शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ग्रामीण भागाचा विकास झाला तरच महाराष्ट्राचा विकास - अरुण बोंगिरवार

By admin | Updated: July 1, 2016 20:45 IST

महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासानेच राज्याचा विकास साधता येणार आहे.

मुंबई : महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासानेच राज्याचा विकास साधता येणार आहे. ही बाब ध्यानात घेवूनच माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीवर लक्ष्य केंद्रीत केले होते, असे मत राज्याचे मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे वसंतराव नाईक यांच्या १०३व्या जयंती दिनानिमित्त प्रतिष्ठेच्या वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोंगिरवार बोलत होते. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण व्हायला हवा, यासाठी वसंतगराव नाईक आग्रही होते. दोन वर्षात तसे झाले नाही तर फाशी घेईन, अशी घोषणाच त्यांनी केली होती. जास्त वाणाचे पीक, हायब्रीड ज्वारी उत्पादनाकडे वसंतरावांनी विशेष लक्ष्य दिले. केवळ संशोधनाच्या माध्यमातूनच प्रगतीशील आणि उन्नतीशील शेती शक्य आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळ त्यांनी राज्यात चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली, असे बोंगिरवार यांनी सांगितले. सामाईक कृषी पुरस्कारासह एकूण १२ विभागात पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाईक कृषी पुरस्कारासाठी ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. तर, उर्वरीत ११ विभागांसाठी २१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.मान्यवरांची अनुपस्थितीदरवर्षी मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत कृषी पुरस्कारांचे वितरण होते. यंदा मात्र सर्वच बड्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. यंदाचे विविध विभागातील वसंतराव नाईक कृषी पुरस्कार पुढीलप्रमाणे : सामाईक पुरस्कार (उगम फाऊंडेशन, कायर्वाह- भाई संपतराव पवार, जि. सांगली); कृषि पुरस्कार ( डॉ. एम.एस. लादानिया. संचालक, केंद्रीय लिबूंवर्गीय संशोधन केंद्र, नागपूर); कृषी प्रक्रीया पुरस्कार (गौण वनऊपज व्यवस्थापन समिती, संचालक उल्हास कुमरे/ विजय मडवी. जि. नांदेड ); कृषी पत्रकारीता पुरस्कार ( संतोष काशिनाथ डुकरे, सल्लागार संपादक, कृषीकिंग मासिक आणि अ‍ॅप, जि. पुणे); कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार (विलास हरिभाऊ धुर्जड, जि. नाशिक); फलोत्पादन ( उन्मेष लांडे, जि.वाशिम); भाजीपाला उत्पादन ( दत्तु ढगे जि. नाशिक) ; फुलशेती उत्पादन पुरस्कार ( वृंदावन पुष्पोत्पादन संघ, अध्यक्ष- सुरेश नवसू ,जि. पालघर); वनशेती पुरस्कार (परशुराम तानू आगीवाले, जि. रायगड); पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पुरस्कार (इसाक चाऊस, जि. सांगली); जलसंधारण पुरस्कार ( लालासाहेब बापूसाहेब देशमुख, जि. लातूर); पर्यावरण संरक्षण पुरस्कार (अल्पाइड एन्व्हायरमेंटल रिसर्च फाऊंडेशन, डॉ. अचर्ना गोडबोले, पुणे)