शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

मुक्त विद्यापीठातर्फे लवकरच गोदा संशोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 04:15 IST

वंचितांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी १९८९ मध्ये नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. तीन दशकांत लाखो वंचितांना उच्च शिक्षण मिळाले. आता गोदावरी नदीवर संशोधनाला चालना देण्यासाठी योजना आखली आहे.

वंचितांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी १९८९ मध्ये नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. तीन दशकांत लाखो वंचितांना उच्च शिक्षण मिळाले. आता गोदावरी नदीवर संशोधनाला चालना देण्यासाठी योजना आखली आहे. सात राज्यांतून जाणाऱ्या गोदावरी नदीकाठची शास्त्रीय, परंपरा आणि समृद्धीची माहिती संकलित करणे यामुळे शक्य होणार आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांनी दिली. विद्यापीठाचा तिसावा वर्धापन दिन रविवारी साजरा होत असून, त्यानिमित्ताने त्यांनी विद्यापीठाच्या वाटचालीवर ‘लोकमत’शी संवाद साधला.वंचितांना उच्च शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या विद्यापीठाच्या वाटचालीबद्दल काय वाटते?शिक्षणापासून वंचित असलेल्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या दूरदृष्टीने या विद्यापीठाची स्थापना झाली. त्या वेळी प्रथम कुलगुरू म्हणून डॉ. राम ताकवले यांची नियुक्ती झाली. आज विद्यापीठात सहा लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. त्यात वंचितांचा वाटा मोठा आहे. विद्यापीठात सध्या ३९ हजार आदिवासी विद्यार्थी लाभ घेत असल्याचे आढळले आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ शिक्षण देत असताना अडचणी येत नाही. उलट अनेकदा कमवा आणि शिका योजनेअंतर्गत त्याचा लाभ मिळाला आहे.विद्यापीठाने गुणवत्ता वाढीसाठी काय उपक्रम हाती घेतले आहेत?शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या ठिकाणी यापुढे अभ्यासकेंद्र असणार नाही, तर शैक्षणिक वातावरणाच्या दृष्टीने वरिष्ठ महाविद्यालयातच दिले जाईल. अल्पसंख्याकांच्या शिक्षण संस्थांसाठी मात्र सूट असेल कारण त्यांना मूळ प्रवाहात आणणे हे महत्त्वाचे आहे. फार क्वचित सेवाभावी संस्थांच्या (एनजीओ) जागेत केंद्र दिले जाईल. दर्जेदार साहित्य उपलब्ध होत आहे.परीक्षा आणि निकाल यावर सर्वत्र वाद होतात, यावर काय दक्षता घेतली जाते?सर्व परीक्षा केंद्रांत सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. हे खर्चीक असले तरी महत्त्वाचे काम आहे. शिवाय विद्यापीठाने परीक्षा केंद्रावरील उत्तरपत्रिका विभागीय केंद्रामार्फत विद्यापीठात पाठविल्यानंतर स्कॅनिंग करून त्या आॅनलाइनच कॅपवर तपासण्याची सोय केली आहे. परीक्षकाला बायोमेट्रिक हजेरी सक्तीची आहे. संगणक अधूनमधून पासवर्ड विचारून परीक्षकच पेपर तपासत आहे ना, याची खात्री करून घेतो.मुक्त विद्यापीठाच्या वतीने कोणता खास उपक्रम?नाशिक हे कुसुमाग्रजांचेही स्थान असल्याने विद्यापीठाने कुसुमाग्रज अध्यासन सुरू केले आहे. त्यासाठी २ कोटींची तरतूद असते. त्या माध्यमातून गोदावरी नदीचा प्रवास आणि त्यासंदर्भातील सर्व माहितीवर संशोधन प्रकल्प राबविण्याची कल्पना पुढे आली आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अनुभव असलेले आमदार हेमंत टकले आणि अन्य मंडळींनी ही कल्पना सुचविली आहे. नाशिक (त्र्यंबकेश्वर) हे गोदावरी नदीच्या उगमस्थानी आहे. त्याच ठिकाणी हे विद्यापीठदेखील आहे. नदी, त्याभोवतीची सुपीकता, गोदाकाठची संस्कृती, भाषा, पिके अशा विषयांच्या अनुषंगाने मोठे संशोधन होऊ शकते. तेच करण्याचा मानस आहे. विद्यापीठाकडे थोडे मनुष्यबळ वाढले की काहीतरी करता येईल.नॅक आणि पारंपरिक विद्यापीठांचे आव्हान गुणवत्तेसाठी चांगलेचशासनाने आता पारंपरिक विद्यापीठांनादेखील दूरशिक्षण पद्धतीने शिक्षण देण्याची परवानगी दिली आहे. अर्थात, त्यासाठी दूरशिक्षण पद्धतीच्या शिक्षणाचे नियम त्यांना पाळावे लागणार आहेत. अशा विद्यापीठांमुळे मुक्त विद्यापीठासह देशभरातील दूरशिक्षण देणाºया संस्थांना आव्हान निर्माण होणार असले तरी ते चांगलेच आहे. नॅकच्या बाबतीतदेखील असेच आहे. दूरशिक्षण देणाºया विद्यापीठाला आता नॅक अ‍ॅक्रिडेशन बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबत निकष ठरविण्याची कामे सध्या सुरू असून, त्यामुळेच विद्यापीठांचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे.

( शब्दाकंन- संजय पाठक)

टॅग्स :Nashikनाशिक