शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

एक इंच महाराष्ट्र वेगळा होऊ देणार नाही

By admin | Updated: February 12, 2017 02:23 IST

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी स्वप्नात जरी मुंबई तोडण्याचा विचार केला तर तिथे जाऊन त्याची नरडी दाबू. मुंबई, विदर्भच काय महाराष्ट्राचा

मुंबई : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रश्नच येत नाही. कोणी स्वप्नात जरी मुंबई तोडण्याचा विचार केला तर तिथे जाऊन त्याची नरडी दाबू. मुंबई, विदर्भच काय महाराष्ट्राचा एक इंचही वेगळा होऊ देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला. शनिवारी वडाळा येथील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा टीकेचे लक्ष्य बनविले. शिवसेनेने सर्वाधिक गुंडांना उमेदवारी दिल्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आरोपाचा त्यांनी या वेळी समाचार घेतला. देवस्थानच्या जमिनी हडपणाऱ्या गुंडांनाही भाजपाने पक्षात घेतले. सगळे गुंड सध्या भाजपात दाखल झाले आहेत. गुंडांचा वापर करत निवडणुका जिंकण्याचा डाव मुख्यमंत्री आखत असतील तर निवडणुका बाजूला ठेवून आधी गुंडांचा बंदोबस्त करू. शिवसेनेत गुंड नाहीत, सैनिक आहेत. मुंबईसाठी धावून जाणारे शिवसैनिक आहेत. ९२ साली शिवसैनिकच धावला, अंगावर वार झेलले म्हणून मुंबई वाचली. श्रीकृष्ण आयोगाने अहवालात शिवैनिकांची नावे घेतली. ज्यांनी मुंबई वाचवली ते गुंड नव्हते. तेंव्हा हे भाजपावाले कुठे होते, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.मुद्दे नसले की लोक खोटेनाटे आरोप करतात. मुंबईत जितकी कामे शिवसेनेने केली तितकी कोणत्याच पक्षाने केली नाहीत. चिखलात कमळ फुलते म्हणतात, मग आमच्यावर कमळ फेका चिखल का फेकता, असा सवाल करतानाच यांच्याकडे कमळ नाही फक्त मळ आणि मळमळ आहे. आमच्याकडे विकासाची तळमळ आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. पोलीस खाते तुमच्याकडे आहे तरी मुंबईचे पाटणा झाल्याचा आरोप कसा काय करता? आता भाजपा खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, रस्त्याच्या कामाला अधिकारी आणि आयुक्त जबाबदार आहेत. त्या कामांशी नगरसेवकांचा संबंध नाही. अधिकारी, आयुक्त नेमण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे आहे, असे उद्धव म्हणाले.सामान्य मुंबईकर दरवर्षी २ लाख कोटींचा कर दिल्लीला देतो. पंतप्रधान म्हणून कारभार करायचा सोडून तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, अशा धमक्या मोदी देत आहेत. जन्माला येतो त्याची कुंडली बनतेच, मोदींचीसुद्धा कुंडली आहेच. त्या वेळी बाळासाहेब नसते तर काय केले असते, असा सवालही उद्धव यांनी केला. (प्रतिनिधी)...हा तर शिवरायांचा अपमानलोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळीही शिवरायांचा आशीर्वाद होता. मग शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी तुम्ही दोन वर्षांत काय केले याचे उत्तर द्या, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. खोटे बोलणारे मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभणे हा शिवरायांचा अपमान आहे, असे उद्धव या वेळी म्हणाले.