शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अनुदानाची योजना ठरली मृगजळ

By admin | Updated: October 20, 2016 20:25 IST

२० हजार क्विंटलची कांदा विक्रीच पात्र ठरविण्यात येणार आहे. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गणेश मापारी खामगाव, (जि.बुलडाणा), दि. २० : केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अनुदान देण्याची अट बुलडाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख क्विंटलच्या जवळपास कांदा विक्री केली असून अनुदानासाठी मात्र केवळ २० हजार क्विंटलची कांदा विक्रीच पात्र ठरविण्यात येणार आहे.कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल १०० रुपयेप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जुलै व आॅगस्ट २०१६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रतिक्विंटल १०० रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. दरम्यान पणन संचालकांनी सर्व बाजार समित्यांकडून १ जुलै ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीतील कांदा विक्रीची माहिती घेतली. बाजार समित्यांकडून सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेली माहिती आणि पणन संचालकांकडे जुलै-आॅगस्टमध्ये आलेली आॅनलाईन माहिती यामध्ये बराच घोळ आहे. त्यामुळे पणन संचालकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांना पुन्हा माहिती पाठविण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे सदर माहिती प्रमाणित करुन मागविण्यात आली आहे.

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्याची माहिती २० आॅक्टोबर रोजी पाठविण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी केवळ नांदुरा आणि मलकापूर या दोन बाजार समित्यांमध्येच कांदा खरेदी केली जाते. त्यामुळे शासकीय अनुदानासाठी या दोन बाजार समित्यांमधील कांदा विक्रीच पात्र ठरविल्या जाणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात १ लाख क्विंटलच्या जवळपास कांदा उत्पादन झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. आणि अनुदानासाठी मात्र २० हजार क्विंटल कांदाच पात्र ठरणार असून हजारो शेतकऱ्यांपैकी नांदुरा आणि मलकापूर बाजार समितीत कांदा विक्री करणाऱ्या १ हजार ८६६ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिणामी बाजार समिती व्यतिरिक्त कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा कोणताही लाभ होणार नाही.सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळावी मदतकांदा अनुदान देण्यासाठी शासनाने सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. बाजार समितीच्या बाहेर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. कांदा लागवडीच्या सात-बाऱ्यावरील नोंदीवरुन किंवा तलाठ्यांकडून माहिती घेवून शासनाने सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.