:चा गट शाबूत ठेवण्यासाठी लादलेली निवडणूक आणि विरोधासाठी विरोध करण्याची वृत्ती मतदारांनाच सहन झाली नाही. त्यांनी या निवडणुकीतून आबांच्या कार्याची धुरा सुमनतार्इंकडे सोपवत विरोधकांना चपराक दिली.च्निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हैसाळसह अन्य सिंचन योजनांच्या पाण्याचा मुद्दा अचानक प्रचारात आला होता. वीजबील-पाणीपट्टी थकल्याने म्हैसाळचे पाणी बंद होते. खरेतर त्यावेळीच तासगाव-कवठेमहांकाळच्या मतदारांना आर. आर. आबांची किंमत कळली होती. च्आबा असते तर दोन्ही तालुके पाच महिने पाण्याविना तडफडले नसते, हे वास्तव विरोधकही अमान्य करणार नाहीत. शेवटी पाणी सोडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपासह काही नेत्यांनी केला, पण पाणी सोडणे ही अपरिहार्यता होती. तसे झाले नसते तर पाण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधींना फोडले असते!