शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना रडवतोय कांदा

By admin | Updated: August 27, 2016 05:04 IST

गतवर्षी ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी काढणाऱ्या कांद्याने या वर्षी शेतकऱ्यांना रडविले आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- गतवर्षी ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी काढणाऱ्या कांद्याने या वर्षी शेतकऱ्यांना रडविले आहे. प्रत्येक राज्यात बाजारभाव ६ ते ७ पट घसरले आहेत. गतवर्षी २० ते ८० रुपयांना विकला जाणारा कांदा या वर्षी अन्य राज्यांत २ ते २० रुपये व महाराष्ट्रात १ ते १० रुपये किलो दराने विकला जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला व फळे नियमनमुक्त केली आहेत. परंतु हा निर्णय घेऊन दोन महिने पूर्ण होण्यापूर्वीच कांद्याचे बाजारभाव गडगडले आहेत. प्रत्येक वर्षी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढतात. चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मार्चपासून शक्य तेवढा माल चाळींमध्ये ठेवतात. गतवर्षी कांद्याला विक्रमी भाव मिळाला होता. महाराष्ट्रात होलसेल मार्केटमध्ये २० ते ६२ रुपये किलो भाव मिळत होता. देशातील सर्वच राज्यांत दर २० ते ८० रुपयांपर्यंत गेले होते. परंतु या वर्षी बाजारभाव प्रचंड घसरले आहेत. १० वर्षांत प्रथमच आॅगस्टमध्ये कांद्याचे दर १ ते १० रुपये एवढे खाली आहेत. शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन करण्यासाठी व मार्चपासून चाळींमध्ये साठवणूक करण्यासाठी केलेला खर्चही निघत नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. दोन महिन्यांपासून कांद्याचे दर घसरू लागले आहेत. याविषयी व्यापारी व शेतकरी प्रतिनिधी वारंवार आवाज उठवत असतानाही शासनाने योग्य कार्यवाही केलेली नाही. सप्टेंबर अखेरपासून नवीन कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारभाव वाढण्याऐवजी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. >शेतकरी नेते गप्प का ?राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे राज्याचे पणन राज्यमंत्री आहेत. यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.