शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

विरोधकांचे हात दाखवून अवलक्षण!

By admin | Updated: April 16, 2015 01:55 IST

दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात विरोधकांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतले.

श्रीनिवास नागे - सांगलीदिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात विरोधकांनी हात दाखवून अवलक्षण करून घेतले. आबांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेत विरोधक भुईसपाट झाले. निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा भाजपातील एका गटाचा डाव त्यांच्याच अंगाशी आला आणि मतदारांनी त्यांना जबर चपराक दिली.आबांच्या निधनानंतर होणाऱ्या या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी सुमनतार्इंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. सुमनतार्इंचे नाव पुढे येत असताना काँग्रेस, शिवसेना, मनसे, शेकाप, रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी पक्षांनी येथून उमेदवार न देण्याचा निर्णय जाहीर केला. सुमनतार्इंचे नाव जाहीर होताच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही उमेदवार देणार नसल्याचे घोषित केले. मात्र या दरम्यान आबांचे कट्टर विरोधक, भाजपचे खासदार संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे अस्वस्थ होते. त्यांच्या गटातून घोरपडेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न झाला, पण तो फोल ठरल्याने घोरपडेंनी स्वप्नील पाटील या नवख्या उमेदवाराचे नाव पुढे केले. स्वप्नील पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यामागे घोरपडेंचा गट असल्याचे लपून राहिले नाही. प्रत्यक्ष प्रचारात आणि मतदानादिवशी तर घोरपडे गटाची रसद बंडखोरामागे असल्याचे साऱ्यांनाच दिसून आले.सहानुभूतीची लाट असतानाही कोणताही धोका न पत्करता राष्ट्रवादीने दिग्गज नेत्यांची फळी प्रचारात उतरवली. घोरपडे गट विरोधात असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी त्वेषाने प्रचार केला. पाणी योजना पूर्ण करण्याचे आर. आर. आबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुमनतार्इंना निवडून देण्याचा मुद्दा राष्ट्रवादीने पुढे केला आणि आबांनी स्वत:च्या मतदारसंघात केलेल्या कामांची पोहोचपावती मतदारांनी सुमनतार्इंना मतांच्या रूपाने दिली. त्यांना तब्बल लाखाचे मताधिक्य देताना मतदारांनी विरोधकांचा पार कचरा करून टाकला. विरोधकांनी प्रचारात आणलेला घराणेशाहीच्या विरोधाचा मुद्दाही आपसूक खोडून टाकला गेला.एकंदरीत स्वत:चा गट शाबूत ठेवण्यासाठी लादलेली निवडणूक आणि विरोधासाठी विरोध करण्याची वृत्ती मतदारांनाच सहन झाली नाही. त्यांनी या निवडणुकीतून आबांच्या कार्याची धुरा सुमनतार्इंकडे सोपवत विरोधकांना चपराक दिली.च्निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हैसाळसह अन्य सिंचन योजनांच्या पाण्याचा मुद्दा अचानक प्रचारात आला होता. वीजबील-पाणीपट्टी थकल्याने म्हैसाळचे पाणी बंद होते. खरेतर त्यावेळीच तासगाव-कवठेमहांकाळच्या मतदारांना आर. आर. आबांची किंमत कळली होती. च्आबा असते तर दोन्ही तालुके पाच महिने पाण्याविना तडफडले नसते, हे वास्तव विरोधकही अमान्य करणार नाहीत. शेवटी पाणी सोडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपासह काही नेत्यांनी केला, पण पाणी सोडणे ही अपरिहार्यता होती. तसे झाले नसते तर पाण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधींना फोडले असते!