शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

...तरच बाबासाहेबांना खरी आदरांजली - राज्यपाल

By admin | Updated: April 15, 2016 02:04 IST

‘समता, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांच्या आधारे समाजनिर्मितीसाठी झटत राहणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव

मुंबई : ‘समता, न्याय आणि प्रतिष्ठा या मूल्यांच्या आधारे समाजनिर्मितीसाठी झटत राहणे, हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल,’ असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी काढले. मुंबई डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी होती आणि सुमारे चार दशके त्यांनी या शहरात व्यतीत केली, त्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा जागोजागी आढळतात. मुंबई महानगराशी असलेले बाबासाहेबांचे हे नाते, तसेच त्यांचे अलौकिक जीवन बृहन्मुंबई महानगरपालिकेने उत्कृष्ट अशा ‘कॉफी टेबल बुक’च्या माध्यमातून साकारले आहे, असेही त्यांनी नमूद केले.बृहन्मुंबई महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘कॉफी टेबल बुक’चा प्रकाशन सोहळा राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजय मेहता, ‘कॉफी टेबल बुक’चे लेखक व संपादक डॉ. नरेंद्र जाधव, ‘कॉफी टेबल बुक’ प्रशासकीय कामकाज समितीच्या अध्यक्षा व अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे उपस्थित होत्या. या प्रकाशन समारंभास विशेष अतिथी म्हणून शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषामंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे, आमदार विजय गिरकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, काटोल मतदारसंघाचे आमदार डॉ. आशिष रणजित देशमुख हे उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट पुस्तकांमध्ये त्याची गणना केली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान आणि विचारांच्या आधारे आपण बलशाली देश घडविण्याच्या प्रक्रियेत सामील आहोत. विकासाच्या या प्रक्रियेत सर्वांनी योगदान द्यावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, ‘विसाव्या शतकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुद्रा उमटली आहे. समाजातील निराश्रित आणि पीडित घटकाला आपण माणूस आहोत, याची जाणीव करून देतानाच त्यांच्या हक्कांसाठी यांनी संघर्ष केला.’ (प्रतिनिधी)