शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

संविधानाच्या सन्मानासाठी २३ आॅक्टोबरला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 05:37 IST

भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी येत्या २३ आॅक्टोबर रोजी ठाण्यात आंबेडकरी नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत.

ठाणे : भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी येत्या २३ आॅक्टोबर रोजी ठाण्यात आंबेडकरी नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. सकाळी ११ वाजता ठाण्यातील सेंट्रल मैदानात नागरिक जमल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. त्यानंतर, त्यांना नाशिक येथे दलित कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शासन करावे, अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करून त्याची काटेकोरपणाने अंमलबजावणी करावी, कोपर्डीमधील त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी तसेच मराठा समाजालाही संविधानाच्या तरतुदीनुसार आरक्षण द्यावे आणि पाटील समितीचा अहवाल जाहीर करावा, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.कोपर्डी गावातील घटनेनंतर राज्यभरात अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा आणि इतर मागण्यांसाठी मोर्चे निघत आहेत.अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासाठी विविध संघटना रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये जाणीवपूर्वक या कायद्याबाबत गैरसमज पसरवला जात आहे. याबाबत, गैरसमज थांबावेत आणि देशातील संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले सर्व अधिकार अबाधित राहावेत, यासाठी हा मोर्चा आयोजिण्यात आला आहे. या वेळी रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील लाखो नागरिक मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती या मोर्चाचे समन्वयक श्यामदादा गायकवाड यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भास्कर वाघमारे, उत्तम खडसे, राज गायकवाड, सुनील खांबे, पंढरीनाथ गायकवाड, बाबासाहेब निर्मळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)