शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग

By admin | Updated: June 8, 2016 03:42 IST

दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीत आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे.

मुंबई : दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीत आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. १६ मेपासून सुरू झालेल्या आॅनलाइन प्रक्रियेत मंगळवारपर्यंत ८४ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केले आहेत, तर १४ हजार १३१ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज भरल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई, एनआयओएस आणि इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यात आॅनलाइन नोंदणी अर्ज करावे लागणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरणे बंधनकारक आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी अर्धवट भरलेले अर्ज, पूर्ण भरलेले अर्ज, कन्फर्म केलेले अर्ज आणि शाळा प्रशासनाने अप्रूव्ह केलेल्या नोंदणी अर्जांची संख्या ८४ हजार ८९५वर पोहोचली आहे. तर अर्धवट, पूर्ण, कन्फर्म झालेल्या पसंतीक्रम अर्जांची संख्या १४ हजार १३१ आहे. त्यामुळे शेवटच्या १० दिवसांत शाळांमध्ये आॅनलाइन अर्ज नोंदणीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नोंदणी केलेल्या एकूण अर्जांमध्ये एसएससी बोर्डातून सर्वाधिक म्हणजे ७३ हजार १११ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केले आहेत. तर आयबी बोर्डातून सर्वांत कमी म्हणजे एक अपूर्ण आणि एक कन्फर्म नोंदणी अर्ज करण्यात आला आहे. याउलट आयबी बोर्डातील एकाही विद्यार्थ्याने अद्याप पसंतीक्रम अर्ज भरला नसल्याचे प्रशासनाने सांगितले.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाणिज्य शाखेच्या एकूण १० हजार २६० जागा कमी झाल्या आहेत. याउलट वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची मिळणारी पसंती पाहता, यंदा वाणिज्यची कट आॅफ नव्वदी पार करण्याची शक्यता आहे, तर त्याखालोखाल कला शाखेच्या ४ हजार ९८० आणि विज्ञान शाखेच्या ४ हजार १६० जागांमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे या शाखांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसेल.>प्रवेशासाठी चुरस रंगणार अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा चांगलीच चुरस रंगणार आहे. आॅनलाइन प्रक्रियेतून भरण्यात येणाऱ्या अकरावीच्या जागांत यंदा तब्बल १९ हजार ४०० जागांची घट झाली आहे. गेल्या वर्षी मुंबई विभागीय मंडळातून दहावी परीक्षेत एकूण ३ लाख ०३ हजार ०९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यातील २ लाख ६४२ विद्यार्थ्यांनी मुंबई महानगर क्षेत्रासाठी राबवण्यात येणाऱ्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केले होते. त्यांच्यासाठी महानगर क्षेत्रात २ लाख ८९ हजार १७२ जागा उपलब्ध होत्या. त्यामुळे बऱ्याचशा जागा शिल्लक होत्या. याउलट या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ९७ हजार ७१९ इतकी आहे. त्यामुळे या वर्षीही सुमारे २ लाख विद्यार्थी अर्ज करण्याची शक्यता आहे. मात्र उपलब्ध जागांत घट झाल्याने प्रवेशासाठी चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे.>प्रवेश मिळवण्याचे आव्हानसर्वच शाखांच्या जागांमध्ये घट झाल्याने नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे विद्यार्थ्यांसाठी आव्हान ठरणार आहे.>शाखानिहाय उपलब्ध जागाशाखाइनहाउस,उरलेल्या एकूणअल्पसंख्याक,जागाव्यवस्थापनकला१३,५४७२०,६०२३४,१४९विज्ञान३५,१६८४६,६६३८१,८३१वाणिज्य७०,८२३८२,९६९१,५३,७९२एकूण १,१९,५३८१,५०,२३४२६९७७२