शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा जिओ और जीने दोचा प्रत्यय

By admin | Updated: July 27, 2016 22:21 IST

हैद्राबादेत कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना जीवदान देऊन पुन्हा एकदा जैन बांधवांनी 'जिओ और जीने दो' चा प्रत्यय घडविला आहे

अहिंसा परमो धर्म : हैद्राबादेत कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना सोडविले औरंगाबाद- हैद्राबादेत कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना जीवदान देऊन पुन्हा एकदा जैन बांधवांनी 'जिओ और जीने दो' चा प्रत्यय घडविला आहे. बुधवारी सायंकाळी २० ट्रकद्वारे उंट कर्णपुरा मैदानात आणण्यात आली. येथून हे उंट राजस्थान येथील सिरोही परिसरातील पांजरापोळ येथे नेण्यात येणार आहे. तिथेच त्यांचा सांभाळ करण्यात येणार आहे. अहिंसा परमो धर्माचे पालन करीत जैन बांधवांनी कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना वाचवून एक आदर्श निर्माण केला आहे. हैद्राबादेतील जैन बांधवांनी ही उंट सोडविली व पालनपोषणासाठी राजस्थानमधील पांजरापोळकडे रवाना केली. २० ट्रकमध्येही उंट ठेवण्यात आली आहेत.

राजस्थानकडे जाताना उंटांचा हा ताफा रात्री ८ वाजता औरंगाबादेत पोहोचला. कर्णपुऱ्यात सकल जैन समाज व जैन अलर्ट ग्रुपच्यावतीने उंटांची व्यवस्था करण्यात आली होती. येथे मुनीश्री निलेशचंद्र विजयजी म.सा., मुनिश्री यशचंद्र विजयी म.सा. व मुनिश्री पुनित विजयजी म.सा. यांनी मांगलिक दिली. तत्पूर्वी ४ वाजता आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघ, राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश म.सा., पद्ममुनिजी म.सा., मुनिश्री निलेशचंद्र विजयजी म.सा., साध्वीजी प्रज्ञाश्रीजी म.सा., साध्वीजी सुमीताश्रीजी म.सा., साध्वी सत्यवतीजी म.सा., साध्वी प्रशांतकंवरजी म.सा. यांचे पदयात्रेने जयघोषात कर्णपुऱ्यातील मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिर येथे आगमन झाले. यावेळी पावसाच्या आगमनाने आनंदीवातावरण निर्माण झाले होते.

ना हिंसा करेगे ना हिंसा होने देंगेह्ण असे सांगत राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश म.सा. म्हणाले की, अहिंसेचे पालन करणाऱ्यांनी हिंसा विरोधात एकवटून आवाज बुलंद केला पाहिजे. कत्तलखाने बंद करण्यासाठी सर्व समाजातील अहिंसाप्रेमींनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे. पशूची रक्षा म्हणजे पर्यावरणाची, पृथ्वीची व मानवजातीची रक्षा करणे होय, असा संदेश त्यांनी दिला. गुप्तीनंदीजी गुरुदेव म्हणाले की, हिंसेचा विरोध न करणारे त्या हिंसेत अप्रत्यक्षपणे भागीदार असतात. नुसतेच ह्यजीओ और जिने दो ची घोषणा देऊन चालणार नाही तर प्रत्यक्षात हिंसे विरोधात आवाज बुलंद करा. प्राणी हत्या करुन तयार केलेले लिपस्टिक, पावडर, चामडी बुट, पट्टे खरेदी करणे बंद करा, असे आवाहनही गुरुदेव यांनी केले.

जैन समाजात विविध पंथ आहेत मात्र, सिद्धांत एकच आहे जीओ और जिने दो असे मुनीश्री निलेशचंद्र विजयजी म.सा. यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय संचेती यांनी केले. यावेळी डॉ.शांतीलाल संचेती, प्रकाश बाफना, मिठालाल कांकरिया, विजयराज संघवी, अशोक अजमेरा, रतीलाल मुगदिया, ताराचंद बाफना, कांतीलाल बोथरा. डि.बी.कासलीवाल, महावीर ठोले,सुनील काला, डॉ.रमेश बडजाते, चांदमल चांदीवाल, रवी मुगदिया, एम.आर.बडजाते, कांतीलाल बोथरा, दिलीप मुगदिया, जैन अलर्ट ग्रुपचे सदस्य व जैनबांधव मोठ्या संख्यने हजर होते. उंटांचा ताफा उद्या पोहचणार राजस्थानात ग्रेटर हैदराबाद सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएलटी टू अनिमल या संघटनेचे सुरेंद्र भंडारी यांनी सांगितले की, २० ट्रकमध्ये ८३ उंटांना घेऊन आम्ही सोमवारी मध्यरात्री हैदराबादहून निघालो. आज रात्री औरंगाबादेत आलो असून शुक्रवारी रात्रीपर्यंत राजस्थानमधील सिरोही येथील पांजरापोळ येथे पोहोचणार आहोत. तिथे या उंटांचा सांभाळ करण्यात येईल. या कार्यात संघटनेचे दत्तात्रय जोशी, डॉ.विश्वचैतन्या, दिनेशकुमार आचलिया, अमितकुमार आचलिया हे पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.