शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एक स्मरण जनस्थानच्या निमित्ताने!

By admin | Updated: January 20, 2017 19:02 IST

विष्णु सखाराम खांडेकर यांना ‘ययाती’साठी १९७४ साली प्राप्त झाला आणि चौदा वर्षे मराठीच्या नशिबी वनवास आला. योगायोगाने तो संपुष्टात आणला दुसऱ्या विष्णुने

- हेमंत कुलकर्णी 

साहित्याच्या प्रांतातील ‘ज्ञानपीठ’ हा सर्वोच्च सन्मान. विष्णु सखाराम खांडेकर यांना ‘ययाती’साठी १९७४ साली प्राप्त झाला आणि चौदा वर्षे मराठीच्या नशिबी वनवास आला. योगायोगाने तो संपुष्टात आणला दुसऱ्या विष्णुने. विष्णु वामन शिरवाडकर यांनी. तत्पूर्वी १९८२ नंतर विशिष्ट साहित्य कृतीसाठी तो जाहीर करण्याची परंपरा खंडित झाली. विशिष्ट भाषेच्या साहित्य सेवेसाठी तो बहाल करण्याची नवी परंपरा रुजू झाली. याच परंपरेचे पालन करुन वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना १९८७चा पुरस्कार १९८८ मध्ये जाहीर झाला. यातील दुसरा पण विचित्र योगायोग म्हणजे ८७च्या पुरस्कारासाठी निवड समितीच्या पुढ्यात असलेली दोन्ही नावे मराठीतल्याच साहित्यिकांची. शिरवाडकर आणि पु.ल.देशपांडे. निवड समितीच्या अध्यक्षपदी तत्कालीन केन्द्रीय मनुष्यबळ विकास मंत्री आणि बहुभाषा कोविद पी.व्ही. नरसिंह राव.

राजकारणातच गटतट असतात असे निर्भर्त्सनापूर्ण उसासे टाकीत राहणाऱ्या साहित्यिकांमध्येही ते असतातच. किंबहुना अधिक तीव्रतेने असतात. भूपृष्ठावर फारसे येत नाहीत, इतकेच. स्वाभाविकच काही पु.ल. देशपांडे यांचे समर्थक तर काही कुसुमाग्रज समर्थक. कोण आपला, कोण त्यांचा हे दोहोंना चांगलेच ज्ञात. दोन्ही गटांचे दडपण तुल्यबळ. निवड समितीदेखील गांगरलेली. अखेर एक गद्यलेखक तर दुसरा कवी आणि कवितेमध्ये जे वैश्विक आवाहन असते, ती जशी साऱ्या सीमा उल्लंघणारी असते, तसे गद्य नसते म्हणून निवड समितीचे तुळशीपत्र कुसुमाग्रजांच्या पारड्यात. ज्ञानपीठाच्या परंपरेला साजेशा कार्यक्रमात मुंबईत कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ बहाल करण्यात आले. मोठा नयनरम्य आणि श्रवणसुंदर सोहळा पार पडला.  दरम्यानच्या काळात कुसुमाग्रजांची एक कविता अवतरली.                      म्हणूनविजयासाठी कविता माझी कधीच नव्हतीम्हणून नव्हती भीती तिला पराजयाचीजन्मासाठी हटून केव्हां नव्हती बसलीम्हणून नाही खंतहि तिला मरावयाची. कुसुमाग्रज हे नाशिकचे ग्रामदैवत. त्यांना ज्ञानपीठ प्राप्त झाल्याचा अवर्णनीय आनंद नाशिककरांना झाला. त्यातून कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अवतार उदयास आला. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आडसाली जनस्थान हा साहित्य पुरस्कार देण्याची कल्पना दस्तुरखुद्द कुसुमाग्रजांनी जन्मास घातली. आणि यंदाचा जनस्थान विजया राजाध्यक्ष यांना जाहीर झाला. त्यानिमित्ते हे स्मरण