शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

महिनाभरात कांदा निर्यातबंदीचे संकेत

By admin | Updated: June 18, 2014 04:36 IST

आगामी काळात देशात कांद्याचा मुबलक पुरवठा होणार असताना किमान निर्यात मूल्याचे बंधन म्हणजे मोदी सरकार कांदा उत्पादकांना मारायला निघाले आ

योगेश बिडवई, मुंबईदिल्लीत कांद्याचे किरकोळ बाजारातील दर किलोमागे १० रुपयांनी वाढून २५ ते ३० रुपयांवर गेल्यानंतर केंद्र सरकारने मंगळवारी तातडीने कांद्याचे किमान निर्यात मूल्य प्रति टन ३०० डॉलर निश्चित केले. निर्यात मूल्याच्या बंधनामुळे कांद्याच्या दरवाढीला लगाम लागेल, असे सरकारला वाटते. मात्र मोदी सरकारच्या या निर्णयामुळे महिनाभरात कांद्याच्या निर्यातीवर बंदी येऊ शकते, अशी भीती जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आगामी काळात देशात कांद्याचा मुबलक पुरवठा होणार असताना किमान निर्यात मूल्याचे बंधन म्हणजे मोदी सरकार कांदा उत्पादकांना मारायला निघाले आहे, अशा शब्दांत नाफेडचे संचालक चांगदेव होळकर यांनी केंद्राच्या निर्णयावर टीकास्र सोडले आहे. आणखी एक महिन्याने सरकारने निर्यात बंदी लागू केली तर आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्हणाले.गेल्या वर्षी मार्च महिन्यात कांद्याचे निर्यात मूल्य शून्यावर आणल्यानंतर आणि मुबलक उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात झाली होती. त्यामुळे उन्हाळ कांद्याची दरवर्षीपेक्षा कमी साठवणूक झाल्याचे लासलगाव बाजार समितीचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी सांगितले. उन्हाळ कांद्याची आवक संपल्यानंतर व नवा कांदा बाजार येईपर्यंत आॅक्टोबरनंतर काही काळ काद्यांची आवक कमी होते. ही पोकळी भरून काढण्यासाठी कांद्याची निर्यात रोखण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो, असेही पाटील म्हणाले. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत कांदा मुबलक प्रमाणात असल्याने भाव भडकण्याची चिन्हे नसल्याचे ते म्हणाले.