शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या परिवारासाठी एक मूठ धान्य

By admin | Updated: December 31, 2015 02:38 IST

वाशिमची राजरत्न संस्था व नेहरु मंडळाचा उपक्रम.

नंदकिशोर नारे/वाशिम: सततची नापिकी, अवकाळी पाऊस आणि वाढत्या महागाईमुळे बळीराजा हवालदिल झाला असून, शेतकरी आत्महत्यांमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ही बाब हेरुन वाशिमची राजरत्न संस्था व नेहरु मंडळाने सोशल मीडियाच्या मदतीने ह्यएक मूठ धान्य आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या परिवारासाठीह्ण उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.जगाचा पोशिंदा व लोक जीवनाचा आधारस्तंभ म्हणून शेतकर्‍यांकडे पाहिले जाते; मात्र प्राप्त परिस्थितीत बळीराजावर आत्महत्येची पाळी आली आहे. राज्याचा विचार केल्यास सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात होत आहेत. अशा स्थितीत शेतकरी आत्महत्याग्रस्त निराधार परिवारांना मायेची साथ मिळावी, याकरिता सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली वाशिम येथील राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था आणि एकांबा येथील नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या सहयोगाने ह्यएक मूठ धान्य आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या परिवारासाठीह्ण जमा करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास देण्याचे ठरविले आहे. यासाठी सोशल मिडीयासह पथनाट्य, तसेच मार्गदर्शन शिबिराद्वारे शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती केली जात आहे. १0 डिसेंबरपासून सुरू केलेल्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन वर्षातील पहिल्या रविवारपासून एका गावाची निवड करून, त्या गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास हे धान्य वितरित केले जाणार आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे युवा मित्र विनोद पट्टेबहादूर, युवा मित्र भगवान ढोले, अरविंद उचित, युवा मित्र आकाश खडसे, जिल्हा युवती मित्र सोनल तायडे, स्नेहल तायडे, अभिनेत्री हंसीनी उचित, विजय चव्हाण, राम पाटील, विकास अवगण, पवन राऊत, गजानन गोटे, विजय सावळकर, पवन खुनारे आणि नितीन आढाव परिङ्म्रम घेत आहेत. दर रविवारी राबविणार उपक्रमसंस्थेने सुरु केलेल्या उपक्रमातून जमा झालेल्या धान्याचे वितरण नवीन वर्षातील पहिल्या रविवारपासून केल्या जाणार आहे. एका गावातील जवळपास पाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा समावेश राहील. गरज पाहून धान्याचे वितरण करण्याचा संस्थेचा मानस आहे.वासुदेवाच्या वेशभूषेत अभिनेता उचित करतोय प्रचारया उपक्रमाला प्रतिसाद मिळावा याकरिता संस्थेच्यावतिने विविध युक्त्या लढविण्यात येत आहे. मराठी चित्रपटातील अभिनेते अरविंद उचित वासुदेवाच्या वेशभूषेत गावागावात जावून याबाबत जनजागृती करीत आहेत.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिली जाणार धान्याची ह्यकीटह्णदर रविवारी एका गावाची निवड करुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक धान्याची कीट देण्यात येणार आहे. यामध्ये १0 किलो धान्य (गहू किंवा ज्वारी), १0 किलो तांदूळ, २ किलो दाळ (उपलब्ध असलेली), २ लिटर खाद्य तेल व एक मसाला पाकीट ज्यामध्ये मिरची, मीठ व इतर स्वयंपाकासाठी लागणार्‍या पदार्थांचा समावेश आहे.