शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

संविधानाच्या सन्मानासाठी २३ आॅक्टोबरला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 05:37 IST

भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी येत्या २३ आॅक्टोबर रोजी ठाण्यात आंबेडकरी नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत.

ठाणे : भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी येत्या २३ आॅक्टोबर रोजी ठाण्यात आंबेडकरी नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. सकाळी ११ वाजता ठाण्यातील सेंट्रल मैदानात नागरिक जमल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यानंतर, त्यांना नाशिक येथे दलित कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करून त्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी करावी, कोपर्डीमधील त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच मराठा समाजालाही संविधानाच्या तरतुदीनुसार आरक्षण द्यावे आणि पाटील समितीचा अहवाल जाहीर करावा, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.कोपर्डी गावातील घटनेनंतर राज्यभरात अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा आणि इतर मागण्यांसाठी मोर्चे निघत आहेत.अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासाठी विविध संघटना रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये जाणीवपूर्वक या कायद्याबाबत गैरसमज पसरवला जात आहे. याबाबत, गैरसमज थांबावेत आणि देशातील संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले सर्व अधिकार अबाधित राहावेत, यासाठी हा मोर्चा आयोजिण्यात आला आहे. या वेळी रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील लाखो नागरिक मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती या मोर्चाचे समन्वयक श्यामदादा गायकवाड यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भास्कर वाघमारे, उत्तम खडसे, राज गायकवाड, सुनील खांबे, पंढरीनाथ गायकवाड, बाबासाहेब निर्मळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)