शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनातच सरली ९ वर्षे

By admin | Updated: August 29, 2016 03:49 IST

शहराच्या पुढील २० वर्षांतील लोकसंख्या व क्षेत्रवाढीचा विचार करून मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा (डीपी) तयार केला जातो.

पुणे : शहराच्या पुढील २० वर्षांतील लोकसंख्या व क्षेत्रवाढीचा विचार करून मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा (डीपी) तयार केला जातो. पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम फेब्रुवारी २००७ पासून सुरू झाले असून, त्याला ९ वर्षे उलटून गेली, तरी अद्याप अंतिम मंजुरी देण्यात आलेली नाही. महापालिकेने मुदतीत आराखडा तयार केला नाही म्हणून तो ताब्यातून काढून घेणाऱ्या राज्य शासनाने एक वर्ष उलटले, तरी अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही. बिल्डरांचे हितसंबंध जोपासण्याच्या वाटाघाटी सुरू असल्याने उशीर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.महापालिकेच्या मागील विकास आराखड्याची ५ जानेवारी १९८७ पासून अंमलबजावणी सुरू झाली. सध्या त्याच विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरू आहे. नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी २३ फेब्रुवारी २००७ मध्ये इरादा जाहीर करण्यात आला. त्यानंतर नगरअभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावर शहराचा पुढील २० वर्षांचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. महापालिका प्रशासनाला डीपी तयार करण्यास साडेतीन वर्षे लागली. प्रशासनाने २०११ मध्ये डीपी नियोजन समितीकडे सोपविला. हा डीपी जाहीर करून त्यावर नागरिकांच्या हरकती नोंदविण्यात आल्या. नागरिकांनी ८७ हजार हरकती नोंदविल्याने त्यांची सुनावणी घेण्यातही बराच कालावधी लोटला. त्यानंतर महापालिकेच्या मुख्यसभेकडून लगेच मान्यता मिळणे अपेक्षित होते. मात्र, डीपी तयार करताना कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाल्याने मुख्यसभेकडून त्याला मंजुरी मिळण्यास विलंब झाला. दरम्यान, मुदत संपल्याचे कारण दाखवून राज्य शासनाने पालिकेच्या ताब्यातून डीपी काढून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे दिला. शहरामध्ये आरोग्य, उद्याने, खेळाची मैदाने आदी सुविधा देण्यासाठी टाकण्यात आलेली तब्बल ३९० आरक्षणे शासन नियुक्त समितीने उठविली आहेत. त्यामुळे पुढील काळात उद्याने, दवाखाने व खेळांची मैदाने यासाठी जागाच उपलब्ध असणार नाही. आरक्षणे उठवून शहर नियोजनाच्या गाभ्यावर घाला घालण्यात आला आहे. ही आरक्षणे पूर्ववत ठेवण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.स्मार्ट सिटी गवगवा; डीपीकडे दुर्लक्षशहर खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी विकास आराखड्याचे खूप महत्त्व आहे. एकीकडे केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारकडून स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटला जात असताना, विकास आराखड्याला मंजुरी देण्यास मात्र टाळाटाळ केली जात आहे. बांधकाम व्यावसायिकांनी दबावापोटी याला मंजुरी देण्यास उशीर होत असल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भाजपाच्या आमदारांना डीपीमध्ये काय बदल हवे आहेत, हे जाणून त्यांची स्वतंत्र बैठक घेतली.शहरांच्या वाढीमध्ये विकास आराखड्याला प्रचंड महत्त्व असते. शहरातील नागरिकांना पाणी, रस्ते, शाळा, आरोग्य, सांडपाणी व्यवस्था, उद्याने पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यासाठी महापालिकेला आवश्यक असलेल्या जागांवर आरक्षणे टाकणे, शहराचा विकास कोणत्या दिशेने झाला पाहिजे याची निश्चिती करणे आदी बाबींची पूर्तता विकास आराखड्यामध्ये केली जाते. विकास आराखड्याबरोबर बांधकाम विकास नियमावली (डिसी रूल) निश्चित केली जाते. त्यामध्ये घरांना बांधकामासाठी किती एफएसआय उपलब्ध असेल, टीडीआर वापरण्याचे धोरण काय असेल, बांधकाम परवानग्याची प्रक्रिया कशी असेल, याबाबत नियम ठरविले जातात. दर २० वर्षांनी या नियमांचा आढावा घेऊन त्यामध्ये सुधारणा होत असल्याने ते खूप महत्त्वाचे असतात.