शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

पुन्हा एकदा जिओ और जीने दोचा प्रत्यय

By admin | Updated: July 27, 2016 22:21 IST

हैद्राबादेत कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना जीवदान देऊन पुन्हा एकदा जैन बांधवांनी 'जिओ और जीने दो' चा प्रत्यय घडविला आहे

अहिंसा परमो धर्म : हैद्राबादेत कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना सोडविले औरंगाबाद- हैद्राबादेत कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना जीवदान देऊन पुन्हा एकदा जैन बांधवांनी 'जिओ और जीने दो' चा प्रत्यय घडविला आहे. बुधवारी सायंकाळी २० ट्रकद्वारे उंट कर्णपुरा मैदानात आणण्यात आली. येथून हे उंट राजस्थान येथील सिरोही परिसरातील पांजरापोळ येथे नेण्यात येणार आहे. तिथेच त्यांचा सांभाळ करण्यात येणार आहे. अहिंसा परमो धर्माचे पालन करीत जैन बांधवांनी कत्तलखान्यात जाणाऱ्या ८३ उंटांना वाचवून एक आदर्श निर्माण केला आहे. हैद्राबादेतील जैन बांधवांनी ही उंट सोडविली व पालनपोषणासाठी राजस्थानमधील पांजरापोळकडे रवाना केली. २० ट्रकमध्येही उंट ठेवण्यात आली आहेत.

राजस्थानकडे जाताना उंटांचा हा ताफा रात्री ८ वाजता औरंगाबादेत पोहोचला. कर्णपुऱ्यात सकल जैन समाज व जैन अलर्ट ग्रुपच्यावतीने उंटांची व्यवस्था करण्यात आली होती. येथे मुनीश्री निलेशचंद्र विजयजी म.सा., मुनिश्री यशचंद्र विजयी म.सा. व मुनिश्री पुनित विजयजी म.सा. यांनी मांगलिक दिली. तत्पूर्वी ४ वाजता आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव ससंघ, राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश म.सा., पद्ममुनिजी म.सा., मुनिश्री निलेशचंद्र विजयजी म.सा., साध्वीजी प्रज्ञाश्रीजी म.सा., साध्वीजी सुमीताश्रीजी म.सा., साध्वी सत्यवतीजी म.सा., साध्वी प्रशांतकंवरजी म.सा. यांचे पदयात्रेने जयघोषात कर्णपुऱ्यातील मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिर येथे आगमन झाले. यावेळी पावसाच्या आगमनाने आनंदीवातावरण निर्माण झाले होते.

ना हिंसा करेगे ना हिंसा होने देंगेह्ण असे सांगत राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश म.सा. म्हणाले की, अहिंसेचे पालन करणाऱ्यांनी हिंसा विरोधात एकवटून आवाज बुलंद केला पाहिजे. कत्तलखाने बंद करण्यासाठी सर्व समाजातील अहिंसाप्रेमींनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे. पशूची रक्षा म्हणजे पर्यावरणाची, पृथ्वीची व मानवजातीची रक्षा करणे होय, असा संदेश त्यांनी दिला. गुप्तीनंदीजी गुरुदेव म्हणाले की, हिंसेचा विरोध न करणारे त्या हिंसेत अप्रत्यक्षपणे भागीदार असतात. नुसतेच ह्यजीओ और जिने दो ची घोषणा देऊन चालणार नाही तर प्रत्यक्षात हिंसे विरोधात आवाज बुलंद करा. प्राणी हत्या करुन तयार केलेले लिपस्टिक, पावडर, चामडी बुट, पट्टे खरेदी करणे बंद करा, असे आवाहनही गुरुदेव यांनी केले.

जैन समाजात विविध पंथ आहेत मात्र, सिद्धांत एकच आहे जीओ और जिने दो असे मुनीश्री निलेशचंद्र विजयजी म.सा. यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय संचेती यांनी केले. यावेळी डॉ.शांतीलाल संचेती, प्रकाश बाफना, मिठालाल कांकरिया, विजयराज संघवी, अशोक अजमेरा, रतीलाल मुगदिया, ताराचंद बाफना, कांतीलाल बोथरा. डि.बी.कासलीवाल, महावीर ठोले,सुनील काला, डॉ.रमेश बडजाते, चांदमल चांदीवाल, रवी मुगदिया, एम.आर.बडजाते, कांतीलाल बोथरा, दिलीप मुगदिया, जैन अलर्ट ग्रुपचे सदस्य व जैनबांधव मोठ्या संख्यने हजर होते. उंटांचा ताफा उद्या पोहचणार राजस्थानात ग्रेटर हैदराबाद सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएलटी टू अनिमल या संघटनेचे सुरेंद्र भंडारी यांनी सांगितले की, २० ट्रकमध्ये ८३ उंटांना घेऊन आम्ही सोमवारी मध्यरात्री हैदराबादहून निघालो. आज रात्री औरंगाबादेत आलो असून शुक्रवारी रात्रीपर्यंत राजस्थानमधील सिरोही येथील पांजरापोळ येथे पोहोचणार आहोत. तिथे या उंटांचा सांभाळ करण्यात येईल. या कार्यात संघटनेचे दत्तात्रय जोशी, डॉ.विश्वचैतन्या, दिनेशकुमार आचलिया, अमितकुमार आचलिया हे पदाधिकारी सहकार्य करीत आहेत.