शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी भरती प्रक्रियेत उभे ऑनलाइन विघ्न; अर्जात चूक दुरुस्तीची सुविधा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 06:18 IST

हेल्प डेस्कची मदत मिळेना, यासंदर्भात काही उमेदवारांनी निवेदनेही महसूलमंत्र्यांना पाठवली असून अर्जातील लहान चुकांमुळे आपली संधी कशी हुकेल, याबद्दल माहिती दिली आहे 

मुंबई राज्याच्या महसूल व : वनविभागाकडून तलाठी भरती प्रक्रिया ही ऑनलाइन असून त्यासंबंधातील अर्ज भरताना होणाऱ्या चुकीला सुधारण्याची वा दुरुस्त करण्याची सोय यात नसल्याने ही अर्ज प्रक्रिया उमेदवारांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. केवळ इतकेच नव्हे तर, यासंबंधात उपलब्ध असलेल्या हेल्पलाइन क्रमांकावरही उमेदवारांना कोणतीही मदत मिळत नसल्याच्या तक्रारी उमेदवार करीत आहेत.

ही तलाठी भरती प्रक्रिया टीसीएस कंपनीकडून राबविण्यात येत असून अर्ज भरताना होणाऱ्या चुकीच्या दुरुस्तीची कोणतीही सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. या त्रासाची महसूल विभागाकडून तत्काळ दखल घेतली जावी अन्यथा अनेक उमेदवार तलाठी भरतीच्या प्रक्रियेतूनच बाद होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून तलाठी भरतीची प्रतीक्षा होती. अखेर राज्यांतील ४ हजार ६४४ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली.

अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्यामुळे सुखावले. येत्या १७ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. परंतु, अर्ज भरण्यामध्ये असणारी ही त्रुटी उमेदवारांना अस्वस्थ करणारी ठरली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाप्रमाणे राज्य शासनाने भरतीसाठी नियुक्त केलेल्या या कंपनीच्या माध्यमातून उमेदवारांना भरलेल्या अर्जात संभाव्य चूक दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. 

यासंदर्भात काही उमेदवारांनी निवेदनेही महसूलमंत्र्यांना पाठवली असून अर्जातील लहान चुकांमुळे आपली संधी कशी हुकेल, याबद्दल माहिती दिली आहे. शिवाय हेल्प डेस्कवर तक्रार नोंदवल्यानंतर 'तुम्हाला भरलेल्या अर्जात कोणतेही बदल करता येणार नाही, तसेच तुम्हाला प्रवेश शुल्क परत मिळणार नाही किंवा तुमचे प्रवेश प्राप्त होणार नाही' असे उत्तर कळवित असल्याची तक्रारही केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्याचप्रमाणे तलाठी भरतीसाठी भरलेल्या अर्जातसुद्धा दुरुस्ती करण्याची संधी द्यायला हवी. अन्यथा हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. • महेश बडे, एमपीएससी स्टुडंट - राइट्स असोसिएशन