शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अलिबाग समुद्रात बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला; शोध मोहीम सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 15:39 IST

अलिबागच्या समुद्रामध्ये बुडालेल्या दोन जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून बुडालेल्या दुसऱ्याचा शोध अजूनही सुरू आहे.

ठळक मुद्देअलिबागच्या समुद्रामध्ये बुडालेल्या दोन जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून बुडालेल्या दुसऱ्याचा शोध अजूनही सुरू आहे. कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाऱ्याकडे येत असताना बुडून बेपत्ता झाले होते.

- जयंत धुळप

अलिबाग, दि. 16- अलिबागच्या समुद्रामध्ये बुडालेल्या दोन जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून बुडालेल्या दुसऱ्याचा शोध अजूनही सुरू आहे. अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भरतीच्या पाण्यातून अलिबाग किनाऱ्याकडे येत असताना बुडून बेपत्ता झालेल्या दोन पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. सौरभ खान (23) याचा मृतदेह बुधवारी सकाळी ७.३०वाजता नैसर्गीक भरतीच्या वेळी तुषार शासकीय विश्रामगृहाजवळ अलिबाग समुद्र किनाऱ्यावर सापडला. तर दुसऱ्या व्यक्तीचा अजूनही शोध सुरू आहे.

बेपत्ता असलेल्या ऋषभ सिव्हा (24, सध्या रा.रसायनी,मुळ रा.गोवा) याच्या शोध घेण्यासाठी अलिबाग कोळीवाड्यातील कोळी बांधवांच्या सहकार्याने कुलाबा किल्ला परिसरात शोध मोहीम सुरु असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. मृत सौरभ खान हा मुळचा मध्यप्रदेशातील रतलामचा राहणारा असून, त्याचे नातेवाईक त्याचा मृतदेह ताब्यात घेण्याकरीता येथील जिल्हा रुग्णालयात पोहचले आहेत. शवचिकीत्सा प्रक्रीयेअंती मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती वराडे यांनी दिली आहेय 

सांगूनही त्यांनी ऐकलं नाहीरसायनीमधील डेकोर होम कंपनीमध्ये सिव्हील इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले पाच मित्र मंगळवारी अलिबाग समुद्र किनारी फिरायला आले होते. त्यामध्ये हेबल अभिराम प्रधान,उरप प्रताप मिश्रा, सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा यांचा समावेश होता. यापैकी सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा  हे तिघं जण कुलाबा किल्ला पाहण्याकरीता ओहोटीच्यावेळी किल्ल्यात गेले होते तर अभिराम प्रधान व उरप प्रताप मिश्रा हे दोघं अलिबाग किनाऱ्यांवरच थांबले होते. दुपारी २ वाजता भरती सुरु झाल्यावर किल्ल्यात गेलेल्या एकुण आठ पर्यटकांनी या भरतीतून किनाऱ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या आठ जणांना भरतीच्या पाण्यातून जावू नका, तूम्हाला समुद्राच्या भरतीचा अंदाज येणार नाही, रिस्क घेवू नका,असं या किल्ल्यात कार्यरत पूरातत्व विभागाचे कर्मचारी महेंद्र पवार यांनी विनंतीपूर्वक सांगितलं. आठ जणांपैकी पाच जणांनी पवार यांची विनंती मान्य करुन ते किल्ल्यातच थांबले. परंतू सुरेश स्वामी, सौरभ खान, वृषभ सिव्हा या तिघांनी आपली विनंती ऐकली नाही, आणि ते भरतीच्या पाण्यातून किनाऱ्याकडे गेले, अशी माहिती पूरातत्व विभागाचे कर्मचारी महेंद्र पवार यांनी दिली. सुरेश स्वामी हा सुदैवाने पोहत किनाऱ्यांवर पोहचला. तो किनाऱ्यावर आल्यानंतर सौरभ खान व वृषभ सिव्हा बुडाल्याची माहिती समजली आणि पोलिसांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरु झाली.

त्या पाच जणांनी ऐकलं आणि ते बचावलेकिल्ल्यातून निघालेल्या आठ पैकी पाच जणांनी आपली विनंती मान्य केली. ते किल्ल्यातच थांबले, आणि सुदैवाने बचावले याचे समाधान पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान या पाच जणांना लाईफ गार्डच्या बोटीने किनाऱ्यांवर सुखरुप नेण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले.