शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या परिवारासाठी एक मूठ धान्य

By admin | Updated: December 31, 2015 02:38 IST

वाशिमची राजरत्न संस्था व नेहरु मंडळाचा उपक्रम.

नंदकिशोर नारे/वाशिम: सततची नापिकी, अवकाळी पाऊस आणि वाढत्या महागाईमुळे बळीराजा हवालदिल झाला असून, शेतकरी आत्महत्यांमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. ही बाब हेरुन वाशिमची राजरत्न संस्था व नेहरु मंडळाने सोशल मीडियाच्या मदतीने ह्यएक मूठ धान्य आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या परिवारासाठीह्ण उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.जगाचा पोशिंदा व लोक जीवनाचा आधारस्तंभ म्हणून शेतकर्‍यांकडे पाहिले जाते; मात्र प्राप्त परिस्थितीत बळीराजावर आत्महत्येची पाळी आली आहे. राज्याचा विचार केल्यास सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात होत आहेत. अशा स्थितीत शेतकरी आत्महत्याग्रस्त निराधार परिवारांना मायेची साथ मिळावी, याकरिता सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली वाशिम येथील राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था आणि एकांबा येथील नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळाच्या सहयोगाने ह्यएक मूठ धान्य आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या परिवारासाठीह्ण जमा करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास देण्याचे ठरविले आहे. यासाठी सोशल मिडीयासह पथनाट्य, तसेच मार्गदर्शन शिबिराद्वारे शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती केली जात आहे. १0 डिसेंबरपासून सुरू केलेल्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नवीन वर्षातील पहिल्या रविवारपासून एका गावाची निवड करून, त्या गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास हे धान्य वितरित केले जाणार आहे. या उपक्रमासाठी संस्थेचे युवा मित्र विनोद पट्टेबहादूर, युवा मित्र भगवान ढोले, अरविंद उचित, युवा मित्र आकाश खडसे, जिल्हा युवती मित्र सोनल तायडे, स्नेहल तायडे, अभिनेत्री हंसीनी उचित, विजय चव्हाण, राम पाटील, विकास अवगण, पवन राऊत, गजानन गोटे, विजय सावळकर, पवन खुनारे आणि नितीन आढाव परिङ्म्रम घेत आहेत. दर रविवारी राबविणार उपक्रमसंस्थेने सुरु केलेल्या उपक्रमातून जमा झालेल्या धान्याचे वितरण नवीन वर्षातील पहिल्या रविवारपासून केल्या जाणार आहे. एका गावातील जवळपास पाच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा समावेश राहील. गरज पाहून धान्याचे वितरण करण्याचा संस्थेचा मानस आहे.वासुदेवाच्या वेशभूषेत अभिनेता उचित करतोय प्रचारया उपक्रमाला प्रतिसाद मिळावा याकरिता संस्थेच्यावतिने विविध युक्त्या लढविण्यात येत आहे. मराठी चित्रपटातील अभिनेते अरविंद उचित वासुदेवाच्या वेशभूषेत गावागावात जावून याबाबत जनजागृती करीत आहेत.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला दिली जाणार धान्याची ह्यकीटह्णदर रविवारी एका गावाची निवड करुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक धान्याची कीट देण्यात येणार आहे. यामध्ये १0 किलो धान्य (गहू किंवा ज्वारी), १0 किलो तांदूळ, २ किलो दाळ (उपलब्ध असलेली), २ लिटर खाद्य तेल व एक मसाला पाकीट ज्यामध्ये मिरची, मीठ व इतर स्वयंपाकासाठी लागणार्‍या पदार्थांचा समावेश आहे.