शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आयटीआय प्रवेशाचा एक लाखाचा टप्पा पार; समुपदेशन फेरी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 10:29 IST

३० ऑक्टोबरपर्यंत प्रवेशनिश्चितीचे आवाहन

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात आयटीआय प्रवेशाचा १ लाख प्रवेशाचा टप्पा पूर्ण झाला असून ३० ऑक्टोबरपर्यंत आयटीआय प्रवेशाची समुपदेशन फेरी सुरू राहणार आहे, तर आतापर्यंत आयटीआयचे जवळपास एकूण ७० टक्के प्रवेश झाले असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी समुपदेशन फेरीतून आपले प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन संचालक दिंगबर दळवी यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाला झालेल्या विलंबाने आयटीआय प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांची पसंती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आयटीआयच्या पहिल्या फेरीमध्ये ३१,५२९, दुसऱ्या फेरीत १५,५९८, तिसऱ्या फेरीत १५,२६१ आणि चौथ्या फेरीत ९९५८ असे चार फेऱ्यांमध्ये तब्बल ७२ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. मागील वर्षी या चार फेऱ्यांमध्ये ६२ हजार ७८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यामुळे समुपदेशन फेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत वाढ होणार आहे. आतापर्यंत समुपदेशन फेरीमध्ये २५ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये शासकीय संस्थांमध्ये १९,७५५, तर खासगी संस्थांमध्ये ५८८३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र, गतवर्षी समुपदेशन फेरीमध्ये ३२,६७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्या तुलनेत यंदा समुपदेश फेरीला विद्यार्थ्यांचा फारच कमी प्रतिसाद मिळाला असला तरी त्यात वाढ अपेक्षित आहे. प्रवेशाची स्थिती फेरी                     प्रवेश                      २०२१    २०२०पहिली         ३१५२९    २५५८२दुसरी           १५५९८    १३१०२तिसरी          १५२६१    १२७७७चौथी            ९९५८     ११३२३समुपदेश    २५६३८    ३२६७६(प्रवेश सुरू)