शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

नियोजनातच सरली ९ वर्षे

By admin | Updated: August 29, 2016 03:49 IST

शहराच्या पुढील २० वर्षांतील लोकसंख्या व क्षेत्रवाढीचा विचार करून मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा (डीपी) तयार केला जातो.

पुणे : शहराच्या पुढील २० वर्षांतील लोकसंख्या व क्षेत्रवाढीचा विचार करून मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा (डीपी) तयार केला जातो. पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याचे काम फेब्रुवारी २००७ पासून सुरू झाले असून, त्याला ९ वर्षे उलटून गेली, तरी अद्याप अंतिम मंजुरी देण्यात आलेली नाही. महापालिकेने मुदतीत आराखडा तयार केला नाही म्हणून तो ताब्यातून काढून घेणाऱ्या राज्य शासनाने एक वर्ष उलटले, तरी अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही. बिल्डरांचे हितसंबंध जोपासण्याच्या वाटाघाटी सुरू असल्याने उशीर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.महापालिकेच्या मागील विकास आराखड्याची ५ जानेवारी १९८७ पासून अंमलबजावणी सुरू झाली. सध्या त्याच विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरू आहे. नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी २३ फेब्रुवारी २००७ मध्ये इरादा जाहीर करण्यात आला. त्यानंतर नगरअभियंता प्रशांत वाघमारे यांच्यावर शहराचा पुढील २० वर्षांचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. महापालिका प्रशासनाला डीपी तयार करण्यास साडेतीन वर्षे लागली. प्रशासनाने २०११ मध्ये डीपी नियोजन समितीकडे सोपविला. हा डीपी जाहीर करून त्यावर नागरिकांच्या हरकती नोंदविण्यात आल्या. नागरिकांनी ८७ हजार हरकती नोंदविल्याने त्यांची सुनावणी घेण्यातही बराच कालावधी लोटला. त्यानंतर महापालिकेच्या मुख्यसभेकडून लगेच मान्यता मिळणे अपेक्षित होते. मात्र, डीपी तयार करताना कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाल्याने मुख्यसभेकडून त्याला मंजुरी मिळण्यास विलंब झाला. दरम्यान, मुदत संपल्याचे कारण दाखवून राज्य शासनाने पालिकेच्या ताब्यातून डीपी काढून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे दिला. शहरामध्ये आरोग्य, उद्याने, खेळाची मैदाने आदी सुविधा देण्यासाठी टाकण्यात आलेली तब्बल ३९० आरक्षणे शासन नियुक्त समितीने उठविली आहेत. त्यामुळे पुढील काळात उद्याने, दवाखाने व खेळांची मैदाने यासाठी जागाच उपलब्ध असणार नाही. आरक्षणे उठवून शहर नियोजनाच्या गाभ्यावर घाला घालण्यात आला आहे. ही आरक्षणे पूर्ववत ठेवण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे.स्मार्ट सिटी गवगवा; डीपीकडे दुर्लक्षशहर खऱ्या अर्थाने स्मार्ट करण्यासाठी विकास आराखड्याचे खूप महत्त्व आहे. एकीकडे केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारकडून स्मार्ट सिटीचा डांगोरा पिटला जात असताना, विकास आराखड्याला मंजुरी देण्यास मात्र टाळाटाळ केली जात आहे. बांधकाम व्यावसायिकांनी दबावापोटी याला मंजुरी देण्यास उशीर होत असल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भाजपाच्या आमदारांना डीपीमध्ये काय बदल हवे आहेत, हे जाणून त्यांची स्वतंत्र बैठक घेतली.शहरांच्या वाढीमध्ये विकास आराखड्याला प्रचंड महत्त्व असते. शहरातील नागरिकांना पाणी, रस्ते, शाळा, आरोग्य, सांडपाणी व्यवस्था, उद्याने पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यासाठी महापालिकेला आवश्यक असलेल्या जागांवर आरक्षणे टाकणे, शहराचा विकास कोणत्या दिशेने झाला पाहिजे याची निश्चिती करणे आदी बाबींची पूर्तता विकास आराखड्यामध्ये केली जाते. विकास आराखड्याबरोबर बांधकाम विकास नियमावली (डिसी रूल) निश्चित केली जाते. त्यामध्ये घरांना बांधकामासाठी किती एफएसआय उपलब्ध असेल, टीडीआर वापरण्याचे धोरण काय असेल, बांधकाम परवानग्याची प्रक्रिया कशी असेल, याबाबत नियम ठरविले जातात. दर २० वर्षांनी या नियमांचा आढावा घेऊन त्यामध्ये सुधारणा होत असल्याने ते खूप महत्त्वाचे असतात.