शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

देशाच्या उत्थानासाठी संघ हाच पर्याय

By admin | Updated: January 4, 2016 03:59 IST

देशातील विविधतांचा स्वीकार करून सर्वांना एकत्र बांधण्यासाठी हिंदुत्व हे एकमेव सूत्र आहे. केवळ सरकार व नेत्यांच्या भरवशावर देश वाढणार नाही. हा देश प्रामाणिकपणे उभा करायचा असेल

पुणे : देशातील विविधतांचा स्वीकार करून सर्वांना एकत्र बांधण्यासाठी हिंदुत्व हे एकमेव सूत्र आहे. केवळ सरकार व नेत्यांच्या भरवशावर देश वाढणार नाही. हा देश प्रामाणिकपणे उभा करायचा असेल, तर ती योग्यता मिळवून देणारा संघ हा एकमेव मार्ग आहे. कुणाचाही विरोध न करता व कुणाच्याही ओळखीचा धिक्कार न करता संघ देशाला हे परमवैभव मिळवून देईल, असे प्रतिपादन करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे हिंदुत्वाची व समरसतेची हाक दिली. पुण्याजवळील जांभे, मारुंजी व नेरे या गावांच्या सीमांवर संघाच्या पश्चिम प्रांताचा आज विराट असा शिवशक्ती संगम झाला. या वेळी सुमारे दीड लाख संघ स्वयंसेवकांची उपस्थिती होती. २०० फूट लांब आणि १०० फूट रुंद असे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. व्यासपीठाच्या मागे तोरणा किल्ल्याचे चित्र, राजगडावरील सदरेची प्रतिकृती आणि रायगडावरील मेघडंबरीच्या प्रतिकृतीत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती उभारण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांसह मंत्री, आमदार, खासदार, शंकराचार्य व अनेक संतमहंतांची या संगमाला उपस्थिती होती. शिवाजीमहाराजांच्या राज्यकारभाराचा दाखला देत भागवत यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘शिवत्वाची’ आपली परंपरा आहे. शिवरायांनी अखिल भारतीय विचार डोळ्यांसमोर ठेवला. स्वकीयांच्या राज्यासाठी ते झगडले. आजही शिव व शक्ती यांचा संगम आवश्यक आहे. शक्तीशिवाय सत्तेला महत्त्व प्राप्त होत नाही. देशाची शक्ती वाढली तरच सत्तेची प्रतिष्ठा वाढते हा जगाचा न्याय आहे. देशात विविधता आहे. तिच्याकडे भेददृष्टीने पाहू नका. समदृष्टीने पहा. सत्यात भेद व विषमता याला स्थान नाही. कायद्याने विषमता जाणार नाही, ती मनातून जायला हवी. निरनिराळ्या भेदांनी पोखरलेला समाज कितीही मोठा असला तरी त्याची माती व्हायला वेळ लागणार नाही. सुसंघटित व सर्वांची चिंता करणारा समाज असला तरच तो आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो, असे सांगून भागवत यांनी सामाजिक समरसतेचा मुद्दाही मांडला. दोन हजार वर्षे ज्यू विखुरलेले होते; परंतु समाजाचा संकल्प दृढ होता म्हणून बलवान असे इस्रायल राष्ट्र आज उभे राहिले, याचा दाखलाही त्यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही म्हणाले होते की, आपल्यात राजकीय एकता आली; पण आर्थिक व सामाजिक एकता आल्याशिवाय ही एकता टिकणार नाही. भेदांमुळे आपला देश अनेकदा गुलामगिरीत गेला. गुणवत्तासंपन्न समाज निर्माण झाल्याशिवाय हे शक्य नाही, हे डॉ. केशव हेडगेवारांनी ओळखले होते.