शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या १८ टक्के लाचखोरांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 02:20 IST

लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत (एसीबी) न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये राज्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण केवळ १८ टक्के आहे. कॉमनवेल्थ ह्युमन

- राजेश निस्ताने, यवतमाळलाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत (एसीबी) न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये राज्यात गुन्हे शाबितीचे प्रमाण केवळ १८ टक्के आहे. कॉमनवेल्थ ह्युमन राईटस् इनिशिएटीव्ह (सीएचआरआय) आणि नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २००१ ते २०१५ या काळात देशभरात दाखल फौजदारी स्वरूपाचे एकूण गुन्हे आणि त्या तुलनेत भ्रष्टाचाराच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा सखोल अभ्यास केला. त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.राज्यात गेल्या १५ वर्षांत विविध प्रकारच्या फौजदारी स्वरूपाचे एकूण ५२ लाख १५ हजार ४८९ गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविले गेले. त्यात एसीबीमार्फत लोकसेवकांविरुद्ध नोंदविल्या गेलेल्या गुन्ह्यांची संख्या केवळ ८ हजार ८७५ एवढी आहे. एकूण दाखल फौजदारी गुन्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ०.१७ टक्का इतके अत्यल्प आहे. दाखल गुन्ह्यांपैकी ६ हजार ३९९ गुन्ह्यांची न्यायालयीन सुनावणी (ट्रायल) पूर्ण झाली आहे. यापैकी केवळ १ हजार ५९२ गुन्हेन्यायालयात सिद्ध होऊ शकले.गुन्हे शाबितीचे हे प्रमाण १७.९४ टक्के आहे. उच्च न्यायालयातील अपिलात तर हे प्रमाण आणखी घटले आहे.८२ टक्के खटल्यात सबळ पुराव्याअभावी लोकसेवक निर्दोष सुटले असून हे एसीबीच्या तपासातील अपयश मानले जाते.पंच-साक्षीदार फितूर होणे, फिर्यादीच उलटणे, दोषारोपपत्राला परवानगी देणारा उच्च पदस्थ अधिकारी खटल्याच्या वेळी साक्ष देण्यासाठी न्यायालयापुढे हजर नहोणे याबाबींचाही या निर्दोष मुक्ततेला हातभार लागतो आहे. कायद्यातील पळवाटांचा लाभ हे लोकसेवक निर्दोष मुक्ततेसाठी उठवित असल्याचे दिसून येते.भ्रष्टाचारात महाराष्ट्र आघाडीवरया १५ वर्षांच्या काळात एसीबीने लोकसेवकांविरुद्ध दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या फौजदारी गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांवर आहे. राज्यात ८ हजार ८७५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याखालोखाल र२ाजस्थान (६३९३ गुन्हे), ओडिशा (५०८५ गुन्हे), कर्नाटक (४७३२ गुन्हे), आंध्र प्रदेश (३८०४ गुन्हे), मध्य प्रदेश (३३४४ गुन्हे), तामिळनाडू (३२६१ गुन्हे ), पंजाब (३१७१ गुन्हे), गुजरात (३१४८ गुन्हे) तर केरला टॉपटेनमध्ये १० व्या क्रमांकावर असून तेथे २४६४ गुन्हे नोंदविले गेले आहेत.देशातील प्रमाण १९.५३ टक्के सीएचआरआय आणि एनसीआरबीच्या पाहाणीनुसार या १५ वर्षांत देशभरात फौजदारी स्वरूपाचे ९ कोटी ११ लाख १५ हजार ३३४ गुन्हे नोंदविले गेले. त्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये लोकसेवकांविरुद्ध नोंदविल्या गेलेल्या गुन्ह्यांची संख्या ५४ हजार १३९ एवढी असून हे प्रमाण ०.०६ टक्का एवढे अत्यल्प आहे. यापैकी भ्रष्टाचाराच्या २९ हजार ९२० गुन्ह्यांची सुनावणी न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यातील केवळ १० हजार ५७१ गुन्हे सिद्ध होऊन आरोपींना शिक्षा दिली गेली. हे प्रमाण १९.५३ टक्के एवढे आहे. अपिलात तर हे प्रमाण आणखी घटले आहे.मुंबईमध्ये निर्दोष मुक्ततेचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत ग्रामीण महाराष्ट्रात कमी आहे. प्रत्येक खटल्यात निर्दोष मुक्ततेची कारणे वेगवेगळी असतात. तपासातील त्रुटीही असू शकतात. मात्र ती नेमकी कारणे आधी तपासावी लागतील. - बिपीनकुमार सिंग,अपर पोलीस महासंचालक,अ‍ॅन्टी करप्शन, मुंबई