शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

एकहाती सत्तेचे फक्त इमलेच!

By admin | Updated: February 20, 2017 01:28 IST

देशातील पहिल्या १० शहरांमध्ये समावेश झालेली स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास आलेल्या गिरणगावाला नवी ओळख प्राप्त होत असताना

राजा मानेसोलापूर : देशातील पहिल्या १० शहरांमध्ये समावेश झालेली स्मार्ट सिटी म्हणून नावारूपास आलेल्या गिरणगावाला नवी ओळख प्राप्त होत असताना येथे होत असलेली महापालिकेची निवडणूकही शहराच्या राजकारणाला नवी ओळख देण्याच्या तयारीला लागली आहे. संपूर्ण राज्याला लागणाऱ्या शालेय गणवेशात तब्बल ५० टक्के वाटा उचलणाऱ्या या ‘गारमेंट व युनिफॉर्म हब’चे प्रश्न जसे वेगळे आहेत तसे इथल्या मतदारांची मानसिकताही कमालीची वैविध्यपूर्ण आहे. जात आणि नात्या-गोत्यांच्या पारंपरिक विषयांबरोबरच येथे भाषा, रहिवासाचा भाग आणि उदरनिर्वाहाच्या साधनांचाही परिणाम होतो. त्याच परिणामाचा लाभ साधण्याचे कौशल्य कोण प्राप्त करतो यावरच त्याचे विजयाचे गणित ठरते.तसे वर्षानुवर्षे सोलापूर शहराचे राजकारण शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या इशाऱ्यावरच चालायचे. जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाकडे डोळेझाक करण्याच्या अलिखित करारावर तसे सोलापूरचे राजकारण आणि निर्णय पवारांनीही शिंदेंच्याच हवाली केलेले होते. शिंदेंचे विश्वासू स्व. विष्णुपंत तथा तात्या कोठे हे ‘शॅडो शिंदे’ न्यायाने शहराचे राजकारण हाताळत असायचे. काळाच्या महिम्याने शिंदेंच्या कन्या प्रणिती आणि कोठेंचे चिरंजीव महेश यांच्यातील राजकीय संघर्षाने गणित बिघडले आणि कोठे परिवार शिंदे विरोधक बनला. पुढे तात्यांच्या निधनानंतर कोठे परिवाराचा शिंदेविरोधी संघर्ष अधिकच तीव्र झाला आणि कोठे परिवार शिवसेनानिवासी झाला. हा संदर्भ काँग्रेसच्या या निवडणुकीतील राजकारणात किती रंग भरणार हे निकालच ठरवेल.आ. प्रणिती शिंदे यांनी स्वत:च्या शैलीत आक्रमक पद्धतीने केलेली शहराच्या राजकारणाची मांडणी, त्याला सुशीलकुमार शिंदे यांच्या पारंपरिक मुरब्बी राजकारणाची मिळणारी जोड हीच काँग्रेसची जमेची बाजू आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे मार्केटिंग करण्याचा नारा देत शहरात भाजप संघटन वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची पारंपरिक लिंगायत व्होट बँक आहे. तिला इतर जातीने विस्तारित करण्याचा त्यांचा प्रयत्न चालला आहे. महेश कोठे-देवेंद्र कोठे परिवाराची व्होट बँक या मुद्दलावर शिवसेनेने आव्हान निर्माण केले आहे. कामगार चळवळीच्या प्रामाणिक बळावर कॉ. नरसय्या आडम मास्तर संघर्षाला सज्ज झाले आहेत. एमआयएम पक्षाची नक्की ताकद किती याचा अंदाज अनेक जण घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्याच गर्दीने ग्रासला आहे.आरपीआय (आ)चे नूतन प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, रिपाइं (गवई)चे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, रिपाइं (पीजी)चे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गायकवाड, पीरिप (कवाडे) प्रदेश उपाध्यक्ष राजा इंगळे आणि बसपाचे प्रदेश महासचिव अ‍ॅड.संजीव सदाफुले, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोकरे यांच्या माध्यमातून आंबेडकरी मते कोण कशी खेचते हेही महत्त्वाचे ठरेल.शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण आणि त्यांची टीम कोठेंच्या शक्तीत कशी भर टाकणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी दोन देशमुख आणि खा.शरद बनसोडे यांची मोट बांधून पक्षाचे बळ वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतात.स्मार्ट प्रश्नांची निवडणूक शहरातल्या गलिच्छ वस्त्या, नागरी सुविधा आणि पिण्याच्या पाण्याची ओरड यावर जुजबी मलमपट्टी करणारा प्रचार सगळीकडे दिसतो. सर्वच राजकीय पक्ष स्मार्ट प्रश्नांवर आणि स्मार्ट सिटीवर मोठमोठी आश्वासने देऊन मतदारांची स्वप्ने रंगविताना दिसतात.