शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

नक्षल्यांना शरणागती हाच पर्याय- सतीश माथूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 04:22 IST

गडचिरोलीतील जंगलात रविवारी नक्षलविरोधी पथकाने दोघा कमांडरसह १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.

मुंबई : नक्षलवाद्यांच्या चळवळीमध्ये नेतृत्व व गटातटावरून दुफळी निर्माण झाली असून, त्यातून अनेक अंतर्गत बाबींची इत्यंभूत माहिती आम्हाला मिळत आहे. त्यामुळे नक्षल्यांना हत्यारे खाली ठेवून शरणागती पत्करणे हाच एकमेव पर्याय उरला आहे. त्यांनी आत्मसमर्पण करून स्वत:च्या व राज्याच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सोमवारी केले.गडचिरोलीतील जंगलात रविवारी नक्षलविरोधी पथकाने दोघा कमांडरसह १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. राज्य पोलीस दलाची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. त्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलीस महासंचालक माथूर म्हणाले,‘भामरागड येथील कस्नासूर जंगलात नक्षली जमल्याची माहिती मिळाल्यानंतर, पथकाने सुमारे दीड तास कारवाई करून १६ जणांना ठार केले. त्यापैकी ११ जणांची ओळख पटली असून, यांच्यावर तब्बल ७६ लाखांचे बक्षिसे जाहीर करण्यात आलेली होती. त्यातील साईनाथ उर्फ डोलेश हा पेरमिली दलमचा म्होरक्या असून, त्याच्यावर तब्बल ७५ गुन्हे दाखल होते. त्याच्याकडून एके ४७ जप्त केले आहे. २०१६ साली पोलिसांवर केलेल्या हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. अन्य ५ मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.नक्षली चळवळीबाबत विविध मते व्यक्त केली जात असली, तरी न्यायालयाने ज्यांना दोषी ठरविले आहे, त्यांच्यावर कारवाई होणारच, असे सांगून माथूर म्हणाले, ‘नक्षलवाद्यांमध्ये विविध कारणांमुळे फूट पडली असल्याने, आम्हाला आता त्यांच्या हालचालींची तत्काळ(पिंक पाइट) माहिती मिळत आहे.त्यामुळे कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा शरणागती पत्करणे, हाच त्यांच्यासाठी एकमेव चांगला पर्याय आहे. राज्य सरकारने त्यांच्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यानंतर, गेल्या ६ वर्षांत ६०५ जणांनी आत्मसर्मपण केले असून, त्यांच्या विकासासाठी ७ कोटींची मदत करण्यात आली आहे. गेल्या चार-पाच वर्षांत जवळपास ६० नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला असून, या कालावधीत अभियानातील एकही जवानाला कोणतीही दुखापत झालेली नाही.’आता ‘फूट पेट्रोलिंग’वर भर ते म्हणाले, ‘नक्षलविरोधी अभियानामध्ये अद्यावत शस्त्रसामुग्रीचा समावेश करण्यात आला असून, जवानांना एनएसजी कमांडोकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलिसांच्या वाहनांवर हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे आता ‘फूट पेट्रोलिंग’वर भर देण्यात येत आहे.अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १२६ जणांना वेगवर्धित पदोन्नती दिली असून, नुकत्याच एका अधिकाºयाला निरीक्षक पदाचे प्रमोशन दिले आहे. नक्षलवादी भागात विविध प्रकारच्या सुधारणांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून, त्याला ५० कोटींपर्यंतचा निधी खर्च करण्याचे अधिकार आहेत.’

टॅग्स :naxaliteनक्षलवादी