शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

...तरच बाबासाहेबांना खरी आदरांजली - राज्यपाल

By admin | Updated: April 15, 2016 02:04 IST

‘समता, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांच्या आधारे समाजनिर्मितीसाठी झटत राहणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव

मुंबई : ‘समता, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांच्या आधारे समाजनिर्मितीसाठी झटत राहणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी काढले. मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी होती आणि सुमारे चार दशके त्यांनी या शहरात व्यतीत केली, त्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा जागोजागी आढळतात. मुंबई महानगराशी असलेले बाबासाहेबांचे हे नाते, तसेच त्यांचे अलौकिक जीवन बृहन्मुंबई महानगरपालिकेने उत्कृष्ट अशा ‘कॉफी टेबल बुक’च्या माध्यमातून साकारले आहे, असेही त्यांनी नमूद केले.बृहन्मुंबई महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चा प्रकाशन सोहळा राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, ‘कॉफी टेबल बुक’चे लेखक व संपादक डॉ. नरेंद्र जाधव, ‘कॉफी टेबल बुक’ प्रशासकीय कामकाज समितीच्या अध्यक्षा व अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे उपस्थित होत्या. या प्रकाशन समारंभास विशेष अतिथी म्हणून शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषामंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, आमदार विजय गिरकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, काटोल मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष रणजित देशमुख हे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट पुस्तकांमध्ये त्याची गणना केली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि विचारांच्या आधारे आपण बलशाली देश घडविण्याच्या प्रक्रियेत सामील आहोत. विकासाच्या या प्रक्रियेत सर्वांनी योगदान द्यावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, ‘विसाव्या शतकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुद्रा उमटली आहे. समाजातील निराश्रित आणि पीडित घटकाला आपण माणूस आहोत, याची जाणीव करून देतानाच त्यांच्या हक्कांसाठी यांनी संघर्ष केला.’ (प्रतिनिधी)