शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांना रडवतोय कांदा

By admin | Updated: August 27, 2016 05:04 IST

गतवर्षी ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी काढणाऱ्या कांद्याने या वर्षी शेतकऱ्यांना रडविले आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- गतवर्षी ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी काढणाऱ्या कांद्याने या वर्षी शेतकऱ्यांना रडविले आहे. प्रत्येक राज्यात बाजारभाव ६ ते ७ पट घसरले आहेत. गतवर्षी २० ते ८० रुपयांना विकला जाणारा कांदा या वर्षी अन्य राज्यांत २ ते २० रुपये व महाराष्ट्रात १ ते १० रुपये किलो दराने विकला जात आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी शासनाने भाजीपाला व फळे नियमनमुक्त केली आहेत. परंतु हा निर्णय घेऊन दोन महिने पूर्ण होण्यापूर्वीच कांद्याचे बाजारभाव गडगडले आहेत. प्रत्येक वर्षी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कांद्याचे भाव वाढतात. चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मार्चपासून शक्य तेवढा माल चाळींमध्ये ठेवतात. गतवर्षी कांद्याला विक्रमी भाव मिळाला होता. महाराष्ट्रात होलसेल मार्केटमध्ये २० ते ६२ रुपये किलो भाव मिळत होता. देशातील सर्वच राज्यांत दर २० ते ८० रुपयांपर्यंत गेले होते. परंतु या वर्षी बाजारभाव प्रचंड घसरले आहेत. १० वर्षांत प्रथमच आॅगस्टमध्ये कांद्याचे दर १ ते १० रुपये एवढे खाली आहेत. शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन करण्यासाठी व मार्चपासून चाळींमध्ये साठवणूक करण्यासाठी केलेला खर्चही निघत नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत. दोन महिन्यांपासून कांद्याचे दर घसरू लागले आहेत. याविषयी व्यापारी व शेतकरी प्रतिनिधी वारंवार आवाज उठवत असतानाही शासनाने योग्य कार्यवाही केलेली नाही. सप्टेंबर अखेरपासून नवीन कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारभाव वाढण्याऐवजी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. >शेतकरी नेते गप्प का ?राज्यभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे राज्याचे पणन राज्यमंत्री आहेत. यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.