शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागाचा विकास झाला तरच महाराष्ट्राचा विकास - अरुण बोंगिरवार

By admin | Updated: July 1, 2016 20:45 IST

महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासानेच राज्याचा विकास साधता येणार आहे.

मुंबई : महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रीत करावे लागणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासानेच राज्याचा विकास साधता येणार आहे. ही बाब ध्यानात घेवूनच माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी शेतीवर लक्ष्य केंद्रीत केले होते, असे मत राज्याचे मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे वसंतराव नाईक यांच्या १०३व्या जयंती दिनानिमित्त प्रतिष्ठेच्या वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोंगिरवार बोलत होते. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण व्हायला हवा, यासाठी वसंतगराव नाईक आग्रही होते. दोन वर्षात तसे झाले नाही तर फाशी घेईन, अशी घोषणाच त्यांनी केली होती. जास्त वाणाचे पीक, हायब्रीड ज्वारी उत्पादनाकडे वसंतरावांनी विशेष लक्ष्य दिले. केवळ संशोधनाच्या माध्यमातूनच प्रगतीशील आणि उन्नतीशील शेती शक्य आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळ त्यांनी राज्यात चार कृषी विद्यापीठांची स्थापना केली, असे बोंगिरवार यांनी सांगितले. सामाईक कृषी पुरस्कारासह एकूण १२ विभागात पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाईक कृषी पुरस्कारासाठी ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. तर, उर्वरीत ११ विभागांसाठी २१ हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.मान्यवरांची अनुपस्थितीदरवर्षी मुख्यमंत्री, कृषीमंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत कृषी पुरस्कारांचे वितरण होते. यंदा मात्र सर्वच बड्या नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. यंदाचे विविध विभागातील वसंतराव नाईक कृषी पुरस्कार पुढीलप्रमाणे : सामाईक पुरस्कार (उगम फाऊंडेशन, कायर्वाह- भाई संपतराव पवार, जि. सांगली); कृषि पुरस्कार ( डॉ. एम.एस. लादानिया. संचालक, केंद्रीय लिबूंवर्गीय संशोधन केंद्र, नागपूर); कृषी प्रक्रीया पुरस्कार (गौण वनऊपज व्यवस्थापन समिती, संचालक उल्हास कुमरे/ विजय मडवी. जि. नांदेड ); कृषी पत्रकारीता पुरस्कार ( संतोष काशिनाथ डुकरे, सल्लागार संपादक, कृषीकिंग मासिक आणि अ‍ॅप, जि. पुणे); कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार (विलास हरिभाऊ धुर्जड, जि. नाशिक); फलोत्पादन ( उन्मेष लांडे, जि.वाशिम); भाजीपाला उत्पादन ( दत्तु ढगे जि. नाशिक) ; फुलशेती उत्पादन पुरस्कार ( वृंदावन पुष्पोत्पादन संघ, अध्यक्ष- सुरेश नवसू ,जि. पालघर); वनशेती पुरस्कार (परशुराम तानू आगीवाले, जि. रायगड); पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पुरस्कार (इसाक चाऊस, जि. सांगली); जलसंधारण पुरस्कार ( लालासाहेब बापूसाहेब देशमुख, जि. लातूर); पर्यावरण संरक्षण पुरस्कार (अल्पाइड एन्व्हायरमेंटल रिसर्च फाऊंडेशन, डॉ. अचर्ना गोडबोले, पुणे)