शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शेतकऱ्यांना रडवतोय कांदा

By admin | Updated: August 27, 2016 05:04 IST

गतवर्षी ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी काढणाऱ्या कांद्याने या वर्षी शेतकऱ्यांना रडविले आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- गतवर्षी ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी काढणाऱ्या कांद्याने या वर्षी शेतकऱ्यांना रडविले आहे. प्रत्येक राज्यात बाजारभाव ६ ते ७ पट घसरले आहेत. गतवर्षी २० ते ८० रुपयांना विकला जाणारा कांदा या वर्षी अन्य राज्यांत २ ते २० रुपये व महाराष्ट्रात १ ते १० रुपये किलो दराने विकला जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला व फळे नियमनमुक्त केली आहेत. परंतु हा निर्णय घेऊन दोन महिने पूर्ण होण्यापूर्वीच कांद्याचे बाजारभाव गडगडले आहेत. प्रत्येक वर्षी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढतात. चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मार्चपासून शक्य तेवढा माल चाळींमध्ये ठेवतात. गतवर्षी कांद्याला विक्रमी भाव मिळाला होता. महाराष्ट्रात होलसेल मार्केटमध्ये २० ते ६२ रुपये किलो भाव मिळत होता. देशातील सर्वच राज्यांत दर २० ते ८० रुपयांपर्यंत गेले होते. परंतु या वर्षी बाजारभाव प्रचंड घसरले आहेत. १० वर्षांत प्रथमच आॅगस्टमध्ये कांद्याचे दर १ ते १० रुपये एवढे खाली आहेत. शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन करण्यासाठी व मार्चपासून चाळींमध्ये साठवणूक करण्यासाठी केलेला खर्चही निघत नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. दोन महिन्यांपासून कांद्याचे दर घसरू लागले आहेत. याविषयी व्यापारी व शेतकरी प्रतिनिधी वारंवार आवाज उठवत असतानाही शासनाने योग्य कार्यवाही केलेली नाही. सप्टेंबर अखेरपासून नवीन कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारभाव वाढण्याऐवजी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. >शेतकरी नेते गप्प का ?राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे राज्याचे पणन राज्यमंत्री आहेत. यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.