शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कांदा अनुदानाची योजना ठरली मृगजळ

By admin | Updated: October 20, 2016 20:25 IST

२० हजार क्विंटलची कांदा विक्रीच पात्र ठरविण्यात येणार आहे. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गणेश मापारी खामगाव, (जि.बुलडाणा), दि. २० : केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदान देण्याची अट बुलडाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख क्विंटलच्या जवळपास कांदा विक्री केली असून अनुदानासाठी मात्र केवळ २० हजार क्विंटलची कांदा विक्रीच पात्र ठरविण्यात येणार आहे.कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जुलै व आॅगस्ट २०१६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रतिक्विंटल १०० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान पणन संचालकांनी सर्व बाजार समित्यांकडून १ जुलै ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील कांदा विक्रीची माहिती घेतली. बाजार समित्यांकडून सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेली माहिती आणि पणन संचालकांकडे जुलै-आॅगस्टमध्ये आलेली आॅनलाईन माहिती यामध्ये बराच घोळ आहे. त्यामुळे पणन संचालकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांना पुन्हा माहिती पाठविण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सदर माहिती प्रमाणित करुन मागविण्यात आली आहे.

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्याची माहिती २० आॅक्टोबर रोजी पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी केवळ नांदुरा आणि मलकापूर या दोन बाजार समित्यांमध्येच कांदा खरेदी केली जाते. त्यामुळे शासकीय अनुदानासाठी या दोन बाजार समित्यांमधील कांदा विक्रीच पात्र ठरविल्या जाणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात १ लाख क्विंटलच्या जवळपास कांदा उत्पादन झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. आणि अनुदानासाठी मात्र २० हजार क्विंटल कांदाच पात्र ठरणार असून हजारो शेतकऱ्यांपैकी नांदुरा आणि मलकापूर बाजार समितीत कांदा विक्री करणाऱ्या १ हजार ८६६ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिणामी बाजार समिती व्यतिरिक्त कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा कोणताही लाभ होणार नाही.सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळावी मदतकांदा अनुदान देण्यासाठी शासनाने सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. बाजार समितीच्या बाहेर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. कांदा लागवडीच्या सात-बाऱ्यावरील नोंदीवरुन किंवा तलाठ्यांकडून माहिती घेवून शासनाने सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.