शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पदविकाधारकांमधून राज्यभरातील कनिष्ठ अभियंत्यांची १२५६ पदे भरण्याचा मार्ग मोकळा

By admin | Updated: July 19, 2016 20:11 IST

राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची १२५६ पदे पदविकाधारकांमधून भरतीसाठीच्या जाहिरातील आव्हान देणाऱ्या

- पदवीधारकांच्या सर्व याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्याऔरंगाबाद - राज्यभरातील सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची १२५६ पदे पदविकाधारकांमधून भरतीसाठीच्या जाहिरातील आव्हान देणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. संगीतराव पाटील यांनी फेटाळल्या. परिणामी वरील पदांसाठीच्या राज्यस्तरीय नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला. या आदेशासोबतच खंडपीठाने यापुर्वी पदवीधारकांना सुद्धा वरील पदांसाठी अर्ज करण्याची दिलेली मुभा आणि राज्य शासनाने निवड प्रक्रिया राबविण्यास मान्यता देणारा अंतरीम आदेश खंडपीठाने रद्द केला.राज्यस्तरीय निवड समितीने १५ फेब्रुवारी २०१६ रोजी सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ची १२५६ पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती. वरील पदांसाठी केवळ ह्यपदविकाधारकांकडूनह्ण अर्ज मागविले होते. या जाहिरातीस बीड येथील पदवीधारक संग्राम घोळवे व इतर यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) आव्हान दिले. अर्जदार हे पदवीधारक उच्च विद्याविभूषित आहेत. वरील पदांसाठी त्यांना अर्ज करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती, ती मॅटने फेटाळली. म्हणून वरील अर्जदारांनी औरंगाबाद खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या होत्या. . त्यांचे असे म्हणणे होते की, ते उच्च विद्याविभूषित आहेत. त्यामुळे पदविकाधारकांऐवजी त्यांचा विचार व्हावयास हवा. राज्य शासनाची वरील पदांसाठीची निवड प्रक्रिया मनमानी आणि असंवैधानीक आहे, ती रद्द करुन याचिकाधारकांनाही वरीलपदांसाठी अर्ज करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. याचिकेच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, कनिष्ठ अभियंत्यांच्या पदांचे वेगवेगळे संवर्ग तयार करण्यात आले आहेत. ह्यपदविकाधारकह्ण कनिष्ठ अभियंते हे अराजपत्रित अधिकारी अससुन ह्यपदवीधारकह्ण हे राजपत्रित अधिकारी दर्जाचे असतात. राजपत्रित आणि अराजपत्रित कनिष्ठ अभियंत्यांचे ७५ आणि २५ टक्के प्रमाण निश्चित केलेले आहे. राज्यघटनेच्या कलम ३०९ नुसार राज्य शासनाने हे नियम तयार केलेले आहेत. पदवीकाधारक आणि पदवीधारकांच्या बढतीचे नियम सुद्धा वेगवेगळे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निवाड्यांचा संदर्भ देत गिरासे यांनी वरील पदांसाठीची संवर्गनिहाय भरती योग्य असल्याचे प्रतिपादन केले. तसेच सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एखादी जाहिरात दिल्यानंतर त्यासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत संपल्यानंतर जाहिरातीलच्या नियमात बदल करता येत नाहीत याकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. सुनावणीअंती खंडपीठाने सर्व याचिका फेटाळल्या. गिरासे यांना अ‍ॅड. एस.के. कदम आणि अ‍ॅड.विशाल बडक यांनी सहकार्य केले.