शहरं
Join us  
Trending Stories
1
पाऊस थांबला, कव्हर्स हटले! KKR vs MI मॅच सुरू होण्याची वेळ ठरली, पण षटकं कमी झाली
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

‘ओखी’ चक्रीवादळाचा धोका नाही, हवामान खात्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 6:12 AM

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ‘ओखी’ या चक्रीवादळात झाले आहे. श्रीलंकेजवळ निर्माण झालेले हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे.

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ‘ओखी’ या चक्रीवादळात झाले आहे. श्रीलंकेजवळ निर्माण झालेले हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. येत्या २४ तासांत चक्रीवादळाचा वेग आणि प्रभाव वाढणार असला तरी गोव्यासह महाराष्ट्रातील मुंबई आणि उर्वरित किनारपट्टी क्षेत्राला ‘ओखी’ चक्रीवादळाचा धोका तुर्तास तरी नाही, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या नियंत्रण कक्षाने दिली.गुरुवारी हे चक्रीवादळ कन्याकुमारीच्या दक्षिणेपासून ६० किलोमीटर, त्रिवेंद्रमपासून १२० किलोमीटर अंतरावर नोंदविण्यात आले आहे. पुढील २४ तासांत चक्रीवादळाचा प्रभाव आणि वेग आणखी वाढणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अरबी समुद्रातील वातावरण हे चक्रीवादळास अनुकूल असल्याने त्याचा प्रभाव आणखी वाढणार आहे. दक्षिण भारतातील काही भागांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय येथे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, चक्रीवादळाचा प्रभाव वाढत असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.थंडीचा जोर वाढतोय...राज्यासह मुंबईत थंडीचा जोर कायम आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान भिरा येथे १०.५ अंश नोंदविण्यात आले आहे. राज्याचा विचार करता विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. तर येत्या ४८ तासांसाठी मुंबईचे किमान तापमान १८ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी येथे पडलेली थंडी मुंबईकरांना आणखी हुडहुडी भरवणार आहे.सध्या पहाटेच्या वेळी मुंबईत गारवा असतो. दुपारी उकाडा असला तरी संध्याकाळनंतर पुन्हा गारवा सुरू होतो. काही दिवसांनी या गारव्यात वाढ होत जाईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊस