शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मराठी भाषेसाठी ऑनलाइन चळवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 02:18 IST

राजकीय पक्षांमुळे सर्वसामान्य मराठी माणूसही दुकानांच्या पाट्या देवनागरीत अ

साधना गोरे

‘स्क्रीनवाचना’च्या आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेची चळवळही मागे नाही. ‘मराठी प्रथम’ हे मराठी अभ्यास केंद्र या मराठी समाज, भाषा आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या संस्थेचे डिजिटल नियतकालिक आहे. ‘ओळख भाषेची - मराठी महाराष्ट्राची’ असे मराठी प्रथमचे घोषवाक्य असून, मराठी भाषेशी निगडित - मराठी शाळा, उच्च शिक्षणातील मराठी, न्यायालयीन मराठीचा वापर, माहिती - तंत्रज्ञान, प्रशासनातील मराठीचा वापर, भाषाविज्ञान आदी विषयांसंबंधी अभ्यासपूर्ण लेख, असे वाचन, ज्ञानाची भूक भागवत मराठीचा प्रचार, प्रसार करणारे बरेच काही येथे वाचायला मिळते.

राजकीय पक्षांमुळे सर्वसामान्य मराठी माणूसही दुकानांच्या पाट्या देवनागरीत असणे, यालाच मराठीकरण समजायला लागला आहे, पण एखाद्या भाषेचा विकास करायचा मूलभूत मार्ग त्या भाषेतील शाळांच्या संख्येवर, शाळांच्या सक्षमीकरणावर अवलंबून असतो, या भाषातज्ज्ञांच्या इशाºयाकडे आपण सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत आहोत, हे टाळायला हवे. मराठी शाळांमधील प्रयोगशील उपक्रमांचे आदानप्रदान घडवून आणण्यासाठी शिक्षणविषयक लेखांना मराठी प्रथममध्ये प्राधान्य दिले जाते. सोबतच शाळा-महाविद्यालयांमध्ये साजºया केल्या जाणाºया मराठीविषयक कार्यक्रमांचे वृत्तान्त, मराठीचा आग्रह धरणारे किस्से, राज्य सरकार - केंद्र सरकार यांची अनेक आस्थापने, खासगी संस्था, कंपन्या इ. ठिकाणी मराठीला डावलले जाणारे,त्याविरुद्ध जाब विचारणारे अनुभव येथे वाचायला मिळतात.मराठीची चळवळ, मराठी भाषेच्या संवर्धनाचे, अन्याय निर्मूलनाचे कार्य करणारे राज्यभरातील कार्यकर्ते मराठी प्रथमचा आधार आहे. मराठी भाषेच्या चळवळीतील हे विखुरलेले बिंदू जोडून त्यांची एक सशक्त साखळी करण्याचा मानस असल्याचे ‘मराठी प्रथम’चे संपादक ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांनी सांगितले.मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा आणि राजभाषा असली, तरी आजही ती ज्ञानभाषा नाही. मात्र, आपल्या सामूहिक व अविरत प्रयत्नांतून मराठी ज्ञानभाषा होऊ शकते. त्यासाठी तिचे सामाजिक, शैक्षणिक स्थान प्रथम भाषेचेच असले पाहिजे. मराठी आपल्यासाठी आज, उद्या आणि निरंतर प्रथम भाषाच असेल, असली पाहिजे. बाकी सर्व भाषा आपल्यासाठी कमीअधिक महत्त्वाच्या असल्या, तरी त्यांचे स्थान कायम दुसºया क्रमांकाचे असायला हवे, अशी ‘मराठी प्रथम’ची भूमिका असून हीच भूमिका प्रत्येक मराठी माणसाचीही असायला हवी.मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा आणि राजभाषा असली, तरी आजही ती ज्ञानभाषा नाही. मात्र, आपल्या सामूहिक व अविरत प्रयत्नांतून मराठी ज्ञानभाषा होऊ शकते. त्यासाठी तिचे सामाजिक, शैक्षणिक स्थान प्रथम भाषेचेच असले पाहिजे, इतर भाषांचे स्थान कायम दुसºया क्रमांकाचे असायला हवे, हीच भूमिका प्रत्येक मराठी माणसाची असायला हवी.(लेखिका मराठी अभ्यास केंद्रात कार्यकर्त्या आहेत)