शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नियोजनातच सरली ९ वर्षे

By admin | Updated: August 29, 2016 03:49 IST

शहराच्या पुढील २० वर्षांतील लोकसंख्या व क्षेत्रवाढीचा विचार करून मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा (डीपी) तयार केला जातो.

पुणे : शहराच्या पुढील २० वर्षांतील लोकसंख्या व क्षेत्रवाढीचा विचार करून मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा (डीपी) तयार केला जातो. पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम फेब्रुवारी २००७ पासून सुरू झाले असून, त्याला ९ वर्षे उलटून गेली, तरी अद्याप अंतिम मंजुरी देण्यात आलेली नाही. महापालिकेने मुदतीत आराखडा तयार केला नाही म्हणून तो ताब्यातून काढून घेणाऱ्या राज्य शासनाने एक वर्ष उलटले, तरी अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही. बिल्डरांचे हितसंबंध जोपासण्याच्या वाटाघाटी सुरू असल्याने उशीर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.महापालिकेच्या मागील विकास आराखड्याची ५ जानेवारी १९८७ पासून अंमलबजावणी सुरू झाली. सध्या त्याच विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरू आहे. नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी २३ फेब्रुवारी २००७ मध्ये इरादा जाहीर करण्यात आला. त्यानंतर नगरअभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावर शहराचा पुढील २० वर्षांचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. महापालिका प्रशासनाला डीपी तयार करण्यास साडेतीन वर्षे लागली. प्रशासनाने २०११ मध्ये डीपी नियोजन समितीकडे सोपविला. हा डीपी जाहीर करून त्यावर नागरिकांच्या हरकती नोंदविण्यात आल्या. नागरिकांनी ८७ हजार हरकती नोंदविल्याने त्यांची सुनावणी घेण्यातही बराच कालावधी लोटला. त्यानंतर महापालिकेच्या मुख्यसभेकडून लगेच मान्यता मिळणे अपेक्षित होते. मात्र, डीपी तयार करताना कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाल्याने मुख्यसभेकडून त्याला मंजुरी मिळण्यास विलंब झाला. दरम्यान, मुदत संपल्याचे कारण दाखवून राज्य शासनाने पालिकेच्या ताब्यातून डीपी काढून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे दिला. शहरामध्ये आरोग्य, उद्याने, खेळाची मैदाने आदी सुविधा देण्यासाठी टाकण्यात आलेली तब्बल ३९० आरक्षणे शासन नियुक्त समितीने उठविली आहेत. त्यामुळे पुढील काळात उद्याने, दवाखाने व खेळांची मैदाने यासाठी जागाच उपलब्ध असणार नाही. आरक्षणे उठवून शहर नियोजनाच्या गाभ्यावर घाला घालण्यात आला आहे. ही आरक्षणे पूर्ववत ठेवण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.स्मार्ट सिटी गवगवा; डीपीकडे दुर्लक्षशहर खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी विकास आराखड्याचे खूप महत्त्व आहे. एकीकडे केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारकडून स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटला जात असताना, विकास आराखड्याला मंजुरी देण्यास मात्र टाळाटाळ केली जात आहे. बांधकाम व्यावसायिकांनी दबावापोटी याला मंजुरी देण्यास उशीर होत असल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भाजपाच्या आमदारांना डीपीमध्ये काय बदल हवे आहेत, हे जाणून त्यांची स्वतंत्र बैठक घेतली.शहरांच्या वाढीमध्ये विकास आराखड्याला प्रचंड महत्त्व असते. शहरातील नागरिकांना पाणी, रस्ते, शाळा, आरोग्य, सांडपाणी व्यवस्था, उद्याने पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यासाठी महापालिकेला आवश्यक असलेल्या जागांवर आरक्षणे टाकणे, शहराचा विकास कोणत्या दिशेने झाला पाहिजे याची निश्चिती करणे आदी बाबींची पूर्तता विकास आराखड्यामध्ये केली जाते. विकास आराखड्याबरोबर बांधकाम विकास नियमावली (डिसी रूल) निश्चित केली जाते. त्यामध्ये घरांना बांधकामासाठी किती एफएसआय उपलब्ध असेल, टीडीआर वापरण्याचे धोरण काय असेल, बांधकाम परवानग्याची प्रक्रिया कशी असेल, याबाबत नियम ठरविले जातात. दर २० वर्षांनी या नियमांचा आढावा घेऊन त्यामध्ये सुधारणा होत असल्याने ते खूप महत्त्वाचे असतात.