शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

जुन्या कर्जमाफीचा एकही कागद सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:01 IST

आघाडी सरकारच्या काळात २००८, २००९ मध्ये देण्यात आलेल्या कर्जमाफीचा काही रेकॉर्डच सापडत नसल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला

विशेष प्रतिनिधी मुंबई : आघाडी सरकारच्या काळात २००८, २००९ मध्ये देण्यात आलेल्या कर्जमाफीचा काही रेकॉर्डच सापडत नसल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला. शेतकºयांच्या नावाखाली उद्योग, बिल्डर यांची कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी केल्याचे धक्कादायक प्रकार त्या वेळी घडले, असा आरोप करत या वेळी काहीही होऊ नये म्हणूनच शेतकºयांचे आॅनलाइन आणि आॅफलाइनही २६ हजार अर्ज आपले सरकार केंद्रांवर भरून घेण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.कर्जमाफीवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमत्री म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात वाहत्या गंगेत अनेकांनी हात धुऊन घेतले. त्यात बँकादेखील होत्या. विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांना २८६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली तर मुंबईत २०८ कोटींची कर्जमाफी देण्यात आली. राज्यस्तरीय बँकिंग समितीने शेतकºयांची नावे सरकारकडे पाठविली आणि शहानिशा न करता कर्जमाफी देण्यात आल्याने एकेकाची ६०-६० लाखांची कर्जे माफ करण्यात आली. हे सगळे गैरप्रकार टाळावेत म्हणून प्रत्येक शेतकºयाकडून साधा सुटसुटीत अर्ज भरून घेत आहोत.शेतकरी कर्जमाफीच्या योजनेची योग्य अंमलबजावणी होते की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्ष सदस्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.कर्जमाफी हा शेतकºयांच्या समस्येवरील अंतिम उपाय नाही. स्वामीनाथन यांचेही तेच म्हणणे आहे. याच उपायावर सरकार थांबले तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होतील. म्हणून कर्ज फेडण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. संस्थात्मक कर्जरचनेतून बाहेर गेलेल्या शेतकºयाला त्यारचनेत परत आणणे हा कर्जमाफीचा मुख्य उद्देश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले की, आघाडी सरकारने २००९ मध्ये ४ हजार कोटींची कर्जमाफी दिली. त्याच्या प्रसिद्धीसाठी १ कोटी ६० लाख रुपये खर्च केले. आम्ही ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिली अन् आतापर्यंत प्रसिद्धीवर ३६ लाख रुपयेच खर्च केले. खरंखोटं माहिती नाही पण वर्षपूर्तीनिमित्त केजरीवाल यांनी जाहिरातींवर ४०० कोटी रुपये खर्च केले होते.दहा हजार रुपयांच्या कर्जमाफीबाबत काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी अजिबात सहकार्य केले नाही. त्यात अमरावती जिल्हा बँकही एक आहे. अशांचे भविष्यात काय करायचे ते बघू, असा दमही मुख्यमंत्र्यांनी दिला. दहा हजारांच्या कर्जासाठी कोणताही बाँड शेतकºयांकडून मागण्यात आलेला नाही. साधा अर्ज करायचा आहे. एखादी बँक बाँड मागत असेल तर नाव सांगा, त्यांना सरळ करू, असा इशाराही त्यांनी दिला.