शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा अटकेबद्दल भरपाई

By admin | Updated: June 21, 2015 01:33 IST

सुमारे ३२ तास बेकायदा डांबून ठेवून आणि सक्तीने वैद्यकीय चाचण्या घेऊन जालना जिल्ह्यातील अंबड पोलिसांनी नवी मुंबईतील ऐरोली येथील एका सिव्हिल इंजिनियर

मुंबई : सुमारे ३२ तास बेकायदा डांबून ठेवून आणि सक्तीने वैद्यकीय चाचण्या घेऊन जालना जिल्ह्यातील अंबड पोलिसांनी नवी मुंबईतील ऐरोली येथील एका सिव्हिल इंजिनियर तरुणाच्या सन्मानाने जगण्याच्या मुलभूत हक्काची पायमल्ली केल्याबद्दल राज्य सरकारने या तरुणास दोन लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.सेक्टर ४, ऐरोली येथे राहणाऱ्या सतीश वसंत साळवी या ३१ वर्षीय तरुणास सरकारने ही भरपाईची रक्कम आठ आठवड्यांत दिली नाही त्यावर १२ टक्के दराने व्याज द्यावे लागेल, असाही आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. श्रीमती इंदू जैन यांच्या खंडपीठाने दिला. याखेरीज साळवी यांना सरकारने दाव्याच्या खर्चापोटी २० हजार रुपये द्यावेत, असाही निर्देश न्यायालयाने दिला.साळवी यांना ज्यांनी बेकायदा अटक केली व ज्यांनी त्यांच्या सक्तीने वैद्यकीय चाचण्या करवून घेतल्या त्या अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन.वाय अंतराप यांच्यावर मोठ्या शिक्षेसाठी खातेनिहाय चौकशी करून सरकारने भरपाईची रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, असेही न्यायालयाने सांगितले.पूर्वी अंबड पोलीस ठाण्यात पाच वर्षे पोलीस निरीक्षक राहिलेले चंद्रकांत दिपक बळनागर यांच्या मुलीशी साळवी यांचा ३१ मे २०१३ रोजी विवाह झाला. जेमतेम अडीच महिने सासरी राहून वडील आजारी असल्याचे कारण सांगून साळवी यांची पत्नी माहेरी गेली. दोन महिन्यांनी येताना ती सोबत वडिलांना घेऊन आली. आई-वडिलांपासून वेगळे राहणार असशील तरच सोबत राहीन, अशी तिने अट घातली. साळवी यांनी यास असमर्थता दर्शविल्यावर ती माहेरी निघून गेली.माहेरी गेल्यावर तिनेअंबड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सात लोकांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करण्यासह इतर गुन्ह्यांची फिर्याद नोंदविली. त्यानंतर तीन आठवड्यांनी अंतराप ऐरोलीस आले व साळवी यांना अटक करून अंबडला घेऊन गेले. दंडाधिकाऱ्यांकडून रिमांड घेण्याआधी त्यांनी औरंगाबाद येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात नेऊन साळवी यांची सक्तीने पौरुषत्व चाचणी करून घेतली.पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर आता राजकारणात सक्रिय असलेल्या सासऱ्याच्या दबावामुळेच अंतराप यांनी बेकायदा अटक व सक्तीने वैद्यकीय चाचण्या करून साळवी यांची समाजात बेअब्रु केली, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला. (विशेष प्रतिनिधी)काय म्हटले न्यायालयाने?-१३ एप्रिल २०१४ रोजी पहाटे तीन वाजल्यापासून ते १४ एप्रिलच्या साकळी ११ वाजेपर्यंत अंतराप यांनी दंडाधिकाऱ्यांकडून रीतसर रिमांड न घेता साळवी यांना बेकायदा डांबून ठेवले.-वस्तुत: साळवी यांच्यावर ज्या कथित गुन्ह्यांची फिर्याद त्यांच्या पत्नीने नोंदविली होती त्याचा त्यांच्या पौरुषत्वाशी काहीही संबंध नव्हता. तरीही अंतराप यांनी त्यांची त्यासाठी वैद्यकीय तपासणी करून घेतली. साळवी यांची मानसिक तपासणी करून घेण्याचाही त्यांचा इरादा होता. परंतु न्यायालयाच्या आदेशाशिवाय ती करण्यास इस्पितळाने नकार दिला.-या दोन्ही प्रकारे मुलभूत हक्कांची पायमल्ली झाल्याबद्दल प्रत्येकी एक लाख याप्रमाणे साळवी यांनी एकूण दोन लाख रुपये भरपाई.-याखेरीज स्वतंत्र भरपाईसाठी दिवाणी दावा करण्याचीही मुभा.