शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे अधिकार्‍यांची साक्ष!

By admin | Updated: July 27, 2014 23:03 IST

लाचखोरीच्या खटल्यांचा लवकर निपटारा करण्याचा प्रयत्न;विधी व न्याय विभागाची सूचना

अकोला: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने केलेल्या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकार्‍याची, त्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू होईपर्यंत इ तरत्र बदली झाल्यास, अशा अधिकार्‍याची साक्ष ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे नोंदविण्याची व्यवस्था करण्याची सूचना, विधी व न्याय विभागाने केली आहे.एसीबीच्या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकार्‍यांची बदली झाली, की ते आधी कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील न्यायालयात साक्ष नोंदविण्यासाठी जाणे त्यांच्यासाठी अनेकदा गैरसोयीचे ठरते. त्यामुळे खटल्याचे कामकाज लांबते. ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन, एसीबीचे खटले या किरकोळ कारणाने प्रभावित होऊ नयेत, यासाठी विधी व न्याय विभागाने ही सूचना केली आहे.लाचखोर सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरुद्ध एसीबीकडून कारवाई केली जाते. एसीबी गुन्ह्यांचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करते; मात्र खटले लवकर निकाली निघत नाहीत. त्यामुळे न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकवेळा साक्षीदारांअभावीही खटल्याची सुनावणी लांबत राहते. लाचखोरीच्या खटल्यांमध्ये कारवाईत सहभागी असलेल्या अधिकार्‍यांचीही साक्ष नोंदविण्यात येते; मात्र कारवाईत सहभागी असलेल्या अधिकार्‍यांची बदली झाली, की नवीन ठिकाणच्या व्यस्ततेमुळे, साक्ष नोंदविण्यासाठी आधी कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील न्यायालयात हजर होणे त्यांच्यासाठी अडचणीचे ठरते. परिणामी खटल्याचे कामकाज लांबते. या अडचणींचा विचार करून अधिकार्‍यांची साक्ष ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे नोंदविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी खटल्याशी संबंधित वकिलांनी साक्षीदार अधिकार्‍यांशी संपर्क साधून, त्यांची साक्ष नोंदविण्याची तारीख आणि वेळ निश्‍चित करावी आणि त्यांची साक्ष ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सिंगह्णद्वारे नोंदविण्याची विनंती एसीबीने न्यायालयास करावी, असा आदेश विधी व न्याय विभागाने दिला आहे. *२४८८ खटले प्रलंबितलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेले एकूण २,४९९ खटले राज्यभरा तील विविध न्यायालयांमध्ये ३0 जून २0१४पर्यंत प्रलंबित होते. मुंबई परिक्षेत्रातील १0२, ठाण्यातील ३५४, पुण्यातील ४३९, नाशिकमधील २९९, अमरावतीमधील २७३, औरंगाबादमधील ३३५ आणि नांदेड परिक्षेत्रातील २२१ खटले प्रलंबित आहेत. *शिक्षेचे प्रमाण अल्पलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खटल्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प असल्याचे गत दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. २0१३ मध्ये एकूण ३८७ प्रकरणांपैकी ३0७ खटल्यांतील आरोपींची निर्दोष मुक्तता झाली, तर केवळ ८0 खटल्यांतील आरोपींना शिक्षा झाली. यावर्षी ३0 जूनपर्यंत १४१ प्रकरणांपैकी १0१ खटल्यांतील आरोपींची निर्दोष मुक्त करण्यात आली असून, ४0 खटल्यातील आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.