शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

देशाच्या उत्थानासाठी संघ हाच पर्याय

By admin | Updated: January 4, 2016 03:59 IST

देशातील विविधतांचा स्वीकार करून सर्वांना एकत्र बांधण्यासाठी हिंदुत्व हे एकमेव सूत्र आहे. केवळ सरकार व नेत्यांच्या भरवशावर देश वाढणार नाही. हा देश प्रामाणिकपणे उभा करायचा असेल

पुणे : देशातील विविधतांचा स्वीकार करून सर्वांना एकत्र बांधण्यासाठी हिंदुत्व हे एकमेव सूत्र आहे. केवळ सरकार व नेत्यांच्या भरवशावर देश वाढणार नाही. हा देश प्रामाणिकपणे उभा करायचा असेल, तर ती योग्यता मिळवून देणारा संघ हा एकमेव मार्ग आहे. कुणाचाही विरोध न करता व कुणाच्याही ओळखीचा धिक्कार न करता संघ देशाला हे परमवैभव मिळवून देईल, असे प्रतिपादन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे हिंदुत्वाची व समरसतेची हाक दिली. पुण्याजवळील जांभे, मारुंजी व नेरे या गावांच्या सीमांवर संघाच्या पश्चिम प्रांताचा आज विराट असा शिवशक्ती संगम झाला. या वेळी सुमारे दीड लाख संघ स्वयंसेवकांची उपस्थिती होती. २०० फूट लांब आणि १०० फूट रुंद असे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपीठाच्या मागे तोरणा किल्ल्याचे चित्र, राजगडावरील सदरेची प्रतिकृती आणि रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृतीत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती उभारण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांसह मंत्री, आमदार, खासदार, शंकराचार्य व अनेक संतमहंतांची या संगमाला उपस्थिती होती. शिवाजीमहाराजांच्या राज्यकारभाराचा दाखला देत भागवत यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘शिवत्वाची’ आपली परंपरा आहे. शिवरायांनी अखिल भारतीय विचार डोळ्यांसमोर ठेवला. स्वकीयांच्या राज्यासाठी ते झगडले. आजही शिव व शक्ती यांचा संगम आवश्यक आहे. शक्तीशिवाय सत्तेला महत्त्व प्राप्त होत नाही. देशाची शक्ती वाढली तरच सत्तेची प्रतिष्ठा वाढते हा जगाचा न्याय आहे. देशात विविधता आहे. तिच्याकडे भेददृष्टीने पाहू नका. समदृष्टीने पहा. सत्यात भेद व विषमता याला स्थान नाही. कायद्याने विषमता जाणार नाही, ती मनातून जायला हवी. निरनिराळ्या भेदांनी पोखरलेला समाज कितीही मोठा असला तरी त्याची माती व्हायला वेळ लागणार नाही. सुसंघटित व सर्वांची चिंता करणारा समाज असला तरच तो आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो, असे सांगून भागवत यांनी सामाजिक समरसतेचा मुद्दाही मांडला. दोन हजार वर्षे ज्यू विखुरलेले होते; परंतु समाजाचा संकल्प दृढ होता म्हणून बलवान असे इस्रायल राष्ट्र आज उभे राहिले, याचा दाखलाही त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही म्हणाले होते की, आपल्यात राजकीय एकता आली; पण आर्थिक व सामाजिक एकता आल्याशिवाय ही एकता टिकणार नाही. भेदांमुळे आपला देश अनेकदा गुलामगिरीत गेला. गुणवत्तासंपन्न समाज निर्माण झाल्याशिवाय हे शक्य नाही, हे डॉ. केशव हेडगेवारांनी ओळखले होते.