शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

अनधिकृत पार्किंगमुळे ‘अधिकृत’ वाहतूक कोंडी

By admin | Updated: September 24, 2016 01:28 IST

हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या (एचआयए) पुढाकाराने मेट्रो जीप प्रकल्प सुरू केला.

वाकड : आयटीनगरी म्हणून ओळख असणाऱ्या हिंजवडीतील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या (एचआयए) पुढाकाराने मेट्रो जीप प्रकल्प सुरू केला. मात्र, या प्रकल्पाच्या बसगाड्यांना अधिकृत वाहनतळ नसल्याने ह्या बसगाड्या कुठेही अस्ताव्यस्त व अनधिकृतपणे उभ्या करण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. हिंजवडी उपनगरामध्ये आयटी कंपन्यांचे जाळे असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ अशा भागांमधून कामगार येत असतात. येथील रस्त्यांवरून दररोज अगणित वाहनांची ये-जा असते. त्यामुळे हिंजवडी परिसरात वाहतूककोंडी ही जटिल समस्या बनली आहे. या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून औद्योगिक विकास महामंडळ आणि एचआयए यांच्या संयुक्त विद्यमाने मेट्रो जीप ग्रीन आणि डिलाइट असा प्रकल्प हिंजवडीत राबविण्यात आला. या प्रकल्पाच्या ताफ्यात नुकतीच शंभरावी बसदेखील सामील झाली आहे. या प्रकल्पाद्वारे हजारो आयटी अभियंत्यांचा विनाअडथळा ये-जा करण्याचा प्रश्न तूर्तास काही प्रमाणात मिटला आहे. मात्र, ह्या बसगाड्यांसाठी अद्याप स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था नसल्याने ह्या बसगाड्या वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत आहेत. हिंजवडी फेज तीनसह आयटीनगरीच्या अन्य रस्त्यांवर ह्या बस वाहनचालक अस्ताव्यस्त उभ्या करत आहेत. हिंजवडी फेज तीन येथील मेगा पोलीस सर्कलला पीएममीचा थांबा आहे. मात्र, या थांब्यावर पीएमपीऐवजी मेट्रो जीपच्या बसगाड्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतुकीला तर अडथळा होतो. ह्या बसगाड्यांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. आयटी पार्कमधील वाहतूककोंडी फोडण्यासाठी रस्ते प्रशस्त झाले. मात्र, ह्या रस्त्यांचा सुमारे ४० टक्के भाग वाहनांच्या अनधिकृत पार्किं गनेच व्यापलेला असतो. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी आहेत की पार्किंगसाठी, असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मुळशी शिवसेनेने आवाज उठविला असून, लवकरात लवकर स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिवसेंदिवस आयटीनगरीत वाहनांच्या संख्या वाढत असताना पार्किंगची सोय नसल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर) >आयटी अभियंत्यांच्या सुविधेसाठी मेट्रो जीप हा प्रकल्प सुरू करण्यात आला. मात्र, ह्या बसगाड्यांसाठी अद्याप स्वतंत्र वाहनतळ नसल्याने त्या कुठे उभ्या कराव्यात, असा प्रश्न आहे. यावर आम्ही अभ्यास करीत आहोत. एमआयडीसीकडे आम्ही जागेची मागणी केली. त्यांनी एक जागादेखील सुचविली आहे. त्यावर कार्यवाही सुरू असून, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल.’’ - अनिल पटवर्धन, अध्यक्ष, एचआयए अभियंत्यांच्या सुविधेसाठी की गैरसोयीसाठी ह्या बसेस सुरू केल्या आहेत, याचा विचार एमआयडीसी आणि एचआयएने करावा. मात्र, सोय थोडी आणि गैरसोय जास्त, अशी परिस्थिती ह्या बसेसमुळे आयटीत निर्माण झाली आहे. आयटी अभियंत्यांसह सर्वांनाच या अस्ताव्यस्त बसेसचा त्रास होत असून, यावर कायमचा तोडगा काढावा. अन्यथा, आम्ही तीव्र आंदोलन करू.’’ -मच्छिंद्र ओझरकर, पुणे जिल्हाध्यक्ष युवा सेना