शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

नक्षल्यांना शरणागती हाच पर्याय- सतीश माथूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 04:22 IST

गडचिरोलीतील जंगलात रविवारी नक्षलविरोधी पथकाने दोघा कमांडरसह १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.

मुंबई : नक्षलवाद्यांच्या चळवळीमध्ये नेतृत्व व गटातटावरून दुफळी निर्माण झाली असून, त्यातून अनेक अंतर्गत बाबींची इत्यंभूत माहिती आम्हाला मिळत आहे. त्यामुळे नक्षल्यांना हत्यारे खाली ठेवून शरणागती पत्करणे हाच एकमेव पर्याय उरला आहे. त्यांनी आत्मसमर्पण करून स्वत:च्या व राज्याच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सोमवारी केले.गडचिरोलीतील जंगलात रविवारी नक्षलविरोधी पथकाने दोघा कमांडरसह १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. राज्य पोलीस दलाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. त्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस महासंचालक माथूर म्हणाले,‘भामरागड येथील कस्नासूर जंगलात नक्षली जमल्याची माहिती मिळाल्यानंतर, पथकाने सुमारे दीड तास कारवाई करून १६ जणांना ठार केले. त्यापैकी ११ जणांची ओळख पटली असून, यांच्यावर तब्बल ७६ लाखांचे बक्षिसे जाहीर करण्यात आलेली होती. त्यातील साईनाथ उर्फ डोलेश हा पेरमिली दलमचा म्होरक्या असून, त्याच्यावर तब्बल ७५ गुन्हे दाखल होते. त्याच्याकडून एके ४७ जप्त केले आहे. २०१६ साली पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. अन्य ५ मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.नक्षली चळवळीबाबत विविध मते व्यक्त केली जात असली, तरी न्यायालयाने ज्यांना दोषी ठरविले आहे, त्यांच्यावर कारवाई होणारच, असे सांगून माथूर म्हणाले, ‘नक्षलवाद्यांमध्ये विविध कारणांमुळे फूट पडली असल्याने, आम्हाला आता त्यांच्या हालचालींची तत्काळ(पिंक पाइट) माहिती मिळत आहे.त्यामुळे कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा शरणागती पत्करणे, हाच त्यांच्यासाठी एकमेव चांगला पर्याय आहे. राज्य सरकारने त्यांच्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यानंतर, गेल्या ६ वर्षांत ६०५ जणांनी आत्मसर्मपण केले असून, त्यांच्या विकासासाठी ७ कोटींची मदत करण्यात आली आहे. गेल्या चार-पाच वर्षांत जवळपास ६० नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला असून, या कालावधीत अभियानातील एकही जवानाला कोणतीही दुखापत झालेली नाही.’आता ‘फूट पेट्रोलिंग’वर भर ते म्हणाले, ‘नक्षलविरोधी अभियानामध्ये अद्यावत शस्त्रसामुग्रीचा समावेश करण्यात आला असून, जवानांना एनएसजी कमांडोकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलिसांच्या वाहनांवर हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे आता ‘फूट पेट्रोलिंग’वर भर देण्यात येत आहे.अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १२६ जणांना वेगवर्धित पदोन्नती दिली असून, नुकत्याच एका अधिकाºयाला निरीक्षक पदाचे प्रमोशन दिले आहे. नक्षलवादी भागात विविध प्रकारच्या सुधारणांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, त्याला ५० कोटींपर्यंतचा निधी खर्च करण्याचे अधिकार आहेत.’

टॅग्स :naxaliteनक्षलवादी