शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग

By admin | Updated: June 8, 2016 03:42 IST

दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीत आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे.

मुंबई : दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीत आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. १६ मेपासून सुरू झालेल्या आॅनलाइन प्रक्रियेत मंगळवारपर्यंत ८४ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केले आहेत, तर १४ हजार १३१ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज भरल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई, एनआयओएस आणि इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात आॅनलाइन नोंदणी अर्ज करावे लागणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरणे बंधनकारक आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी अर्धवट भरलेले अर्ज, पूर्ण भरलेले अर्ज, कन्फर्म केलेले अर्ज आणि शाळा प्रशासनाने अप्रूव्ह केलेल्या नोंदणी अर्जांची संख्या ८४ हजार ८९५वर पोहोचली आहे. तर अर्धवट, पूर्ण, कन्फर्म झालेल्या पसंतीक्रम अर्जांची संख्या १४ हजार १३१ आहे. त्यामुळे शेवटच्या १० दिवसांत शाळांमध्ये आॅनलाइन अर्ज नोंदणीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नोंदणी केलेल्या एकूण अर्जांमध्ये एसएससी बोर्डातून सर्वाधिक म्हणजे ७३ हजार १११ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केले आहेत. तर आयबी बोर्डातून सर्वांत कमी म्हणजे एक अपूर्ण आणि एक कन्फर्म नोंदणी अर्ज करण्यात आला आहे. याउलट आयबी बोर्डातील एकाही विद्यार्थ्याने अद्याप पसंतीक्रम अर्ज भरला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाणिज्य शाखेच्या एकूण १० हजार २६० जागा कमी झाल्या आहेत. याउलट वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची मिळणारी पसंती पाहता, यंदा वाणिज्यची कट आॅफ नव्वदी पार करण्याची शक्यता आहे, तर त्याखालोखाल कला शाखेच्या ४ हजार ९८० आणि विज्ञान शाखेच्या ४ हजार १६० जागांमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे या शाखांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसेल.>प्रवेशासाठी चुरस रंगणार अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा चांगलीच चुरस रंगणार आहे. आॅनलाइन प्रक्रियेतून भरण्यात येणाऱ्या अकरावीच्या जागांत यंदा तब्बल १९ हजार ४०० जागांची घट झाली आहे. गेल्या वर्षी मुंबई विभागीय मंडळातून दहावी परीक्षेत एकूण ३ लाख ०३ हजार ०९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यातील २ लाख ६४२ विद्यार्थ्यांनी मुंबई महानगर क्षेत्रासाठी राबवण्यात येणाऱ्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केले होते. त्यांच्यासाठी महानगर क्षेत्रात २ लाख ८९ हजार १७२ जागा उपलब्ध होत्या. त्यामुळे बऱ्याचशा जागा शिल्लक होत्या. याउलट या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ९७ हजार ७१९ इतकी आहे. त्यामुळे या वर्षीही सुमारे २ लाख विद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता आहे. मात्र उपलब्ध जागांत घट झाल्याने प्रवेशासाठी चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे.>प्रवेश मिळवण्याचे आव्हानसर्वच शाखांच्या जागांमध्ये घट झाल्याने नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे विद्यार्थ्यांसाठी आव्हान ठरणार आहे.>शाखानिहाय उपलब्ध जागाशाखाइनहाउस,उरलेल्या एकूणअल्पसंख्याक,जागाव्यवस्थापनकला१३,५४७२०,६०२३४,१४९विज्ञान३५,१६८४६,६६३८१,८३१वाणिज्य७०,८२३८२,९६९१,५३,७९२एकूण १,१९,५३८१,५०,२३४२६९७७२