शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

गेला एकदाचा मान्सून; देशातूनही माघार घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 05:08 IST

हवामान खात्याची घोषणा : १४ आॅक्टोबरपासून सुरू केला परतीचा प्रवास

मुंबई : देशासह महाराष्ट्र आणि मुंबईला झोड झोड झोडपणारा मान्सून आज अखेर म्हणजे बुधवारी देशातूनही हद्दपार झाला आहे. तत्पूर्वी १४ आॅक्टोबर रोजी मान्सूनने मुंबईतून आपला परतीचा प्रवास सुरू केला होता. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत म्हणजे बुधवारी मान्सून संपूर्ण भारतातून माघारी परतला आहे, अशी घोषणा हवामान खात्याने केली आहे.

नैर्ऋत्य मोसमी पाऊस बुधवारी संपूर्ण भारतातून माघारी परतला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मान्सून परतला असतानाच कोकण, गोव्याच्या अनेक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.

असा झाला प्रवासच्केरळात ८ जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने १९ जुलै रोजी देश व्यापला.च्१ जूनपासून २८ आॅगस्टपर्यंत भारतभर तब्बल १०१ टक्के पाऊस नोंदविण्यात आला.च्मध्य आणि दक्षिण भारतात अनुक्रमे ११३, १०६ टक्के पाऊस नोंदविण्यात आला.च्२१ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात १ हजार २५७ मिलीमीटर पावसाची नोंद.च्१ जून ते २९ सप्टेंबर या कालावधीत देशभरात ९५६.१ मिलीमीटर पावसाची नोंद.च्देशभरात सर्वसाधारण मान्सूनच्या तुलनेत १० टक्के अधिक मान्सूनची नोंद.च्देशभरातील २५ टक्के भाग अद्यापही दुष्काळाच्या झळा सोसत आहे.च्गेल्या १९ वर्षांत अठराव्यांदा पूर्वोत्तर राज्यांत कमी मान्सूनची नोंद.च्सांताक्रुझ वेधशाळेत तब्बल पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

राज्यात सध्या कोरडे हवामानच्नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे.च्१८ आॅक्टोबरपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज आहे.च्मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांतील काही भागात ढगाळी वातावरणासह वादळी पावसाचा अंदाज आहे.नाशिक, धुळे, जळगाव आणि नगर जिल्ह्यातील काही भागात १९ ते २० दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे.च्हवामानाची ही परिस्थिती आगामी आठवड्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात कायम राहण्याची शक्यतादेखील नाकारता येणार नाही, असे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018