शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

अरे, उमेदवारच सापडेना !

By admin | Updated: January 19, 2017 03:14 IST

राजकीय पक्षाचा कार्यक्रम म्हटले की, प्रभागात कार्यकर्त्यांची फौजच्या फौज उभी राहते.

पूजा दामले,

मुंबई- राजकीय पक्षाचा कार्यक्रम म्हटले की, प्रभागात कार्यकर्त्यांची फौजच्या फौज उभी राहते. आमच्याकडे कार्यकर्त्यांची कमतरता नाही म्हणून मिरवणाऱ्या राजकीय पक्षांसमोरही आता महिला उमेदवार शोधण्यासाठी पळापळ करण्याची वेळ आली आहे. कारण नव्या आरक्षण सोडतीत चर्नीरोड पूर्वेकडील ‘सी’ वार्डातील प्रभाग २२२ हा इतर मागासवर्गीय महिला झाल्याने निवडणुकीच्या रिंगणात कोणता चेहरा मतदारांसमोर आणायचा यावरून राजकीय पक्षांची तारांबळ उडाली आहे.गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये २१८ प्रभागात येणारा काही भाग आता प्रभाग २२२मध्ये गेला आहे. त्यामुळे या विभागात सर्वच पक्षांना आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. गेल्या वेळेस खुला असणारा हा प्रभाग आता इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाला आहे. कार्यकर्त्यांची जुळवाजुळव आणि नव्याने पडलेले आरक्षण यामुळे आगामी निवडणुकीत कोणता उमेदवार रिंगणात उतरवायचा? हा यक्षप्रश्न सर्व पक्षांना पडला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे. शिवसेनेकडे संभाव्य उमेदवार म्हणून महिला पदाधिकारी, माजी नगरसेविका आहेत; पण अजूनही शिवसेनेकडून कोणत्या उमेदवाराला उभे करायचे याविषयी विचार सुरू आहेत. माजी नगरसेविकेबरोबर अजून एका महिला उमेदवाराचे नाव सध्या चर्चेत आहे; पण नक्की कोणत्या महिलेला कौल मिळेल याचे कोडे अद्याप सुटले नाही. काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भारतीय जनता पक्ष (भाजपा) या पक्षांमध्ये महिला कार्यकर्त्यांचीही कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आता या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या महिला नातेवाइकांची वर्णी लागावी म्हणून लगबग सुरू आहे. भाजपामधूनही दोन ते तीन नावांची चर्चा सुरू आहे; पण एका महिला उमेदवारावर आमदाराचा वरदहस्त असल्याने त्या महिलेची वर्णी लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. काँग्रेसकडून तीन, तर सेवा दलातून एक महिला उमेदवाराचे नाव चर्चेत आहे. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची बहीण, पत्नी यांची नावे चर्चेत आहेत, तर मनसेकडून एका कार्यकर्त्याच्या पत्नीचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. >नव्या चेहऱ्याला नकारया प्रभागात मराठी आणि गुजराती भाषिक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडताना याचाही विचार केला जात आहे. त्यामुळे उमेदवार निवड प्रक्रिया अधिकच क्लिष्ट होत चालली आहे. अनेक निकष लावताना जनसंपर्क किती? या निकषाचा विचार करणेही अपरिहार्य असल्याने राजकीय पक्षांची तारेवरची कसरत होत आहे. त्यामुळे नवीन महिला चेहरा आणण्यासाठी राजकीय पक्षांची तयारी दिसत नाही.