शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

एक स्मरण जनस्थानच्या निमित्ताने!

By admin | Updated: January 20, 2017 19:02 IST

विष्णु सखाराम खांडेकर यांना ‘ययाती’साठी १९७४ साली प्राप्त झाला आणि चौदा वर्षे मराठीच्या नशिबी वनवास आला. योगायोगाने तो संपुष्टात आणला दुसऱ्या विष्णुने

- हेमंत कुलकर्णी 

साहित्याच्या प्रांतातील ‘ज्ञानपीठ’ हा सर्वोच्च सन्मान. विष्णु सखाराम खांडेकर यांना ‘ययाती’साठी १९७४ साली प्राप्त झाला आणि चौदा वर्षे मराठीच्या नशिबी वनवास आला. योगायोगाने तो संपुष्टात आणला दुसऱ्या विष्णुने. विष्णु वामन शिरवाडकर यांनी. तत्पूर्वी १९८२ नंतर विशिष्ट साहित्य कृतीसाठी तो जाहीर करण्याची परंपरा खंडित झाली. विशिष्ट भाषेच्या साहित्य सेवेसाठी तो बहाल करण्याची नवी परंपरा रुजू झाली. याच परंपरेचे पालन करुन वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना १९८७चा पुरस्कार १९८८ मध्ये जाहीर झाला. यातील दुसरा पण विचित्र योगायोग म्हणजे ८७च्या पुरस्कारासाठी निवड समितीच्या पुढ्यात असलेली दोन्ही नावे मराठीतल्याच साहित्यिकांची. शिरवाडकर आणि पु.ल.देशपांडे. निवड समितीच्या अध्यक्षपदी तत्कालीन केन्द्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि बहुभाषा कोविद पी.व्ही. नरसिंह राव.

राजकारणातच गटतट असतात असे निर्भर्त्सनापूर्ण उसासे टाकीत राहणाऱ्या साहित्यिकांमध्येही ते असतातच. किंबहुना अधिक तीव्रतेने असतात. भूपृष्ठावर फारसे येत नाहीत, इतकेच. स्वाभाविकच काही पु.ल. देशपांडे यांचे समर्थक तर काही कुसुमाग्रज समर्थक. कोण आपला, कोण त्यांचा हे दोहोंना चांगलेच ज्ञात. दोन्ही गटांचे दडपण तुल्यबळ. निवड समितीदेखील गांगरलेली. अखेर एक गद्यलेखक तर दुसरा कवी आणि कवितेमध्ये जे वैश्विक आवाहन असते, ती जशी साऱ्या सीमा उल्लंघणारी असते, तसे गद्य नसते म्हणून निवड समितीचे तुळशीपत्र कुसुमाग्रजांच्या पारड्यात. ज्ञानपीठाच्या परंपरेला साजेशा कार्यक्रमात मुंबईत कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ बहाल करण्यात आले. मोठा नयनरम्य आणि श्रवणसुंदर सोहळा पार पडला.  दरम्यानच्या काळात कुसुमाग्रजांची एक कविता अवतरली.                      म्हणूनविजयासाठी कविता माझी कधीच नव्हतीम्हणून नव्हती भीती तिला पराजयाचीजन्मासाठी हटून केव्हां नव्हती बसलीम्हणून नाही खंतहि तिला मरावयाची. कुसुमाग्रज हे नाशिकचे ग्रामदैवत. त्यांना ज्ञानपीठ प्राप्त झाल्याचा अवर्णनीय आनंद नाशिककरांना झाला. त्यातून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अवतार उदयास आला. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आडसाली जनस्थान हा साहित्य पुरस्कार देण्याची कल्पना दस्तुरखुद्द कुसुमाग्रजांनी जन्मास घातली. आणि यंदाचा जनस्थान विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला. त्यानिमित्ते हे स्मरण