शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शहरात सीएनजीवरील वाहने फक्त ६८ हजार..!

By admin | Updated: August 1, 2016 01:14 IST

सीएनजी वाहनांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात असताना शहरात सध्या सीएनजीवर चालणारी केवळ ६८ हजार वाहने असल्याचे स्पष्ट झाले

पुणे : शहरातील हवेचा दर्जा सुधारावा यासाठी सीएनजी वाहनांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात असताना शहरात सध्या सीएनजीवर चालणारी केवळ ६८ हजार वाहने असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी शहरातील एकूण वाहनांची संख्या ३१ लाखांवर पोहोचली असून, त्यामध्ये सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे दुचाकी वाहनांनी २३ लाखांचा टप्पा पार केला आहे.महापालिकेच्या वतीने शुक्रवारी २०१५-१६ चा पर्यावरण अहवाल प्रकाशित करण्यात आला. शहरातील हवा, पाणी, मृदा यांचे होणारे प्रदूषण, त्याचा मानवी जीवनावर आणि शहरांवर होणारा परिणाम, त्याची कारणे व ते रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींचा आढावा घेण्यासाठी हा अहवाल प्रकाशित केला जातो. शहराचा वेगाने विकास होत असताना पर्यावरणाची कमीत कमी हानी कशी होईल याकडे लक्ष वेधण्याचे काम अहवालाद्वारे केले जाते. शहरातील हवेचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी जगभर सीएनजी वाहनांवर भर दिला जात आहे. दिल्लीच्या हवेतील प्रदूषणाची पातळी खालावल्याने तिथे अनेक ठिकाणी सीएनजी वाहने बंधनकारक करण्यात आली आहेत. पेट्रोल, डिझेल आदी इंधनावरील वाहनांच्या धुरामधून मोठ्या प्रमाणात कार्बन मोनाक्साइड बाहेर पडते, त्यामुळे हवेची पातळी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. ते रोखण्यासाठी सीएनजी वाहनांचा पाठपुरावा केला जात आहे. पेट्रोल, डिझेलवरील रिक्षांनी सीएनजी किट बसवून घ्यावे यासाठी महापालिकेच्या वतीने १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, शहरातील ३० लाख वाहनांपैकी केवळ ६८ हजार ७८४ वाहने सीएनजीवर चालत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामध्ये तीनचाकी ३० हजार ६७०, चार चाकी ३६ हजार ८८८, पीएमपीच्या १ हजार २२६ वाहनांचा समावेश आहे. शहरातील एकूण वाहनांच्या तुलनेत ही संख्या खूपच तोकडी आहे.(प्रतिनिधी)।शहरामध्ये मागील वर्षी दुचाकींची संख्या २१ लाख ५२ हजार इतकी नोंदविण्यात आली होती, त्यामध्ये दोन लाखांची वाढ होऊन ती २३ लाख ३१ हजार इतकी झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने दिवसेंदिवस दुचाकींची वाढत असलेली संख्या शहराच्या वाहतूक व्यवस्था व पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. स्वत:ची कार खरेदी करणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत असून, कार, जीपची संख्या एक लाखांच्या घरात पोहोचली आहे. मागील वर्षी २८ लाख ७० हजार वाहनांची संख्या नोंदविण्यात आली होती. त्यामध्ये वाढ होऊन एकूण वाहनांची संख्या ३१ लाख ७ हजार ९६२ झाली आहे.